शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
5
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
6
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
7
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
8
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
9
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
10
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
11
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
12
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
13
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
14
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
15
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
16
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
17
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
18
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
19
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
20
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी

रत्नागिरी शहर बनलेय ‘वेड्यांचे माहेरघर’

By admin | Updated: August 7, 2015 22:30 IST

नवी समस्या : भीतीमुळे निवाराशेडऐवजी प्रवासी उभे राहतात रस्त्यावर

रत्नागिरी : अंगावरच्या वस्त्रांचा पत्ता नाही, वाढलेली दाढी व डोक्यावरील केसांच्या बटा, विक्षिप्त बोलणे, हावभाव, रस्त्याच्या मध्येच उभे राहणे, शहरातून कधीही भटकंती करताना मळकट कपड्यांमुळे पसरलेली दुर्गंधी... अशा स्थितीतील वेडे आपल्या आसपास कोठेही दिसतात. एकूणच शहरात सध्या वेड्यांचा सुळसुळाट झाला आहे. रत्नागिरी आता वेड्यांचे माहेरघर बनतंय की काय, इतकी चिंताजनक स्थिती दिसत आहे.संपूर्ण शहरात अधूनमधून कोठेतरी वेड्यांचे दर्शन होतेच, रस्त्यावर ही मंडळी हमखास सापडतात. नाहीतर एस. टी.च्या निवाराशेडमध्ये ठाण मांडलेली असतात. हातात एखादी फाटकी झोळी घेऊन तोंडाने बडबडत कचरा किंवा कागद वेचत फिरत असतात. अन्यथा रस्त्याच्या मध्ये किंवा फूटपाथवर ठाण मांडून बसलेली असतात किंवा दुभाजकांवर चक्क झोपलेले आढळतात. शहरातील काही निवारा शेडमध्ये तर वेड्यांनी बस्तान मांडले आहे. या वेड्यांच्या भीतीमुळे महिलावर्ग, विद्यार्थी यांना एस. टी.ची वाट पाहात निवाराशेडऐवजी रस्त्यावरच उभे राहावे लागत आहे. बस्तान जमवल्यामुळे निवाराशेडमध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना पावसाळ्यातही रस्त्यावरच उभे राहावे लागत आहे.या वेड्यांची शहरातून कोठेही, कशीही भटकंती सुरू असते. अंगावरच्या वस्त्रांचेही भान नसल्यामुळे महिला किंवा युवतींना मार्गक्रमण करणे अवघड होत आहे. विक्षिप्त हातवारे करीत वेगळ्याच भाषेत त्यांची बडबड सुरू असते. त्यामुळेही नागरिक भयग्रस्त होत आहेत. कोकणात रेल्वे सुरू झाल्यापासून शहरातील वेड्यांची संख्या वाढली आहे. शहरामध्येच प्रादेशिक मनोरूग्णालय आहे. याठिकाणी मनोरूग्णांवर उपचार केले जाऊ शकतात. मात्र, त्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. पोलिसांनी मनोरूग्णांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करावी लागते. त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर उभे केले जाते. न्यायालयाच्या परवानगीने प्रादेशिक मनोरूग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले जाऊ शकते. शहरात दिवसा किंवा रात्री - अपरात्री फिरणाऱ्या वेड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास, शहरामध्ये निर्माण झालेली दुर्गंधी लक्षात घेता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन न्यायालयाच्या परवानगीने मनोरूग्णालयात दाखल करावे, जेणेकरून योग्य उपचाराने मनोरूग्ण बरे होऊन आपल्या घरीही जाऊ शकतात. संबंधीत कार्यवाहीसाठी केवळ अर्धा दिवस पुरेसा आहे. मात्र, ‘कोणाला नसे त्याचे वावडे’ याप्रमाणे शहरात फिरणाऱ्या वेड्यांकडे लोक दुर्लक्ष करीत आहेत, त्यामुळे एक नवीन समस्या निर्माण होत आहे.पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर करून आदेशप्राप्त मनोरूग्णाना तसेच नातेवाईकांकडून आलेल्यांनाच रूग्णांना मनोरूग्णालयात दाखल करून घेतले जाते. मनोरूग्णांवर वैद्यकीय उपचारांबरोबर त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जातो. मनोरूग्ण परराज्यातील असेल, तर इंटरप्रिटरच्या माध्यमाद्वारे त्याच्या भाषेत संवाद साधला जातो. त्याच्याबद्दल माहिती गोळा केली जाते. त्यानंतर संबंधित माहितीची खात्री केल्यानंतर त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधून ते स्वीकारण्यास तयार असतील तरच न्यायालयाच्या आदेशाने नातेवाईकांच्या स्वाधीन केले जातात. काही मनोरूग्ण बरे होऊन घरी जातात. मात्र, बहुतांश मनोरूग्णांना शेवटच्या क्षणापर्यंत मनोरूग्णालयात वास्तव्य करावे लागते. - डॉ. पराग पाथरे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरूग्णालय रत्नागिरी.