शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी शहर बनलेय ‘वेड्यांचे माहेरघर’

By admin | Updated: August 7, 2015 22:30 IST

नवी समस्या : भीतीमुळे निवाराशेडऐवजी प्रवासी उभे राहतात रस्त्यावर

रत्नागिरी : अंगावरच्या वस्त्रांचा पत्ता नाही, वाढलेली दाढी व डोक्यावरील केसांच्या बटा, विक्षिप्त बोलणे, हावभाव, रस्त्याच्या मध्येच उभे राहणे, शहरातून कधीही भटकंती करताना मळकट कपड्यांमुळे पसरलेली दुर्गंधी... अशा स्थितीतील वेडे आपल्या आसपास कोठेही दिसतात. एकूणच शहरात सध्या वेड्यांचा सुळसुळाट झाला आहे. रत्नागिरी आता वेड्यांचे माहेरघर बनतंय की काय, इतकी चिंताजनक स्थिती दिसत आहे.संपूर्ण शहरात अधूनमधून कोठेतरी वेड्यांचे दर्शन होतेच, रस्त्यावर ही मंडळी हमखास सापडतात. नाहीतर एस. टी.च्या निवाराशेडमध्ये ठाण मांडलेली असतात. हातात एखादी फाटकी झोळी घेऊन तोंडाने बडबडत कचरा किंवा कागद वेचत फिरत असतात. अन्यथा रस्त्याच्या मध्ये किंवा फूटपाथवर ठाण मांडून बसलेली असतात किंवा दुभाजकांवर चक्क झोपलेले आढळतात. शहरातील काही निवारा शेडमध्ये तर वेड्यांनी बस्तान मांडले आहे. या वेड्यांच्या भीतीमुळे महिलावर्ग, विद्यार्थी यांना एस. टी.ची वाट पाहात निवाराशेडऐवजी रस्त्यावरच उभे राहावे लागत आहे. बस्तान जमवल्यामुळे निवाराशेडमध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना पावसाळ्यातही रस्त्यावरच उभे राहावे लागत आहे.या वेड्यांची शहरातून कोठेही, कशीही भटकंती सुरू असते. अंगावरच्या वस्त्रांचेही भान नसल्यामुळे महिला किंवा युवतींना मार्गक्रमण करणे अवघड होत आहे. विक्षिप्त हातवारे करीत वेगळ्याच भाषेत त्यांची बडबड सुरू असते. त्यामुळेही नागरिक भयग्रस्त होत आहेत. कोकणात रेल्वे सुरू झाल्यापासून शहरातील वेड्यांची संख्या वाढली आहे. शहरामध्येच प्रादेशिक मनोरूग्णालय आहे. याठिकाणी मनोरूग्णांवर उपचार केले जाऊ शकतात. मात्र, त्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. पोलिसांनी मनोरूग्णांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करावी लागते. त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर उभे केले जाते. न्यायालयाच्या परवानगीने प्रादेशिक मनोरूग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले जाऊ शकते. शहरात दिवसा किंवा रात्री - अपरात्री फिरणाऱ्या वेड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास, शहरामध्ये निर्माण झालेली दुर्गंधी लक्षात घेता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन न्यायालयाच्या परवानगीने मनोरूग्णालयात दाखल करावे, जेणेकरून योग्य उपचाराने मनोरूग्ण बरे होऊन आपल्या घरीही जाऊ शकतात. संबंधीत कार्यवाहीसाठी केवळ अर्धा दिवस पुरेसा आहे. मात्र, ‘कोणाला नसे त्याचे वावडे’ याप्रमाणे शहरात फिरणाऱ्या वेड्यांकडे लोक दुर्लक्ष करीत आहेत, त्यामुळे एक नवीन समस्या निर्माण होत आहे.पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर करून आदेशप्राप्त मनोरूग्णाना तसेच नातेवाईकांकडून आलेल्यांनाच रूग्णांना मनोरूग्णालयात दाखल करून घेतले जाते. मनोरूग्णांवर वैद्यकीय उपचारांबरोबर त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जातो. मनोरूग्ण परराज्यातील असेल, तर इंटरप्रिटरच्या माध्यमाद्वारे त्याच्या भाषेत संवाद साधला जातो. त्याच्याबद्दल माहिती गोळा केली जाते. त्यानंतर संबंधित माहितीची खात्री केल्यानंतर त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधून ते स्वीकारण्यास तयार असतील तरच न्यायालयाच्या आदेशाने नातेवाईकांच्या स्वाधीन केले जातात. काही मनोरूग्ण बरे होऊन घरी जातात. मात्र, बहुतांश मनोरूग्णांना शेवटच्या क्षणापर्यंत मनोरूग्णालयात वास्तव्य करावे लागते. - डॉ. पराग पाथरे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरूग्णालय रत्नागिरी.