शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

इथं चार पिढ्यांपासून दूध विकलं जात नाही!

By admin | Updated: July 12, 2015 00:41 IST

सासपडेतील चित्र : दुग्धजन्य पदार्थांचाही घरीच वापर, परंपरेमुळे गावाला आलं गोकुळाचं रूप

मोहन मोहिते / वांगी ग्रामीण भागात कुटुंबाला आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी शेतीला दुग्धोत्पादनाची जोड देणारी ‘श्वेतक्रांती’ साऱ्या महाराष्ट्रभर घडून आली, मात्र, याला अपवाद ठरले आहे, कडेगाव तालुक्यातील सासपडे गाव. गेल्या चार पिढ्यांपासून या गावातील दूध उत्पादक दुधाची विक्री न करता ते घरातच वापरतात. त्यामुळे सासपडे गाव ‘गोकुळ’ बनले आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगावपासून १३ किलोमीटरवर असलेले आणि नांदणी नदीकाठी वसलेले सासपडे हे पोळ भावकी मोठ्या प्रमाणात असणारे गाव. गावात दोन हजार लोकसंख्या. शेती हाच प्रमुख व्यवसाय असलेल्या येथील शेतकऱ्यांना आता टेंभू योजनेचे पाणी मिळाल्याने हरितक्रांतीचे पर्व सुरू झाले आहे. त्यामुळे जनावरांचीही संख्या ६०० ते ७०० आहे. दुभत्या जनावरांची संख्याही मोठी असल्याने प्रतिदिन ८०० लिटर दूध उत्पादित होते. पण हे दूध विक्री न करता घरीच वापरले जाते किंवा गावातच उसनवारीने दिले जाते! चार पिढ्यांपासून घरातील जनावरांच्या दुधाची विक्रीच केली जात नसल्याने, सासपडे गाव ‘गोकुळनगरी’ म्हणून ओळखले जात आहे. दुधापासून तयार होणारे दही, लोणी, ताक, तूप यासह अन्य दुग्धजन्य पदार्थ घरीच खाण्यासाठी वापरले जातात किंवा ते पै-पाहुणे, शेजाऱ्यांना दिले जातात. पण त्यांची विक्री होत नाही. त्यामुळे गावात एकही दूध संकलन केंद्र किंवा गवळीबांधव दूध खरेदीसाठी फिरकत नाहीत! १९९५ मध्ये तत्कालीन माजी आमदार संपतराव देशमुख यांनी सासपडेत शेतीपूरक दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन, दूध विक्रीबाबतचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना बॅँकेकडून कर्ज उपलब्ध करून देऊन ५० जर्सी व होस्टन गाई खरेदी करून दिल्या. गावात दूध संकलन केंद्र सुरू केले. त्यावेळी प्रतिदिन सुमारे २५० ते ३०० लिटर दूध संकलन होत होते. मात्र, काही दिवसातच यातील काही गार्इंचा मृत्यू झाला, तर बऱ्याच गाई वांझ राहिल्या. दुधाची विक्री केल्यानेच देवीचा कोप झाल्याचा गावकऱ्यांचा समज झाला आणि त्यांनी पुन्हा दूध विक्रीचा नादच सोडला. देवीचा कोप की मल्लांची परंपरा?प्रस्तुत प्रतिनिधीने गावातील जुन्या-जाणत्या मंडळींना विचारले असता, काहींनी सांगितले की, पूर्वी डोंगराई देवीच्या महिला भक्ताने दुधाची विक्री न करता ते गावातच व कुटुंबातच वापरले जाईल, असे वचन दिले होते. त्यामुळे दुधाची विक्री होत नाही. काही जाणकारांनी सांगितले की, पूर्वी गावात पैलवानांची संख्या मोठी होती. गावात खाशाबा कृष्णा पोळ, गणपत ज्ञानू पोळ, गजेराव पोळ आदी नामवंत मल्ल होऊन गेले. या गावाला मल्लांचा वारसा आहे. त्यामुळे पूर्वीपासून दुधाचा वापर घरातच व्हावा यासाठी दूध विक्री न करण्याचा निर्णय जुन्या पिढीतील लोकांनी घेतला असावा. ‘कामधेनू दत्तक’चे गाव याबाबत पशुधन विकास अधिकारी डॉ. ऋषिकेश शिंदे म्हणाले की, हे गाव जिल्हा परिषदेच्या कामधेनू दत्तक योजनेत घेतले आहे. येथील जनावरांच्या वांझ समस्येवर उपचार सुरू केले आहेत. योग्य पोषण आहार न मिळालेल्या जनावरांमध्येच मृत्युमुखी पडणे, वांझ राहणे आदी समस्या दिसून येतात. त्यासाठी आम्ही या योजनेमार्फत प्रयत्नशील राहून जनावरांवर योग्य उपचार सुरू केले आहेत. भविष्यात दुधाची विक्री करण्यासाठी गावकऱ्यांना प्रोत्साहित केले जाईल.