शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

महापौरांची ‘बोलाचीच कढी, बोलाचाच भात!’

By admin | Updated: November 1, 2015 23:51 IST

चर्चा एक, बैठक दुसरीच : नागरी समस्या सुटणार कशा?, निर्णयाची अंमलबजावणी आवश्यक

शीतल पाटील ल्ल सांगली महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी, भाजपसह सर्वच राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनी कचरा उठाव, स्वच्छता, ड्रेनेज गळती या नागरी प्रश्नांवर पोटतिडकीने भूमिका मांडली. या समस्यांच्या निराकरणासाठी दुसऱ्याचदिवशी महापौर विवेक कांबळे यांनी बैठक घेण्याचे ग्वाही दिली. ही बैठकही झाली, पण त्यात मूळ समस्यांऐवजी इतर विषयांचीच अधिक चर्चा झाली. कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. या बैठकीचे प्रयोजन म्हणजे महापौरांची ‘बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात...’ ठरल्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे. महासभेत सर्वपक्षीय सदस्यांनी प्रथमच नागरी प्रश्नांवर आवाज उठविला. गेल्या दोन वर्षात महासभेचे सभागृह केवळ टीका, आरोप-प्रत्यारोपाच्या आखाड्यासाठीच होते. महापौर कांबळे यांनीही सर्वच सदस्यांना भावना व्यक्त करण्याची संधी दिली, हे विशेष. शहरातील रस्त्या-रस्त्यावर कचरा पडला आहे. कचरा उठावची यंत्रणा कोलमडली आहे. कॉम्पॅक्टर बंद आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. साथीचे आजार फैलावत आहेत. सांगली, मिरज या दोन्ही शहरातील ड्रेनेज यंत्रणेला गळती लागली आहे. चौका-चौकात ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरून वहात आहे, अशा अनेक समस्या नगरसेवकांनी मांडल्या. या साऱ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन महापौरांनी दुसऱ्यादिवशी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन समस्यांचे निराकरण करण्याची घोषणा केली. ठरल्यानुसार ही बैठकही झाली; पण बैठकीत मूळ नागरी समस्यांवर फार काळ चर्चा झाली नाही. महासभेत ओरडणारे नगरसेवक बैठकीत मात्र नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमणे, खुल्या भूखंडावरील अतिक्रमणांवर चर्चा गाजली. पुन्हा बिल्डर लॉबीवर टीका झाली. नेमके या नगरसेवकांना कोणत्या विषयावर चर्चा करायची होती, हेच कळलेले दिसत नाही, तोच प्रकार महापौरांच्या बाबतीत! वस्तुत: बैठकीत कचरा उठाव, स्वच्छता या अनुषंगाने चर्चा अपेक्षित होती. या दोन्ही विषयांवर चर्चा झाली, पण त्यापेक्षा गाजले ते नाले व खुल्या भूखंडावरील अतिक्रमणे. हा विषय गेली कित्येक वर्षे चर्चिला जात आहे. आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहराची स्वच्छता हा महत्त्वाचा विषय होता; पण त्यावर जुजबी चर्चा झाली, हे नागरिकांचे दुर्दैव म्हणावे लागेल. बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांच्या भरतीचे काय झाले? त्यावर कार्यवाही कधी होणार? कंटेनर खरेदी केले आहेत, पण त्यांचे वाटप झालेले नाही, ते किती दिवसात होणार? कॉम्पॅक्टर बंद पडले आहेत, त्याचे काय? कर्मचारी कामाला वेळेवर येत नाही, ही तक्रार तर गेली कित्येक वर्षे सुरू आहे. केवळ कारवाईच्या घोषणा होतात, प्रत्यक्षात कारवाई शून्य. त्याचे काय करणार? स्वच्छता निरीक्षकांकडे विविध परवान्यांचे अधिकार आहेत. त्यामुळे ते प्रभागात फिरत नाही, हे परवान्याचे अधिकार काढून घेणार का? संगीता हारगे यांनी प्रभागात ड्रेनेज गळतीचे काम सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार दुसऱ्या दिवशी काम सुरू झाले का? इतर ठिकाणच्या ड्रेनेज गळतीचे काय झाले? अशा कित्येक प्रश्नांची उत्तरे बैठकीतून अपेक्षित होती. पण नेहमीप्रमाणे ही बैठकही केवळ फार्सच ठरली. सफाई झाली पाहिजे, कर्मचाऱ्यांवर कारवाई करू, अशा घोषणा आवाज चढवून महापौरांनी केल्या आहेत. आयुक्तांवर संताप : महापौरही टार्गेट नागरी समस्या मांडताना साऱ्यांचाच रोख आयुक्त अजिज कारचे यांच्याकडे होता. त्यात काही वावगेही नाही. प्रशासनावर वचक नसल्याची थेट टीका आयुक्तांवर झाली. घर ते कार्यालय असा प्रकार करू नका, असे साकडेही घातले. केवळ आयुक्तच नव्हे, तर महापौरांवरही अप्रत्यक्ष टीका झाली. महासभेत निर्णय होतात, पण त्यांची अंमलबजावणी होत नाही. महापौर केवळ मोठे बोलतात, प्रत्यक्षात काहीच करीत नसल्याचा टोला काहींनी लगाविला.