शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

पोषण आहारातून तूरडाळ गायब

By admin | Updated: November 9, 2015 23:28 IST

भाववाढीचा फटका : अंगणवाड्या, प्राथमिक शाळांमध्ये चवळीचा वापर

गजानन पाटील - संख वाढत्या महागाईचे चटके जत तालुक्यातील शाळकरी मुलांनाही जाणवू लागले आहेत. तूरडाळीचे दर गगनाला भिडले असल्याने शालेय पोषण आहारातून तूरडाळीचे वरण गायब झाले आहे. तूरडाळीऐवजी चवळीचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे. तांदूळ व धान्य पुरवठादाराने चवळी पुरवण्यास सुरुवात केली आहे. सध्या बेचव चवळीचे वरण, आमटी खाण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे.केंद्र शासन व राज्य शासनाकडून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत १ ली ते ५ वी पर्यंतच्या प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक व १२ ग्रॅम प्राथिनेयुक्त व ६ वी ते ८ वीपर्यंतच्या उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार देण्यात येतो. या योजनेत केंद्र शासनाकडून प्रतिदिन प्रतिविद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी १०० ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी १५० ग्रॅम तांदूळ पुरविण्यात येतो.अन्न शिजविण्यासाठी दरदिवशी प्रतिलाभार्थी ३.५९ पैसे आणि ५.३८ रुपये खर्च दिला जात होता. आता त्यात केंद्र सरकारने ५ टक्के दरवाढही केली आहे. ग्रामीण भागातील शाळास्तरावर शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पाककृतीच्या अंमलबजावणीत २०११ च्या शासन निर्णयानुसार तुरडाळीचा समावेश करण्यात आला होता. पण पुरवठादाराने दुष्काळजन्य परिस्थितीमुळे बाजारात तुरडाळीचा दर्जा चांगला नसल्याचे कारण समोर करुन तूरडाळीऐवजी मुगाच्या डाळीचा पाककृतीत समावेश करण्यास सांगितले.धान्याच्या पुरवठ्याची जबाबदारी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांकडे आहे. त्यांनी जिल्हा परिषदेला पत्र पाठवून मंजुरी मागितली होती. जिल्हा परिषदेने त्यासाठी नुकतीच मान्यता प्रदान केली आहे. सध्या तूरडाळीचा दर गगनाला भिडला आहे. बाजारात २२० रुपयेपर्यंत दर वाढला आहे.कमी पटसंख्या असलेल्या शाळा व विशेषत: दुर्गम भागातील शाळा मुलांना खाण्यासाठी लागणारा मसाले भात शाळेतच शिजवतात. गावातील महिला बचत गट किंवा संस्थांकडूनच भात शिजवून घेतला जातो. कंत्राटदारांकडून शाळेतील पटसंख्येच्या प्रमाणात तांदूळ, तेल, डाळ, मीठ, मिरचीसह आवश्यक तो माल महिन्या-महिन्याला पोहोच केला जातो. बाजारात दर वाढला म्हणून शालेय पोषण आहारातून तूरडाळ हद्दपार झाली आहे. मुलांना तूरडाळ वरण मिळणार नाही. मुले भात खाणार नाहीत. शासनाने पूर्वीप्रमाणे तूरडाळच पुरवावी. - विलास शिंदे, पालकशिक्षकही वैतागलेमुलांना तूरडाळीऐवजी चवळीची भाजी मिळणार आहे.पोषण आहारात विविधता असावी, अशी अपेक्षा असताना एकीकडे खिचडी खाऊन कंटाळलेले विद्यार्थी आणि दुसरीकडे शिकविण्यासोबत आहाराकडे लक्ष देण्याच्या कामामुळे वैतागलेले आहेत.महागाई : चवळीच्या वरणाला चवच नाहीतूरडाळ व चवळी डाळ या दोन्ही डाळींच्या प्रथिनमूल्यांमध्ये फरक नसला तरी, चवीत फरक आहे. तूरडाळीचे वरण चवीला चविष्ट आहे, तर चवळीच्या डाळीचे वरण, आमटी सपक आहे. अशा परिस्थितीत तूरडाळ चांगली, पण महागडी म्हणून चवळी वापरण्याचा ठेकेदाराचा हट्ट बालकांना पचणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.तूरडाळ१८०रूपये किलोगेल्या काही दिवसात दरामध्ये काहीशी घसरण झाली असली तरी, अजूनही १६० ते १८० रुपये किलो दराने तूरडाळीची विक्री होत आहे. संबंधित पुरवठादाराने बाजारात चांगल्या दर्जाची तुरडाळ उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले असले तरी, सणासुदीच्या काळात महागलेली तूरडाळ पुरविणे शक्य होणार नाही. हे ओळखून चवळीचा पर्याय स्वीकारल्याचे दिसत आहे.