शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
7
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
8
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
9
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
10
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
11
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
12
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
13
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
14
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
15
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
16
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
17
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
18
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

एकमेका साहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 00:36 IST

श्रीनिवास नागे । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ‘एकमेका साहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत’ ही त्यांची टॅगलाईन, तर ‘७५ ...

श्रीनिवास नागे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : ‘एकमेका साहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत’ ही त्यांची टॅगलाईन, तर ‘७५ हजार गुंतवा आणि एका वर्षात पावणेतीन लाख कमवा’, ही कॅचलाईन! त्यात राजकीय धेंडांसोबतची ऊठबस. मग ‘हुरळली मेंढी, लागली लांडग्याच्या मागं’ अशी सगळ्या गुंतवणूकदारांची गत झाली. बघता-बघता कडकनाथ कोंबडीपालनात ‘रयत अ‍ॅग्रो’चा बोलबाला झाला. मग ती ‘महारयत अ‍ॅग्रो’ झाली. आठ ते दहा हजारजणांनी गुंतवणूक केली आणि तिथंच फसगत झाली. वर्ष-सहा महिन्यातच अंडी-कोंबड्यांचा उठाव थांबला. अर्थचक्रालाच खीळ बसली... त्यातून समोर आली पाचशे कोटीची फसवणूक!सध्या बहुचर्चित बनलेल्या या फसवणूक प्रकरणाची व्याप्ती महाराष्टÑ-कर्नाटकपुरती मर्यादित नसून गुजरात, तेलंगणा, छत्तीसगडपर्यंत पोहोचली आहे. कडकनाथ जातीच्या कोंबडीचा भुलभुलैय्या आणि दक्षिण महाराष्टÑातील ‘रयत’ या नावाची चलती वापरून घेत ‘रयत अ‍ॅग्रो’ या कंपनीच्या महाठग संचालकांनी लोकांना फशी पाडले. त्यासाठी ‘७५ हजार गुंतवा आणि एका वर्षात पावणेतीन लाख कमवा’, ही वरवर साधीसोपी वाटणारी योजना राबवली.सुरुवातीला केवळ ७५ हजार रुपये गुंतवायचे. तेही दोन टप्प्यात. ४० हजार रुपये बुकिंग करताना, तर उरलेले ३५ हजार रुपये तीन महिन्यांनंतर. त्याबदल्यात कडकनाथ जातीचे २०० पक्षी, खाद्य, औषधे, खाद्याची भांडी मिळायची. गुंतवणूकदाराने स्वत:च्या शेडमध्ये ही पिले सांभाळायला सुरुवात केल्यानंतर तीन महिन्यांनी कंपनी त्यातल्या ८० कोंबड्या घेत असे. त्यावेळी गुंतवणूकदाराकडे १०० मादी व २० नर शिल्लक ठेवण्यात येत. चार महिन्यांपासून या कोंबड्या अंडी देऊ लागल्यानंतर पुढील सहा महिने कंपनी सुरुवातीची २००० अंडी सरासरी ५० रुपये, नंतरची २००० अंडी ३० रुपये, तर अखेरची ३५०० अंडी २० रुपये दराने खरेदी करत असे. त्यातून गुंतवणूकदाराला दोन लाख तीस हजार रुपये मिळत. दहाव्या महिन्यांपर्यंत टिकलेल्या कोंबड्या ३७५ रुपये दराने खरेदी करण्याची हमी देण्यात आली होती. त्यातून सुमारे ४५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत असे. असे अवघ्या दहा महिन्यांत २ लाख ७५ हजार रुपये मिळवण्याचे आमिष दाखवण्यात आले.‘रयतअ‍ॅग्रो’च्या संचालकांची राजकीय धेंडांसोबतची ऊठबस कामी आली. ‘बॅकिंग’ मिळालं. मग कंपनीचे मुख्य कार्यालय सांगली जिल्ह्णातल्या इस्लामपूरमध्ये थाटले गेले. तेथेच व्यवहार आणि करार व्हायचे. हळूहळू कंपनीची १५ कार्यालये झाली. इस्लामपूर-कोल्हापूरपासून पार नागपूर-औरंगाबाद-पुणे-बेळगावपर्यंत. गावखेड्यापासून मोठ्या शहरांपर्यंतच्या हॉटेल्स, ढाब्यांवर ‘कडकनाथ’ कोंबड्यांना खवैय्यांची मोठी पसंती असल्याची पुस्ती जोडली गेली. काहींनी शेतीला जोडधंदा म्हणून, काहींनी पूर्णवेळचा धंदा म्हणून, तर काहींनी आयुष्याची पुंजी एकत्र करून पैसे गुंतवले. शेड उभी केली...वर्षभरापूर्वी आणल्या गेलेल्या या योजनेतून सुरुवातीच्या काळात काही जणांना अंडी-पक्षी खरेदीतून कंपनीने परतावा दिला. ज्यांनी कमवले, तेच कंपनीचे स्टार प्रचारक झाले. त्यातल्या काहींना तर एजंट म्हणून नेमण्यात आले. त्यांनी ‘माऊथ पब्लिसिटी’ केली. गुंतवणूकदार वाढले... आणि त्यानंतर कंपनीचे सगळेच व्यवहार लांबू लागले. गेल्या चार महिन्यांत तर ते थांबलेच. कारण अंडी-पक्ष्यांचे उत्पादन अमाप आणि उठाव कमी!डिसेंबरपासून घरघरकंपनीने सुरुवातीला पक्षी आणि खाद्य व्यवस्थित पुरविले. अंड्यांचे पैसे वेळेवर दिले. मुदतीनंतर पक्षी उचलले. ते पाहून बुकिंग वाढले. परंतु फेब्रुवारीपासून ‘कडकनाथ’ला घरघर लागली. कंपनीने खाद्यामध्ये अनियमितता आणली. अंडी नेली, पण त्याचे पैसे दिले नाहीत. गुंतवणूकदारांनी दोन-तीन महिने स्वत:च्या पैशाने खाद्य घातले. सध्या कंपनीच्या सगळ्याच कार्यालयांना टाळे लागले आहे.