शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमावर्ती राज्यांमध्ये उद्या होणारा मॉक ड्रिल पुढे ढकलला; 'ऑपरेशन शील्ड'ची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार
2
पुण्यात झाड कोसळून १ ठार; कोल्हापुरात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना
3
एक वर्षानंतर 'कोविड पॉझिटिव्हिटी दर जास्त, NB.1.8.1 व्हेरिएंट वाढले'; WHO ने दिला इशारा
4
शस्त्र परवान्यासाठी गोळीबाराचा बनाव; शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांना अटक
5
Vaishnavi Hagawane Death Case :'आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास'; हगवणेंच्या वकिलांच्या युक्तीवादावर वैष्णवीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया
6
हगवणे बंधूंनी नीलेश चव्हाणच्या मदतीने केला आई, बहिणीचा मोबाईल लंपास; पोलिसांची कोर्टात माहिती
7
Rohit Sharma Gautam Gambhir, IND vs ENG: खुद्द रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यासाठी 'या' व्यक्तीबद्दल गौतम गंभीरकडे केली विनंती
8
सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांची हिंडेनबर्ग रिपोर्टच्या आरोपातून सुटका! लोकपालांनी दिली क्लीनचिट
9
आमच्याकडे ५ कोटींच्या गाड्या; आम्ही ४० लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करु - हगवणेंचे वकील
10
पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
11
पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटपटूचे दोन्ही पाय कापून टाकले, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल वाईट
12
टॅरिफ आवश्यक, अन्यथा भारत-पाकिस्तान युद्धविराम भंग होऊ शकतो; ट्रम्प सरकारचा अमेरिकन न्यायालयात दावा
13
वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद
14
ड्रोन हल्ल्यांपासून वाचण्याचे मार्ग, ऑपरेशन शील्ड' अंतर्गत उद्या या ४ राज्यांमध्ये मॉक ड्रिल होणार
15
आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; वाचकांचा विश्वास जिंकला, मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला'
16
माजी मंत्र्याचा सचिव, पाकिस्तानला पुरवत होता गुप्त माहिती! जैसलमेरमधून पकडला गेला आणखी एक गद्दार
17
इलॉन मस्क यांना नकार देणे 'अ‍ॅपल'ला महागात पडले; आयफोन वापरकर्त्यांना ही खास सेवा मिळत नाही
18
'मला रात्री घराबाहेर काढलं', परिणय फुकेंवर प्रिया फुकेंचे आरोप; सुषमा अंधारेंनी CM फडणवीसांना केली विनंती
19
बेडरूममध्ये बसली होती सवत, बघताच पहिल्या पत्नीला संताप झाला अनावर! पुढे पतीने जे केले, ते वाचून व्हाल हैराण
20
सर्वात मोठा खुलासा; पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड...

टेंभूच्या निधीसाठी दिल्लीपर्यंत धडक देणार

By admin | Updated: June 27, 2014 00:44 IST

वैभव नायकवडी : दुष्काळग्रस्तांचा अंत पाहू नका; अन्यथा जनता राज्यात सत्तांतर घडवेल!

आटपाडी : शासनाने आता दुष्काळी भागातील लोकांचा अंत पाहू नये. राज्यकर्त्यांनी दिल्लीत ताकद लावून राज्य आणि केंद्र शासनाने तातडीने निधी देऊन दुष्काळी भागातील सिंचन योजना पूर्ण कराव्यात. राज्यकर्त्यांनी दुष्काळी भागाचं दुखणं संपविलं नाही, तर त्यासाठी दुष्काळग्रस्त जनता राज्यात सत्तांतर घडवेल, तसेच टेंभू योजनेचा केंद्र शासनाच्या एआयबीपी योजनेत समावेश करण्यासाठी दिल्लीला धडक देण्याचा इशारा हुतात्मा किसन संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांनी दिला.शेतमजूर कष्टकरी-शेतकरी संघटना पाणी संघर्ष चळवळीच्यावतीने आटपाडीत भवानी हायस्कूलच्या मैदानावर आज (गुरुवारी) २१ व्या विजयी पाणी संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले. टेंभू योजनेचे पाणी आटपाडी तलावासह तालुक्यातील काही तलावांत पोहोचल्याबद्दल येथील व्यापारी पेठेतून वैभव नायकवडी यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. बसस्थानकापासून मिरवणुकीपुढे दुचाकी रॅली काढण्यात आली. रॅलीत मोठ्या संख्येने तरुण दुचाकीसह सामील झाले.परिषदेत नायकवडी म्हणाले, आता आटपाडी तलावापर्यंत आणि बुध्दिहाळ तलावात म्हणजे सांगोला तालुक्यात पाणी पोहोचले आहे. शेवटच्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळेपर्यंत चळवळीच्यावतीने रेटा लावला जाईल. याआधीच पाणी आले असते, पण सरकारने निधीबाबत अनेकवेळा हात आखडता घेतला. अनुशेषाचे कारण सांगितले तर या भागाला आलेला निधी दुसऱ्यांनीच पळविला. आता टेंभूसाठी शासनाने मंजूर केलेला निधी तातडीने खात्यावर वर्ग केला पाहिजे. त्यातही आटपाडी आणि सांगोला तालुक्यातील कामासाठी जास्त निधी दिला गेला पाहिजे. टेंभूचा केंद्र शासनाच्या एआयबीपी योजनेत समावेश झाला, अशी चुकीची माहिती नेत्यांनी सांगून दिशाभूल केली. नागनाथअण्णांनी जे स्वप्न बघितलं, ते पूर्ण करण्यासाठी साद द्या, असे आवाहन त्यांनी केले.गणपतराव देशमुख म्हणाले, नागनाथअण्णांनी चळवळ हाती घेतली नसती, तर सरकारने दुष्काळी भागासाठी प्रकल्प हाती घेतला नसता.यंदा कर्नाटक सरकारने पाटबंधारे विभागासाठी १६ हजार कोटींची तरतूद केली आहे, तर महाराष्ट्र शासन गेल्या तीन ते चार वर्षांत ५ हजार कोटींपेक्षा जादा तरतूद करीत नाही. आंध्रप्रदेशप्रमाणे शासनाने पाटबंधारेच्या जमिनी विकून प्रकल्प पूर्ण केले पाहिजेत. पाटबंधारेकडील १० टक्के जमिनी विकल्या तरी ६० हजार कोटींत मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प पूर्ण होतील. राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले की, संघटनेच्या माध्यमातून तेरा दुष्काळी तालुक्यातील प्रश्न सोडवावेत. दर सहा महिन्याला बैठक घेऊन दुष्काळी भागातील जनतेचे दु:ख हलके करावे. यावेळी प्रा. डॉ. बाबूराव गुरव, बाळासाहेब नायकवडी, प्रा. आर. एम. चोपडे, उस्मान नबी शेख, प्रा. शिवाजीराव काळुंगे, शिवाजीराव पाटील, बाळासाहेब बागवान, सभापती ताई मिसाळ, प्रा. विश्वंभर बाबर, दादासाहेब ढेरे, जालिंदर जमदाडे, हणमंतराव देशमुख, चंद्रकांत देशमुख, प्रा. पी. एन. देशमुख, सावंता पुसावळे, नानासाहेब राणे यांची भाषणे झाली. परिषदेस सुवर्णा देशमुख, सभापती अलका भोसले, डॉ. सुषमा नायकवडी, गौरव नायकवडी, भगवान पाटील, जयवंत अहिर, बळी भोरे, पं. स. सदस्य भागवत माळी, सुनीता गायकवाड उपस्थित होते. (प्रतिनिधी)