शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

एकमेका साहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 00:36 IST

श्रीनिवास नागे । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ‘एकमेका साहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत’ ही त्यांची टॅगलाईन, तर ‘७५ ...

श्रीनिवास नागे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : ‘एकमेका साहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत’ ही त्यांची टॅगलाईन, तर ‘७५ हजार गुंतवा आणि एका वर्षात पावणेतीन लाख कमवा’, ही कॅचलाईन! त्यात राजकीय धेंडांसोबतची ऊठबस. मग ‘हुरळली मेंढी, लागली लांडग्याच्या मागं’ अशी सगळ्या गुंतवणूकदारांची गत झाली. बघता-बघता कडकनाथ कोंबडीपालनात ‘रयत अ‍ॅग्रो’चा बोलबाला झाला. मग ती ‘महारयत अ‍ॅग्रो’ झाली. आठ ते दहा हजारजणांनी गुंतवणूक केली आणि तिथंच फसगत झाली. वर्ष-सहा महिन्यातच अंडी-कोंबड्यांचा उठाव थांबला. अर्थचक्रालाच खीळ बसली... त्यातून समोर आली पाचशे कोटीची फसवणूक!सध्या बहुचर्चित बनलेल्या या फसवणूक प्रकरणाची व्याप्ती महाराष्टÑ-कर्नाटकपुरती मर्यादित नसून गुजरात, तेलंगणा, छत्तीसगडपर्यंत पोहोचली आहे. कडकनाथ जातीच्या कोंबडीचा भुलभुलैय्या आणि दक्षिण महाराष्टÑातील ‘रयत’ या नावाची चलती वापरून घेत ‘रयत अ‍ॅग्रो’ या कंपनीच्या महाठग संचालकांनी लोकांना फशी पाडले. त्यासाठी ‘७५ हजार गुंतवा आणि एका वर्षात पावणेतीन लाख कमवा’, ही वरवर साधीसोपी वाटणारी योजना राबवली.सुरुवातीला केवळ ७५ हजार रुपये गुंतवायचे. तेही दोन टप्प्यात. ४० हजार रुपये बुकिंग करताना, तर उरलेले ३५ हजार रुपये तीन महिन्यांनंतर. त्याबदल्यात कडकनाथ जातीचे २०० पक्षी, खाद्य, औषधे, खाद्याची भांडी मिळायची. गुंतवणूकदाराने स्वत:च्या शेडमध्ये ही पिले सांभाळायला सुरुवात केल्यानंतर तीन महिन्यांनी कंपनी त्यातल्या ८० कोंबड्या घेत असे. त्यावेळी गुंतवणूकदाराकडे १०० मादी व २० नर शिल्लक ठेवण्यात येत. चार महिन्यांपासून या कोंबड्या अंडी देऊ लागल्यानंतर पुढील सहा महिने कंपनी सुरुवातीची २००० अंडी सरासरी ५० रुपये, नंतरची २००० अंडी ३० रुपये, तर अखेरची ३५०० अंडी २० रुपये दराने खरेदी करत असे. त्यातून गुंतवणूकदाराला दोन लाख तीस हजार रुपये मिळत. दहाव्या महिन्यांपर्यंत टिकलेल्या कोंबड्या ३७५ रुपये दराने खरेदी करण्याची हमी देण्यात आली होती. त्यातून सुमारे ४५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत असे. असे अवघ्या दहा महिन्यांत २ लाख ७५ हजार रुपये मिळवण्याचे आमिष दाखवण्यात आले.‘रयतअ‍ॅग्रो’च्या संचालकांची राजकीय धेंडांसोबतची ऊठबस कामी आली. ‘बॅकिंग’ मिळालं. मग कंपनीचे मुख्य कार्यालय सांगली जिल्ह्णातल्या इस्लामपूरमध्ये थाटले गेले. तेथेच व्यवहार आणि करार व्हायचे. हळूहळू कंपनीची १५ कार्यालये झाली. इस्लामपूर-कोल्हापूरपासून पार नागपूर-औरंगाबाद-पुणे-बेळगावपर्यंत. गावखेड्यापासून मोठ्या शहरांपर्यंतच्या हॉटेल्स, ढाब्यांवर ‘कडकनाथ’ कोंबड्यांना खवैय्यांची मोठी पसंती असल्याची पुस्ती जोडली गेली. काहींनी शेतीला जोडधंदा म्हणून, काहींनी पूर्णवेळचा धंदा म्हणून, तर काहींनी आयुष्याची पुंजी एकत्र करून पैसे गुंतवले. शेड उभी केली...वर्षभरापूर्वी आणल्या गेलेल्या या योजनेतून सुरुवातीच्या काळात काही जणांना अंडी-पक्षी खरेदीतून कंपनीने परतावा दिला. ज्यांनी कमवले, तेच कंपनीचे स्टार प्रचारक झाले. त्यातल्या काहींना तर एजंट म्हणून नेमण्यात आले. त्यांनी ‘माऊथ पब्लिसिटी’ केली. गुंतवणूकदार वाढले... आणि त्यानंतर कंपनीचे सगळेच व्यवहार लांबू लागले. गेल्या चार महिन्यांत तर ते थांबलेच. कारण अंडी-पक्ष्यांचे उत्पादन अमाप आणि उठाव कमी!डिसेंबरपासून घरघरकंपनीने सुरुवातीला पक्षी आणि खाद्य व्यवस्थित पुरविले. अंड्यांचे पैसे वेळेवर दिले. मुदतीनंतर पक्षी उचलले. ते पाहून बुकिंग वाढले. परंतु फेब्रुवारीपासून ‘कडकनाथ’ला घरघर लागली. कंपनीने खाद्यामध्ये अनियमितता आणली. अंडी नेली, पण त्याचे पैसे दिले नाहीत. गुंतवणूकदारांनी दोन-तीन महिने स्वत:च्या पैशाने खाद्य घातले. सध्या कंपनीच्या सगळ्याच कार्यालयांना टाळे लागले आहे.