शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

जैवविविधता कायम राखून विकास साधावा

By admin | Updated: July 28, 2016 01:17 IST

कस्तुरीरंगन यांचे आवाहन : लोकांशी संवाद साधून सरकारने अहवालाबाबत निर्णय घ्यावा

कोल्हापूर : पश्चिम घाटातील जैवविविधतेला धक्का न लावता, ती कायम राखत याठिकाणी सेवा-सुविधांचे जाळे आणि विकास साधण्यास हरकत नाही. या घाटात जे वास्तव दिसले ते अहवालातून मांडले असून तो समतोल आहे. या अहवालाच्या अंमलबजावणीचा निर्णय सरकारने लोकांशी संवाद साधून घ्यावा, असे आवाहन भारतीय अवकाश संशोधन केंद्राचे (इस्रो) माजी अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी बुधवारी येथे केले.अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था (आयएसटीई) व शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय व्याख्यानमालेच्या प्रारंभानिमित्त डॉ. कस्तुरीरंगन कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. कस्तुरीरंगन म्हणाले, पश्चिम घाटात सहा राज्यांतील सुमारे पाच कोटी लोक राहतात. त्यांचा उदरनिर्वाह या घाटातील जैवविविधतेवर अवलंबून आहे. त्यामुळे जैवविविधतेच्या सुरक्षेचे कारण सांगून त्यांच्यावर गंडांतर आणता येणार नाही. सरकारने येथील जैवविविधतेच्या सुरक्षेसाठी संबंधित लोकांना साक्षर केले पाहिजे. त्यांना अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या वापरासाठी प्रवृत्त केले पाहिजे. पर्यावरणाला बाधा पोहोचणार नाही, अशा स्वरूपातील रोजगारनिर्मिती करण्यावर भर देणे आवश्यक आहे. विविध घटक, बाबींचा अभ्यास करून पश्चिम घाटाबाबतचा समतोल अहवाल तयार केला. यासाठी तज्ज्ञांची मदत, नवतंत्रज्ञानाचा वापर आणि स्थानिक लोकांशी संवाददेखील साधला. संबंधित अहवाल सरकारला सादर केला. मार्गदर्शक सूचनांसह त्याची अंमलबजावणी करण्याचे काम सरकारचे आहे. सरकारने लोकांशी संवाद साधून याबाबतचा निर्णय घ्यावा. अवकाश संशोधनाबाबतच्या केंद्र सरकारच्या भूमिकेबद्दल त्यांनी सांगितले की, अवकाश संशोधनाला सरकारचा पाठिंबा आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मंगळयानाच्या प्रक्षेपणानंतर पंतप्रधान स्वत: अवकाश संशोधन केंद्रात आले आणि त्यांनी मी तुमच्या पाठीशी असल्याचे संशोधकांना सांगितले. सरकारने बहुतांश मंत्र्यांना अवकाश संशोधन केंद्राला आवश्यक ती सर्व मदत करण्याची सूचना केली आहे. विद्यापीठाच्या पातळीवर नवनवीन आणि समाजोपयोगी संशोधन करण्यावर भर देण्यात यावा. या पत्रकार परिषदेस ‘आयएसटीई’चे अध्यक्ष प्रतापसिंह देसाई, विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे, तंत्रज्ञान विभागाचे संचालक जयदीप बागी, व्ही. डी. वैद्य, प्राचार्य महादेव नरके, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)एपीजे अब्दुल कलाम यांनी ऊर्जा दिलीडॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना देश महासत्ता व्हावा असे वाटत होते. त्याचे विवेचन त्यांनी उत्तमरीत्या करून ठेवले असल्याचे डॉ. कस्तुरीरंगन यांनी सांगितले. ते म्हणाले, यासाठी प्रारंभी त्यांनी सन २०२० मध्ये देश महासत्ता होणार, या घोषणेद्वारे युवापिढीला ऊर्जा दिली. महासत्ता होण्यासाठी बारावीपर्यंत अद्ययावत व कौशल्यपूर्ण शिक्षण मिळावे. यात भाषा, प्रांत, संस्कृती अडथळा ठरू नये अशी त्यांची इच्छा होती. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीदेखील ज्ञानाने अद्ययावत राहावे. त्यातून त्यांनी विद्यार्थ्यांना घडवावे. आरोग्य, पर्यावरण क्षेत्रांसह राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यात विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर त्यांचा भर होता. कृषी व जलसंधारणात देश महासत्ता बनावा, अशी त्यांची इच्छा होती.