शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

खानापुरात चालते, सांगलीत का नाही ?

By admin | Updated: August 18, 2015 00:51 IST

मदन पाटील यांचा सवाल : पतंगरावांना अप्रत्यक्ष टोला

सांगली : खानापूर बाजार समितीत काँग्रेस, भाजप, शिवसेना आघाडी झाली. तिथे परिवर्तनाची नांदी नाही का? खानापुरात चालते, मग सांगलीत का नाही? राजकारणात सगळ्या गोष्टी होतच असतात, असा अप्रत्यक्ष टोला काँग्रेसचे माजी मंत्री मदन पाटील यांनी सोमवारी आ. पतंगराव कदम यांना लगावला. आपण अजूनही काँग्रेसमध्येच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मदन पाटील यांनी सोमवारी महापालिकेत अधिकारी, पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बाजार समिती निवडणुकीनंतर सांगली जिल्ह्यात परिवर्तनाची नांदी सुरू झाल्याचे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. पतंगराव कदम यांनी केले होते. त्याबाबत मदन पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, खानापूर बाजार समितीत भाजप, काँग्रेस, शिवसेना एकत्र लढली. तिथे त्यांनी काँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या पॅनेलचा पराभव केला. खानापुरातील राजकारणात परिवर्तन झाले नाही का? तिथे सगळे चालते, मग इकडे का नाही. नगरसेवक, आमदार, खासदार या निवडणुका पक्षीय पातळीवर योग्य आहेत. कुणाला पटो अथवा न पटो, मला जे पटले ते मी केले. निवडणुकीत माझ्यावर टीका झाली, पण मी खोलात गेलो असतो तर वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरले असते. आ. जयंत पाटील यांच्याशी सूर जुळल्यानंतरही त्यांनी ड्रेनेजबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याचे निदर्शनास आणून देताच मदन पाटील म्हणाले की, त्यांना त्यांचा पक्ष टिकवायचा आहे. ते महापालिकेत विरोधक आहेत. आमच्या पक्षातील लोकांना आमची काळजी नाही. एकतरी नेता महापालिकेच्या समस्या घेऊन शासनाकडे गेला आहे का? केवळ येथेच बसून ते आमच्यावर टीका-टिप्पणी करतात. आमदार, खासदार काय करतात? राज्यातील भाजप शासन विविध योजना विदर्भातच नेत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय केला जात आहे. अन्न सुरक्षा व्यवस्था, दुष्काळाचे लाभ विदर्भातील शेतकऱ्यांना मिळत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी आहे का नाही? येथील आमदार, खासदार काय करीत आहेत, असा सवालही मदन पाटील यांनी केला. टोल वसुली न पटणारी सांगलीत टोल वसुली पुन्हा सुरू होणार नाही. बांधकाम खात्याने टोलबाबत प्रस्ताव शासनाकडे दिला आहे. १ कोटी २० लाखांसाठी सोळा वर्षे वसुलीचा ठेका कोणालाही न पटणारा आहे. शासनाने कित्येक कोटींचे टोलनाके बंद केले. त्यामुळे सांगलीचा प्रश्न शासनाच्यादृष्टीने तितका गंभीर नाही. ठेकेदाराला पैसे देऊन हा विषय संपविता येईल, पण या प्रकरणात काहीजण ‘मॅनेज’ होत आहेत, हे खरे दुर्दैव आहे, अशी खंतही पाटील यांनी व्यक्त केली.