शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

खानापुरात चालते, सांगलीत का नाही ?

By admin | Updated: August 18, 2015 00:51 IST

मदन पाटील यांचा सवाल : पतंगरावांना अप्रत्यक्ष टोला

सांगली : खानापूर बाजार समितीत काँग्रेस, भाजप, शिवसेना आघाडी झाली. तिथे परिवर्तनाची नांदी नाही का? खानापुरात चालते, मग सांगलीत का नाही? राजकारणात सगळ्या गोष्टी होतच असतात, असा अप्रत्यक्ष टोला काँग्रेसचे माजी मंत्री मदन पाटील यांनी सोमवारी आ. पतंगराव कदम यांना लगावला. आपण अजूनही काँग्रेसमध्येच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मदन पाटील यांनी सोमवारी महापालिकेत अधिकारी, पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बाजार समिती निवडणुकीनंतर सांगली जिल्ह्यात परिवर्तनाची नांदी सुरू झाल्याचे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. पतंगराव कदम यांनी केले होते. त्याबाबत मदन पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, खानापूर बाजार समितीत भाजप, काँग्रेस, शिवसेना एकत्र लढली. तिथे त्यांनी काँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या पॅनेलचा पराभव केला. खानापुरातील राजकारणात परिवर्तन झाले नाही का? तिथे सगळे चालते, मग इकडे का नाही. नगरसेवक, आमदार, खासदार या निवडणुका पक्षीय पातळीवर योग्य आहेत. कुणाला पटो अथवा न पटो, मला जे पटले ते मी केले. निवडणुकीत माझ्यावर टीका झाली, पण मी खोलात गेलो असतो तर वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरले असते. आ. जयंत पाटील यांच्याशी सूर जुळल्यानंतरही त्यांनी ड्रेनेजबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याचे निदर्शनास आणून देताच मदन पाटील म्हणाले की, त्यांना त्यांचा पक्ष टिकवायचा आहे. ते महापालिकेत विरोधक आहेत. आमच्या पक्षातील लोकांना आमची काळजी नाही. एकतरी नेता महापालिकेच्या समस्या घेऊन शासनाकडे गेला आहे का? केवळ येथेच बसून ते आमच्यावर टीका-टिप्पणी करतात. आमदार, खासदार काय करतात? राज्यातील भाजप शासन विविध योजना विदर्भातच नेत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय केला जात आहे. अन्न सुरक्षा व्यवस्था, दुष्काळाचे लाभ विदर्भातील शेतकऱ्यांना मिळत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी आहे का नाही? येथील आमदार, खासदार काय करीत आहेत, असा सवालही मदन पाटील यांनी केला. टोल वसुली न पटणारी सांगलीत टोल वसुली पुन्हा सुरू होणार नाही. बांधकाम खात्याने टोलबाबत प्रस्ताव शासनाकडे दिला आहे. १ कोटी २० लाखांसाठी सोळा वर्षे वसुलीचा ठेका कोणालाही न पटणारा आहे. शासनाने कित्येक कोटींचे टोलनाके बंद केले. त्यामुळे सांगलीचा प्रश्न शासनाच्यादृष्टीने तितका गंभीर नाही. ठेकेदाराला पैसे देऊन हा विषय संपविता येईल, पण या प्रकरणात काहीजण ‘मॅनेज’ होत आहेत, हे खरे दुर्दैव आहे, अशी खंतही पाटील यांनी व्यक्त केली.