शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

टेंभूच्या निधीसाठी दिल्लीपर्यंत धडक देणार

By admin | Updated: June 27, 2014 00:44 IST

वैभव नायकवडी : दुष्काळग्रस्तांचा अंत पाहू नका; अन्यथा जनता राज्यात सत्तांतर घडवेल!

आटपाडी : शासनाने आता दुष्काळी भागातील लोकांचा अंत पाहू नये. राज्यकर्त्यांनी दिल्लीत ताकद लावून राज्य आणि केंद्र शासनाने तातडीने निधी देऊन दुष्काळी भागातील सिंचन योजना पूर्ण कराव्यात. राज्यकर्त्यांनी दुष्काळी भागाचं दुखणं संपविलं नाही, तर त्यासाठी दुष्काळग्रस्त जनता राज्यात सत्तांतर घडवेल, तसेच टेंभू योजनेचा केंद्र शासनाच्या एआयबीपी योजनेत समावेश करण्यासाठी दिल्लीला धडक देण्याचा इशारा हुतात्मा किसन संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांनी दिला.शेतमजूर कष्टकरी-शेतकरी संघटना पाणी संघर्ष चळवळीच्यावतीने आटपाडीत भवानी हायस्कूलच्या मैदानावर आज (गुरुवारी) २१ व्या विजयी पाणी संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले. टेंभू योजनेचे पाणी आटपाडी तलावासह तालुक्यातील काही तलावांत पोहोचल्याबद्दल येथील व्यापारी पेठेतून वैभव नायकवडी यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. बसस्थानकापासून मिरवणुकीपुढे दुचाकी रॅली काढण्यात आली. रॅलीत मोठ्या संख्येने तरुण दुचाकीसह सामील झाले.परिषदेत नायकवडी म्हणाले, आता आटपाडी तलावापर्यंत आणि बुध्दिहाळ तलावात म्हणजे सांगोला तालुक्यात पाणी पोहोचले आहे. शेवटच्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळेपर्यंत चळवळीच्यावतीने रेटा लावला जाईल. याआधीच पाणी आले असते, पण सरकारने निधीबाबत अनेकवेळा हात आखडता घेतला. अनुशेषाचे कारण सांगितले तर या भागाला आलेला निधी दुसऱ्यांनीच पळविला. आता टेंभूसाठी शासनाने मंजूर केलेला निधी तातडीने खात्यावर वर्ग केला पाहिजे. त्यातही आटपाडी आणि सांगोला तालुक्यातील कामासाठी जास्त निधी दिला गेला पाहिजे. टेंभूचा केंद्र शासनाच्या एआयबीपी योजनेत समावेश झाला, अशी चुकीची माहिती नेत्यांनी सांगून दिशाभूल केली. नागनाथअण्णांनी जे स्वप्न बघितलं, ते पूर्ण करण्यासाठी साद द्या, असे आवाहन त्यांनी केले.गणपतराव देशमुख म्हणाले, नागनाथअण्णांनी चळवळ हाती घेतली नसती, तर सरकारने दुष्काळी भागासाठी प्रकल्प हाती घेतला नसता.यंदा कर्नाटक सरकारने पाटबंधारे विभागासाठी १६ हजार कोटींची तरतूद केली आहे, तर महाराष्ट्र शासन गेल्या तीन ते चार वर्षांत ५ हजार कोटींपेक्षा जादा तरतूद करीत नाही. आंध्रप्रदेशप्रमाणे शासनाने पाटबंधारेच्या जमिनी विकून प्रकल्प पूर्ण केले पाहिजेत. पाटबंधारेकडील १० टक्के जमिनी विकल्या तरी ६० हजार कोटींत मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प पूर्ण होतील. राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले की, संघटनेच्या माध्यमातून तेरा दुष्काळी तालुक्यातील प्रश्न सोडवावेत. दर सहा महिन्याला बैठक घेऊन दुष्काळी भागातील जनतेचे दु:ख हलके करावे. यावेळी प्रा. डॉ. बाबूराव गुरव, बाळासाहेब नायकवडी, प्रा. आर. एम. चोपडे, उस्मान नबी शेख, प्रा. शिवाजीराव काळुंगे, शिवाजीराव पाटील, बाळासाहेब बागवान, सभापती ताई मिसाळ, प्रा. विश्वंभर बाबर, दादासाहेब ढेरे, जालिंदर जमदाडे, हणमंतराव देशमुख, चंद्रकांत देशमुख, प्रा. पी. एन. देशमुख, सावंता पुसावळे, नानासाहेब राणे यांची भाषणे झाली. परिषदेस सुवर्णा देशमुख, सभापती अलका भोसले, डॉ. सुषमा नायकवडी, गौरव नायकवडी, भगवान पाटील, जयवंत अहिर, बळी भोरे, पं. स. सदस्य भागवत माळी, सुनीता गायकवाड उपस्थित होते. (प्रतिनिधी)