शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

डाळी कडाडलेल्याच!

By admin | Updated: August 18, 2016 23:34 IST

‘बजेट’ कोलमडले : घाऊक दरात घट, किरकोळ बाजारात दर ‘जैसे थे’च

शीतल पाटील - सांगली --गगनाला भिडलेल्या डाळींच्या किमती आता पाऊसमान चांगले झाल्याने घाऊक (होलसेल) बाजारपेठेत उतरू लागल्या आहेत. गेल्या महिन्याभरात डाळींच्या किमतीत २० ते २५ रुपयांनी घट झाली आहे. मात्र किरकोळ (रिटेल) बाजारात डाळींचे दर कडाडलेलेच आहेत. अजूनही तूरडाळ १६० रुपये किलोनेच विक्री केली जात आहे. परिणामी सर्वसामान्यांच्या ‘किचन’चे ‘बजेट’ कोलमडले आहे.पश्चिम महाराष्ट्रात दरवर्षी सरासरीइतका पाऊस पडत असला तरी, शेतकऱ्यांचा नगदी पिकांकडे ओढा वाढला आहे. त्याचा परिणाम डाळींच्या उत्पादनावर झाला आहे. पूर्वीच्या काळी घरापुरते का होईना, डाळींचे उत्पादन घेतले जात होते. आता बदलती जीवनशैली आणि ‘रेडी टू कुक’ पद्धतीमुळे बाजारपेठेतून धान्य, डाळी खरेदीकडे कल वाढला आहे. सांगलीच्या मार्केट यार्डात वर्षाच्या सुरुवातीलाच डाळींचे दर कडाडले. घाऊक बाजारात (होलसेल) तूरडाळ ११० ते ११५ रुपयांच्या घरात पोहोचली. व्यापाऱ्यांकडून डाळ खरेदी करून किरकोळ दुकानांद्वारे ती ग्राहकाला मिळेपर्यंत तिचा दर १६० रुपयांपर्यंत गेला. केवळ तूरडाळच नव्हे, तर मूगडाळ, हरभराडाळ व मसूरडाळीच्या किमतीही वाढल्या. अगदी महिन्याभरापूर्वी घाऊक बाजारात तूरडाळ ११० ते ११५ रुपये किलो दराने विक्री होत होती. हरभराडाळीचे दरही महिन्याभरापूर्वी ११० रुपयांपर्यंत होते, पण जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाली. राज्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. त्यामुळे घाऊक खरेदी करणाऱ्या मिल मालकांना यंदा बाजारात डाळींच्या उत्पादन वाढीचा अंदाज आला. साठा करून ठेवलेली डाळ आता बाजारपेठेत येऊ लागली आहे. परिणामत: घाऊक बाजारात डाळींचे दर उतरण्यास सुरुवात झाली आहे. तूरडाळ व मूगडाळीचे दर २० ते २५ रुपयांनी उतरले असले तरी, हरभराडाळीचे दर मात्र कडाडले आहेत. चार महिन्यांपूर्वी ५५ ते ६० रुपये किलो दराने हरभराडाळ विक्री होत होती. सध्या तिचा दर ९० ते ९५ च्या घरात पोहोचला आहे. सणासुदीच्या दिवसांचा हा परिणाम आहे. घाऊक बाजारात डाळींच्या दरात घसरण झाली असली तरी, किरकोळ बाजारात मात्र आजही चढ्या दरानेच डाळींची विक्री होत आहे. तूरडाळ ११० ते १६०, मूगडाळ ८० ते ९०, मसूरडाळ ८० ते ८५ व हरभराडाळ १०५ ते १६० रुपये दराने विक्री होत आहे. लातूरमधून सर्वाधिक डाळीची आवकसांगलीच्या वसंतदादा मार्केट यार्डात मुख्यत: मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यांतून डाळी येतात. लातूर जिल्ह्यातून सर्वाधिक डाळीची आवक होते. शिवाय मुंबईतून परदेशातून आयात केलेल्याही डाळी येतात. याव्यतिरिक्त मध्य प्रदेशातील इंदूरहून चणाडाळ, राजस्थानहून मूगडाळ, जळगावमधून मटकीची सांगलीत आवक होते. शासनाने डाळींचा साठा करण्यावरही व्यापाऱ्यांना बंधने घातली आहेत. एका व्यापाऱ्याला सर्व डाळींचा मिळून ३५०० क्विंटल इतकाच साठा करता येतो. सांगलीच्या बाजारपेठेत इतका डाळीचा साठा कोणीच ठेवत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. शिधापत्रिकेवर १०३ रुपये तूरडाळजिल्ह्यात शिधापत्रिकेवर मात्र तूरडाळीचा दर १०३ रुपये इतका आहे. घाऊक बाजारात तूरडाळीचा दर ९० ते ९२ रुपये इतका असला तरी, किरकोळ दुकानात याच डाळीचा दर १२० ते १३० रुपयांच्या घरात आहे. जिल्ह्यात अंत्योदय कार्डधारकांची संख्या ३५ हजार ६०५, तर दारिद्र्यरेषेखालील कार्डधारकांची संख्या ५९ हजार आहे. एका कार्डधारकाला एक किलो तूरडाळ दिली जाते. जिल्ह्यासाठी दरमहा एक हजार क्विंटल तूरडाळ लागते. जुलैअखेरपर्यंत डाळींच्या किमती वाढल्या होत्या. वर्षभरात दरात चढ-उतार होत आहे. पावसाच्या आगमनावर डाळींच्या किमती अवलंबून आहेत. जुलै महिन्यात सर्वत्र पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे भविष्यात डाळींचे उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. त्याचा परिणाम त्यांच्या किमतीवर होत असून, सध्या घाऊक बाजारात डाळींचे दर कमी झाले आहेत. - सुरेश हिडदुगी, व्यापारी