शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

जलसंपदाच्या ढिसाळ नियोजनाचा सांगलीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:27 IST

सांगली : जलसंपदा विभागाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका सांगलीला बसला आहे. कोयना धरणात ३१ जुलैपूर्वीच ८० टक्के पाणीसाठा करण्यात आला. ...

सांगली : जलसंपदा विभागाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका सांगलीला बसला आहे. कोयना धरणात ३१ जुलैपूर्वीच ८० टक्के पाणीसाठा करण्यात आला. त्यामुळे ऐनवेळी कृष्णा नदीत ५० हजार क्यूसेक पाणी सोडावे लागले. पाणीसाठ्याचे नियोजन केले असते तर सांगलीतील पाणीपातळी पाच ते सहा फुटाने कमी झाली असती, असे सर्वोदय साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, धरणांना भेटी दिल्या; पण त्यांचे नियोजन फसल्याचा आरोपही पवार यांनी केला. ते म्हणाले की, कोयना धरणात ३१ जुलैपर्यंत ५० टक्के पाणीसाठा हवा होता. तो २३ जुलैलाच ८० टक्के इतका होता. नियमानुसार ५२ टीएमसी पाणीसाठा कोयना धरण अपेक्षित होते. त्यात दोन दिवसांत अतिवृष्टीमुळे १८ ते २० टीएमसी पाणी आले असते. त्यामुळे धरणात ७० टीएमसी पाणीसाठा झाला असता. परिणामी धरणातून पाणी सोडावे लागले नसते.

सांगलीत ५५ फूट पाणीपातळी असताना आयर्विन पुलाजवळ दोन लाख ६ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यात धरणातील ५० हजार क्युसेक कमी झाले असता तर दीड लाख क्युसेक सांगलीत विसर्ग असता. परिणामी नदीची पातळी पाच फुटांनी कमी झाली असती. सांगलीत पुराचे पाणी ५० फुटापर्यंतच स्थिर झाले असते आणि जयंत पाटील यांचा अंदाज खरा ठरला असता; पण जलसंपदा विभाग व त्या खात्याचे मंत्री पाटील यांच्या ढिसाळ नियोजनामुळे सांगलीत पुराचे पाणी पाच फूट वाढल्याचा आरोप केला.

चौकट

वडनेरे समितीचा अहवाल गुंडाळला

नंदकुमार वडनेरे समितीने पूर नियंत्रणाबाबत दोन वर्षांपूर्वी अहवाल दिला आहे; पण हा अहवालच शासन व जलसंपदा विभागाने बसनात गुंडाळून ठेवल्याचा आरोप पृथ्वीराज पवार यांनी केला. याशिवाय हवामान खात्याने मे महिन्यात अतिवृष्टीचे भाकित केले होते. रेड झोन, येलो झोनचा अलर्ट दिला होता. त्याकडेही काणाडोळा करण्यात आल्याचे ते म्हणाले.