शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
2
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
3
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
4
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
5
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
6
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
7
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
8
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
9
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
10
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
11
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
12
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
13
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
14
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
15
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
16
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
18
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
19
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
20
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!

जलसंपदाच्या ढिसाळ नियोजनाचा सांगलीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:27 IST

सांगली : जलसंपदा विभागाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका सांगलीला बसला आहे. कोयना धरणात ३१ जुलैपूर्वीच ८० टक्के पाणीसाठा करण्यात आला. ...

सांगली : जलसंपदा विभागाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका सांगलीला बसला आहे. कोयना धरणात ३१ जुलैपूर्वीच ८० टक्के पाणीसाठा करण्यात आला. त्यामुळे ऐनवेळी कृष्णा नदीत ५० हजार क्यूसेक पाणी सोडावे लागले. पाणीसाठ्याचे नियोजन केले असते तर सांगलीतील पाणीपातळी पाच ते सहा फुटाने कमी झाली असती, असे सर्वोदय साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, धरणांना भेटी दिल्या; पण त्यांचे नियोजन फसल्याचा आरोपही पवार यांनी केला. ते म्हणाले की, कोयना धरणात ३१ जुलैपर्यंत ५० टक्के पाणीसाठा हवा होता. तो २३ जुलैलाच ८० टक्के इतका होता. नियमानुसार ५२ टीएमसी पाणीसाठा कोयना धरण अपेक्षित होते. त्यात दोन दिवसांत अतिवृष्टीमुळे १८ ते २० टीएमसी पाणी आले असते. त्यामुळे धरणात ७० टीएमसी पाणीसाठा झाला असता. परिणामी धरणातून पाणी सोडावे लागले नसते.

सांगलीत ५५ फूट पाणीपातळी असताना आयर्विन पुलाजवळ दोन लाख ६ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यात धरणातील ५० हजार क्युसेक कमी झाले असता तर दीड लाख क्युसेक सांगलीत विसर्ग असता. परिणामी नदीची पातळी पाच फुटांनी कमी झाली असती. सांगलीत पुराचे पाणी ५० फुटापर्यंतच स्थिर झाले असते आणि जयंत पाटील यांचा अंदाज खरा ठरला असता; पण जलसंपदा विभाग व त्या खात्याचे मंत्री पाटील यांच्या ढिसाळ नियोजनामुळे सांगलीत पुराचे पाणी पाच फूट वाढल्याचा आरोप केला.

चौकट

वडनेरे समितीचा अहवाल गुंडाळला

नंदकुमार वडनेरे समितीने पूर नियंत्रणाबाबत दोन वर्षांपूर्वी अहवाल दिला आहे; पण हा अहवालच शासन व जलसंपदा विभागाने बसनात गुंडाळून ठेवल्याचा आरोप पृथ्वीराज पवार यांनी केला. याशिवाय हवामान खात्याने मे महिन्यात अतिवृष्टीचे भाकित केले होते. रेड झोन, येलो झोनचा अलर्ट दिला होता. त्याकडेही काणाडोळा करण्यात आल्याचे ते म्हणाले.