शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचा न मागता पाठिंबा कशासाठी?

By admin | Updated: July 6, 2015 00:24 IST

राजू शेट्टी : आताच्या परिस्थितीला शरद पवारच कारणीभूत

सांगली : सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा सल्ला आम्हाला देणाऱ्या आ. जयंत पाटील यांनी, अगोदर भाजप सरकारला न मागता पाठिंबा कशासाठी दिला?, या प्रश्नाचे उत्तर द्यावे, असे आव्हान खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे. ऊस दराच्या सध्याच्या परिस्थितीला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारच कारणीभूत आहेत, असाही आरोप त्यांनी केला आहे. प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, पुरोगामित्वाचा टेंभा मिरविणाऱ्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनेच भाजपला न मागता पाठिंबा जाहीर केला होता. त्यामागचा त्यांचा हेतू काय होता? याचा खुलासा जयंतरावांनी करावा. सत्तेत असूनही स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतीमालाला योग्य भाव मिळावा म्हणून सरकारशी दोन हात करीत आहे. जयंतरावांनी पंधरा वर्षे मंत्री असताना उसाच्या दराबाबत कधी तोंड तरी उघडले होते का? एफआरपी साखरेच्या दरावर कधीच ठरविली जात नाही. कृषिमूल्य आयोगाने महागाईचा निर्देशांक गृहित धरून तसेच उसासाठी लागणारे बियाणे, वीज, पाणी, घसारा, मजुरी आदी गोष्टींसंदर्भात राज्य सरकारकडून माहिती मागवून घेऊन एफआरपी ठरविली जाते. जयंत पाटील यांनी अगोदर या गोष्टीचा अभ्यास करावा आणि मगच भाष्य करावे. गेल्या दहा वर्षात साखर निर्यातीचे धोरण कोणी घेतले? त्यावेळी साखर आयात कोणी केली, निर्यात कोणी केली? एकूणच या व्यवहारात कोणाचा आर्थिक फायदा झाला, या सर्व गोष्टींच्या चौकशीची मागणी जयंतरावांनी करावी. अशी मागणी केल्यास आपण त्यांना लगेच पाठिंबा जाहीर करू. साखरेच्या दराचे कारण सांगून शेतकऱ्यांना फसविण्याचे उद्योग बंद करावेत. पवारांच्या कालावधित साखरेचे दर अनेकदा पाडण्यात आले होते. त्यावेळी शेतकऱ्यांना अनुदान का दिले गेले नाही? शेतकऱ्यांना एफआरपी मिळावा म्हणून जयंत पाटील यांनी आजवर काय प्रयत्न केलेत, ते अगोदर स्पष्ट करावे. याउलट स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोणते प्रयत्न केले, त्याचा हिशेब देण्यास आम्ही तयार आहोत. (प्रतिनिधी)नागपंचमीसाठी काय केले?गेल्या पाच वर्षात केंद्रात व राज्यात जयंत पाटील यांचीच सत्ता होती. ते स्वत: एक जबाबदार मंत्री होते. शिराळ्यातील नागपंचमीसाठी त्यांनी काय केले, याचा खुलासा करावा. सत्ता गेल्यामुळे जयंतराव बिथरले आहेत. सत्तेशिवाय जगणे त्यांना असह्य होत आहे. त्यामुळेच त्यांची केविलवाणी धडपड सुरू असल्याची टीका त्यांनी केली. ...तर पाठिंबा काढला असताआमच्या एका पक्षाचा पाठिंबा काढून घेण्याने सरकार कोसळत असते, तर आम्ही केव्हाच पाठिंबा काढून घेतला असता, असे मतही त्यांनी व्यक्त केले. स्वाभिमानीचे सदाभाऊ खोत आणि भाजपचे शिवाजीराव नाईक मंत्री झाले, तर आपली काय अवस्था होईल, याची जयंतरावांना धास्ती लागली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.