शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

अंधश्रध्दाच समाजाच्या ऱ्हासाचे कारण

By admin | Updated: February 13, 2015 00:46 IST

शैला दाभोलकर : हणमंतवडिये येथे ‘क्रांतिवीर भगवानराव पाटील’ पुरस्कार प्रदान

कडेगाव : देशामध्ये दीडशे वर्षांपासून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याबाबत प्रबोधन होत आहे, परंतु अद्यापही हा दृष्टिकोन समाजामध्ये रुजलेला नाही. अंधश्रध्देमुळेच भारतीय समाजाचा मोठा ऱ्हास झाला आहे. विचार आणि आचार यामध्ये सुसंवाद निर्माण झाला, तरच संस्कारक्षम समाजाची निर्मिती होईल, असे प्रतिपादन शैला दाभोलकर यांनी केले.हणमंतवडिये (ता. कडेगाव) येथील क्रांतिवीर भाई भगवानराव पाटील (बप्पा) अकादमीच्यावतीने २०१५ चा ‘क्रांतिवीर भगवानराव पाटील सामाजिक पुरस्कार’ शैलाताई दाभोलकर यांना आज (गुरुवारी) क्रांतिवीरांगना हौसाताई पाटील यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. दाभोलकर म्हणाल्या की, विवेकी बाणा, निर्भयपणा आणि विज्ञाननिष्ठा अशा समाजहिताच्या मूल्यांची जोपासना करणे आवश्यक आहे. समाजात रुजलेल्या अंधश्रध्देमुळे वर्षानुवर्षे समाजहिताचे नुकसान झाले आहे. हे ओळखून अंधश्रध्देच्या निर्मूलनासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अविरत लढा दिला. आपण केवळ शिकलो म्हणजे शिक्षित झालो असे नाही, तर सर्व नीतीमूल्यांची जोपासना करणारेच खरे शिक्षित होत. स्त्रियांनी समाजात निर्भयतेने व आत्मविश्वासाने वावरावे. प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार करून निर्णय घ्यावेत.यावेळी कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे म्हणाले की, सध्या व्यक्तिद्वेष आणि विचारद्वेषाचे चुकीचे राजकारण चालले आहे. स्वत: धर्मद्वेषाचे आचरण करून समाजापुढे जाऊन धर्मनिरपेक्षतेची भाषणे सांगणारे राजकारणी समाजात तेढ निर्माण करीत आहेत. नरेंद्र मोदी हे एक अवैज्ञानिक, एकांगी व हुकूमशाही नेतृत्व आहे. अशा प्रवृत्तीच्या नेतृत्वामुळे प्रगत लोकशाहीचे अवमूलन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लोकशाहीला लोककेंद्रित करण्याची भूमिका आता महत्त्वाची आहे. एकछत्री अंमल करू पाहणाऱ्या मोदी यांना अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत पक्षाची निर्विवाद सत्ता आणून लगाम लावला.यावेळी कॉम्रेड किरण माने यांचे भाषण झाले. यावेळी अ‍ॅड. सुभाष पाटील, प्रा. विश्वनाथ गायकवाड, स्वा.सै. शाहीर शिवाजीराव पवार, अ‍ॅड. अमित शिंदे, चंद्रकांत देशमुखे, सुभाष पवार, इंद्रजित पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)द्वेषाचे राजकारणयावेळी अ‍ॅड. असीम सरोदे यांनी देशातील राजकीय वातावरणावर कोरडे ओढले. ते म्हणाले की, देशामध्ये धर्मद्वेषाचे राजकारण करणारे सत्तेवर आले आहेत. काही राजकारण्यांकडून समाजात तेढ वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. देशातील सुदृढ लोकशाहीचे अशा प्रवृत्तीमुळे अवमूलन वेगाने होत आहे. मात्र प्रत्येकाने विवेकाने वागल्यास अशा प्रवृत्तींचा पराभव होण्यास वेळ लागणार नाही.