शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

जिरवाजिरवीत गुंठेवारीचा बळी

By admin | Updated: February 13, 2015 22:55 IST

विकास आराखडा : पोस्टमार्टमची गरज

शीतल पाटील- सांगली -महापालिकेचा विकास आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर आता नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस पडत आहे. विशेषत: गुंठेवारी क्षेत्रातील आरक्षणांचा बाजार होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. तत्कालीन काँग्रेस व नंतर सत्तेत आलेल्या विकास महाआघाडीच्या जिरवाजिरवीच्या राजकारणात गुंठेवारी भागातील आरक्षणे कायम राहिली आहेत. त्यामुळे शिस्तबद्ध विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या मानगुटीवर कारवाईची टांगती तलवार ४० वर्षांनंतरही कायम राहणार आहे. महापालिकेची स्थापना झाल्यानंतर तब्बल १६ वर्षांनी विकास आराखड्याला मूर्त स्वरुप आले. आराखडा प्रसिद्ध होताच आरक्षणाची माहिती घेण्यासाठी नागरिकांची रिघ पालिकेत लागली आहे. या आराखड्यात गुंठेवारी भागात २७७ आरक्षणे टाकली आहेत. त्यात डीपी रस्ते, प्राथमिक शाळा, क्रीडांगणे, पार्किंग, उद्याने यांचा समावेश आहे. शहराचा विस्तार वाढत असताना नागरिकांसाठी अशा सामाजिक उपक्रमांची गरज असते, हे मान्य केलेच पाहिजे. कुपवाडचेच उदाहरण घ्यायचे झाल्यास, या शहरात एकही उद्यान नाही. आजपर्यंत त्यासाठी प्रयत्नही झाले नाहीत. पण वातानुकूलित कार्यालयात बसून आराखडा तयार करणेही चुकीचेच म्हणावे लागेल. २००३-०४ मध्ये विकास आराखडा तयार करताना खासगी कंपनीने सॅटेलाईटचा सर्वाधिक वापर केला. त्यातून १९७४ च्या आराखड्यातील काही आरक्षणे कायम ठेवली. वस्तुत: या आरक्षणांची स्थळपाहणीच झाली नाही. त्रिमूर्ती कॉलनीजवळ आराखड्यात एक ८० फुटी रस्ता निर्देशित केला आहे. या रस्त्याचे आरक्षण १९९२ मध्येच राज्य शासनाने विशेष बाब म्हणून उठविले होते. तरीही आताच्या आराखड्यात पुन्हा हे आरक्षण कायम ठेवले आहे. ९२ नंतर या जागेवर टोलेजंग इमारती झाल्या आहेत. अशीच स्थिती ख्वाजा कॉलनीतील भूखंडाची आहे. तिथे पार्किंगचे आरक्षण आहे, पण या भूखंडावर नागरी वस्ती झाली आहे. अशी कित्येक उदाहरणे देता येतील. तत्कालीन काँग्रेसने आरक्षण वगळण्याचे सर्वाधिकार तत्कालीन महापौर किशोर जामदार यांना दिले होते. त्यांनी ऐनवेळचे ठराव करीत १७४ आरक्षणे वगळण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय योग्य होता, असे म्हणता येणार नाही. या ठरावातील काही आरक्षणे नागरी वस्तीवर होती. ती उठविणे क्रमप्राप्त होते. काही निर्णय स्वकियांचे हित जपण्यासाठी घेतले होते. त्यावरून बरेच वादळ उठले. भूखंडाचे श्रीखंड खाल्ल्याचा आरोप झाला. त्यातून सांगलीच्या नागरिकांनी विकास महाआघाडीला सत्तेवर आणले. महाआघाडीने ही आरक्षणे कायम ठेवण्याचा ठराव केला. पण तो करताना या आरक्षणांचे पोस्टमार्टम केले नाही. नागरी हिताची आरक्षणे वगळण्याबाबत जागेवर जाऊन पाहणी करून निर्णय घेतले नाहीत. सरसकट ठरावच रद्द केला. त्यामुळे, सुक्याबरोबर ओलेही जळते, याप्रमाणे काँग्रेसच्या स्वकियांसोबतच गुंठेवारी भागातील नागरिकांचा नाहक बळी गेला. आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर ही बाब प्रकर्षाने पुढे येत आहे. गुंठेवारीत आरक्षित जागेवर नागरी वस्ती असेल, तर ते आरक्षण वगळून इतरत्र त्याची व्यवस्था करता आली असती. पण जिरवाजिरवीच्या राजकारणात या गोष्टीचे भान ना सत्ताधाऱ्यांना राहिले, ना विरोधक असलेल्या काँग्रेसला! आता मात्र नागरिक महापालिकेच्या नावाने शंख करीत आहेत. पण त्याला जबाबदार कोण? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे.गुंठेवारी कायद्याचा आधारगुंठेवारी कायद्यातील कलम ५ मध्ये विकास आराखडा, अर्बन सिलिंग अ‍ॅक्ट, कूळ कायदा, महसूल या कायद्यात काहीही म्हटले असले तरी, गुंठेवारी नियमितीकरण झाल्यास आरक्षणाचा उद्देश संपेल. या कायद्याच्याआधारे काही आरक्षणे वगळता येतात. विकास योजनेतील जागा स्थानिक स्वराज्य संस्थेला आवश्यक वाटत नसेल, तर गुंठेवारी नियमितीकरण करता येते. या आधारावर अनेक ठिकाणी गुंठेवारी नियमितीकरण झाले आहे. अशा ठिकाणीही सध्या आरक्षणे पडली आहेत. त्यामुळे सर्वसाधारणपणे नऊ हजार नागरिक आरक्षणाने बाधित होत आहेत. सत्ताधाऱ्यांनी वेळीच ही आरक्षणे वगळली असती, तर आता जनतेला त्रास सहन करावा लागला नसता. आता या नागरिकांना न्यायालयाचे दरवाजे ठोठाविण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.