शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

महापौरांची ‘बोलाचीच कढी, बोलाचाच भात!’

By admin | Updated: November 1, 2015 23:51 IST

चर्चा एक, बैठक दुसरीच : नागरी समस्या सुटणार कशा?, निर्णयाची अंमलबजावणी आवश्यक

शीतल पाटील ल्ल सांगली महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी, भाजपसह सर्वच राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनी कचरा उठाव, स्वच्छता, ड्रेनेज गळती या नागरी प्रश्नांवर पोटतिडकीने भूमिका मांडली. या समस्यांच्या निराकरणासाठी दुसऱ्याचदिवशी महापौर विवेक कांबळे यांनी बैठक घेण्याचे ग्वाही दिली. ही बैठकही झाली, पण त्यात मूळ समस्यांऐवजी इतर विषयांचीच अधिक चर्चा झाली. कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. या बैठकीचे प्रयोजन म्हणजे महापौरांची ‘बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात...’ ठरल्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे. महासभेत सर्वपक्षीय सदस्यांनी प्रथमच नागरी प्रश्नांवर आवाज उठविला. गेल्या दोन वर्षात महासभेचे सभागृह केवळ टीका, आरोप-प्रत्यारोपाच्या आखाड्यासाठीच होते. महापौर कांबळे यांनीही सर्वच सदस्यांना भावना व्यक्त करण्याची संधी दिली, हे विशेष. शहरातील रस्त्या-रस्त्यावर कचरा पडला आहे. कचरा उठावची यंत्रणा कोलमडली आहे. कॉम्पॅक्टर बंद आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. साथीचे आजार फैलावत आहेत. सांगली, मिरज या दोन्ही शहरातील ड्रेनेज यंत्रणेला गळती लागली आहे. चौका-चौकात ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरून वहात आहे, अशा अनेक समस्या नगरसेवकांनी मांडल्या. या साऱ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन महापौरांनी दुसऱ्यादिवशी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन समस्यांचे निराकरण करण्याची घोषणा केली. ठरल्यानुसार ही बैठकही झाली; पण बैठकीत मूळ नागरी समस्यांवर फार काळ चर्चा झाली नाही. महासभेत ओरडणारे नगरसेवक बैठकीत मात्र नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमणे, खुल्या भूखंडावरील अतिक्रमणांवर चर्चा गाजली. पुन्हा बिल्डर लॉबीवर टीका झाली. नेमके या नगरसेवकांना कोणत्या विषयावर चर्चा करायची होती, हेच कळलेले दिसत नाही, तोच प्रकार महापौरांच्या बाबतीत! वस्तुत: बैठकीत कचरा उठाव, स्वच्छता या अनुषंगाने चर्चा अपेक्षित होती. या दोन्ही विषयांवर चर्चा झाली, पण त्यापेक्षा गाजले ते नाले व खुल्या भूखंडावरील अतिक्रमणे. हा विषय गेली कित्येक वर्षे चर्चिला जात आहे. आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहराची स्वच्छता हा महत्त्वाचा विषय होता; पण त्यावर जुजबी चर्चा झाली, हे नागरिकांचे दुर्दैव म्हणावे लागेल. बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांच्या भरतीचे काय झाले? त्यावर कार्यवाही कधी होणार? कंटेनर खरेदी केले आहेत, पण त्यांचे वाटप झालेले नाही, ते किती दिवसात होणार? कॉम्पॅक्टर बंद पडले आहेत, त्याचे काय? कर्मचारी कामाला वेळेवर येत नाही, ही तक्रार तर गेली कित्येक वर्षे सुरू आहे. केवळ कारवाईच्या घोषणा होतात, प्रत्यक्षात कारवाई शून्य. त्याचे काय करणार? स्वच्छता निरीक्षकांकडे विविध परवान्यांचे अधिकार आहेत. त्यामुळे ते प्रभागात फिरत नाही, हे परवान्याचे अधिकार काढून घेणार का? संगीता हारगे यांनी प्रभागात ड्रेनेज गळतीचे काम सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार दुसऱ्या दिवशी काम सुरू झाले का? इतर ठिकाणच्या ड्रेनेज गळतीचे काय झाले? अशा कित्येक प्रश्नांची उत्तरे बैठकीतून अपेक्षित होती. पण नेहमीप्रमाणे ही बैठकही केवळ फार्सच ठरली. सफाई झाली पाहिजे, कर्मचाऱ्यांवर कारवाई करू, अशा घोषणा आवाज चढवून महापौरांनी केल्या आहेत. आयुक्तांवर संताप : महापौरही टार्गेट नागरी समस्या मांडताना साऱ्यांचाच रोख आयुक्त अजिज कारचे यांच्याकडे होता. त्यात काही वावगेही नाही. प्रशासनावर वचक नसल्याची थेट टीका आयुक्तांवर झाली. घर ते कार्यालय असा प्रकार करू नका, असे साकडेही घातले. केवळ आयुक्तच नव्हे, तर महापौरांवरही अप्रत्यक्ष टीका झाली. महासभेत निर्णय होतात, पण त्यांची अंमलबजावणी होत नाही. महापौर केवळ मोठे बोलतात, प्रत्यक्षात काहीच करीत नसल्याचा टोला काहींनी लगाविला.