शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

टेंभूच्या निधीसाठी दिल्लीपर्यंत धडक देणार

By admin | Updated: June 27, 2014 00:44 IST

वैभव नायकवडी : दुष्काळग्रस्तांचा अंत पाहू नका; अन्यथा जनता राज्यात सत्तांतर घडवेल!

आटपाडी : शासनाने आता दुष्काळी भागातील लोकांचा अंत पाहू नये. राज्यकर्त्यांनी दिल्लीत ताकद लावून राज्य आणि केंद्र शासनाने तातडीने निधी देऊन दुष्काळी भागातील सिंचन योजना पूर्ण कराव्यात. राज्यकर्त्यांनी दुष्काळी भागाचं दुखणं संपविलं नाही, तर त्यासाठी दुष्काळग्रस्त जनता राज्यात सत्तांतर घडवेल, तसेच टेंभू योजनेचा केंद्र शासनाच्या एआयबीपी योजनेत समावेश करण्यासाठी दिल्लीला धडक देण्याचा इशारा हुतात्मा किसन संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांनी दिला.शेतमजूर कष्टकरी-शेतकरी संघटना पाणी संघर्ष चळवळीच्यावतीने आटपाडीत भवानी हायस्कूलच्या मैदानावर आज (गुरुवारी) २१ व्या विजयी पाणी संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले. टेंभू योजनेचे पाणी आटपाडी तलावासह तालुक्यातील काही तलावांत पोहोचल्याबद्दल येथील व्यापारी पेठेतून वैभव नायकवडी यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. बसस्थानकापासून मिरवणुकीपुढे दुचाकी रॅली काढण्यात आली. रॅलीत मोठ्या संख्येने तरुण दुचाकीसह सामील झाले.परिषदेत नायकवडी म्हणाले, आता आटपाडी तलावापर्यंत आणि बुध्दिहाळ तलावात म्हणजे सांगोला तालुक्यात पाणी पोहोचले आहे. शेवटच्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळेपर्यंत चळवळीच्यावतीने रेटा लावला जाईल. याआधीच पाणी आले असते, पण सरकारने निधीबाबत अनेकवेळा हात आखडता घेतला. अनुशेषाचे कारण सांगितले तर या भागाला आलेला निधी दुसऱ्यांनीच पळविला. आता टेंभूसाठी शासनाने मंजूर केलेला निधी तातडीने खात्यावर वर्ग केला पाहिजे. त्यातही आटपाडी आणि सांगोला तालुक्यातील कामासाठी जास्त निधी दिला गेला पाहिजे. टेंभूचा केंद्र शासनाच्या एआयबीपी योजनेत समावेश झाला, अशी चुकीची माहिती नेत्यांनी सांगून दिशाभूल केली. नागनाथअण्णांनी जे स्वप्न बघितलं, ते पूर्ण करण्यासाठी साद द्या, असे आवाहन त्यांनी केले.गणपतराव देशमुख म्हणाले, नागनाथअण्णांनी चळवळ हाती घेतली नसती, तर सरकारने दुष्काळी भागासाठी प्रकल्प हाती घेतला नसता.यंदा कर्नाटक सरकारने पाटबंधारे विभागासाठी १६ हजार कोटींची तरतूद केली आहे, तर महाराष्ट्र शासन गेल्या तीन ते चार वर्षांत ५ हजार कोटींपेक्षा जादा तरतूद करीत नाही. आंध्रप्रदेशप्रमाणे शासनाने पाटबंधारेच्या जमिनी विकून प्रकल्प पूर्ण केले पाहिजेत. पाटबंधारेकडील १० टक्के जमिनी विकल्या तरी ६० हजार कोटींत मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प पूर्ण होतील. राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले की, संघटनेच्या माध्यमातून तेरा दुष्काळी तालुक्यातील प्रश्न सोडवावेत. दर सहा महिन्याला बैठक घेऊन दुष्काळी भागातील जनतेचे दु:ख हलके करावे. यावेळी प्रा. डॉ. बाबूराव गुरव, बाळासाहेब नायकवडी, प्रा. आर. एम. चोपडे, उस्मान नबी शेख, प्रा. शिवाजीराव काळुंगे, शिवाजीराव पाटील, बाळासाहेब बागवान, सभापती ताई मिसाळ, प्रा. विश्वंभर बाबर, दादासाहेब ढेरे, जालिंदर जमदाडे, हणमंतराव देशमुख, चंद्रकांत देशमुख, प्रा. पी. एन. देशमुख, सावंता पुसावळे, नानासाहेब राणे यांची भाषणे झाली. परिषदेस सुवर्णा देशमुख, सभापती अलका भोसले, डॉ. सुषमा नायकवडी, गौरव नायकवडी, भगवान पाटील, जयवंत अहिर, बळी भोरे, पं. स. सदस्य भागवत माळी, सुनीता गायकवाड उपस्थित होते. (प्रतिनिधी)