शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

जत तालुक्यात जनावरे जगवायची कशी?

By admin | Updated: August 18, 2015 22:45 IST

थेट अनुदानाची मागणी : कडबा शेकडा दोन हजारावर, तर ऊस अडीच हजाराला टन

भागवत काटकर - शेगाव   विस्ताराने सर्वात मोठ्या असणाऱ्या जत तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. पावसाअभावी चाऱ्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. पाण्याच्या टंचाईबरोबरच पशुधन जगविण्यासाठी चाऱ्याच्या टंचाईचाही सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. जनावरे जगविण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. जनावरांना चाऱ्यासाठी ज्वारीचा कडबा २००० रुपये प्रति शेकडा, तर उसाचा चारा २५०० ते २८०० रुपये प्रति टन या दराने जनावरांना चारा म्हणून खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी चारा छावण्या दुष्काळी भागात सुरू करण्याची घोषणा केली आहे. चारा छावण्या सुरू होण्याच्या कालावधीचा विचार करता, शेतकऱ्यांना थेट अनुदान देण्याचीही मागणी शेतकऱ्यांतून होऊ लागली आहे.जत तालुक्यात एकूण जनावरांची संख्या २०१२ च्या पशुगणनेनुसार ६ लाख १० हजार ६०५ आहे. मात्र पशुवैद्यकीय जाणकारांच्यामते जनावरांच्या संख्येत दोन वर्षात मोठी वाढ झाली आहे. यामध्ये गाई, बैल, म्हैशी, शेळ्या, मेंढ्या यांचा समावेश आहे. शेतीला जोडव्यवसाय म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध पशुधनाची जोड दिली आहे. या पशुपालनातून शेतकऱ्यांना दूध, बैल, खोंड, बोकड यांच्या विक्रीतून आर्थिक उत्पन्न मिळते. शिवाय शेणखताचा वापर शेतीसाठी शेतकरी करतो. पशुधनातून तालुक्यात दररोज लाखो लिटर दूध संकलन होत आहे. मात्र चाऱ्याचे वाढते दर व पाणीटंचाईमुळे जनावरे जगवायची कशी? या काळजीत शेतकरी आहेत. खरिपाचे एकूण क्षेत्र ६५ हजार ७० हेक्टर आहे. यापैकी केवळ २३ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. मात्र या पेरण्या पावसाअभावी पूर्णत: वाया गेल्या आहेत. आता महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी चारा छावण्या सुरू करण्यात येतील, अशी घोषणा केली आहे. राजारामबापू साखर कारखान्याच्यावतीने बनाळी येथे जिल्हा परिषद सदस्य संजीव सावंत यांच्या संस्थेने छावणी सुरू केली होती. त्या संस्थेची १७ लाख रुपये, शेगाव येथील श्रीकृष्ण पतसंस्थेची नऊ लाख, तर वाळेखिंडी विकास संस्थेची १४ लाख रुपये थकबाकी आहे. छावणी सुरू करताना जाचक अटी व नियमांचे काटेकोर पालन करावे लागते. त्यावेळी छावणी चालकांना तारेवरची कसरत करावी लागते, ही वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत नव्याने चारा छावण्या सुरू होणार का, याबाबत उलटसुलट चर्चा आहे. त्यातूनही काही संस्थांनी जत तहसील विभागाकडे चारा छावणीविषयी विचारणा केली आहे. महसूलमंत्र्यांनी पाण्याची सोय व चारा छावण्या सुरू करण्याची घोषणा केली असली तरी, अद्याप तशी सूचना महसूल यंत्रणेकडे आलेली नाही.यापूर्वीची बिले अद्याप थकितजत तालुक्यातील काही चारा छावणी चालकांची बिले अद्यापही शासनाकडून मिळायची आहेत. तसेच काही संस्थांचे लेखापरीक्षण होणे बाकी आहे. यामुळे ही बिले प्रलंबित आहेत. जत उत्तर भागातील तीन ठिकाणच्या चारा छावण्यांची बिले थकली आहेत. छावणी चालकांना यापूर्वी छावणी चालविताना आलेला अनुभव पाहता, ते चारा छावणी सुरू करतील का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायासाठी जिवापाड जोपासलेल्या जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या पाणी व चाराटंचाई याची मोठी समस्या तालुक्यात निर्माण झाली आहे. तरीही चारा छावण्यांसंदर्भात शासनाने त्वरित निर्णय घेऊन, जाचक अटी व बिलांसंदर्भातील चालढकलीचे धोरण जाहीर करावे. अद्यापही जत उत्तर भागातील सुमारे ६० ते ७५ लाखांची बिले थकित आहेत, तरीही चारा छावण्या सुरू करण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत.- संजीव सावंत, जि. प. सदस्य, बनाळी, ता. जत.दुष्काळी भागातील जनावरे जगली पाहिजेत, ही आमची तळमळ आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी जनावरांची जोपासना केली. पण सध्या दुष्काळाची दाहकता वाढतच आहे. चारा छावण्या सुरू करण्यासंदर्भात निर्णय झाला आहे, मात्र चारा छावणी चालविताना अडचणी निर्माण होतात. शिवाय शंभर टक्के सुुविधा छावणीत मिळत नाहीत. त्यासाठी सरळ थेट अनुदान शेतकऱ्यांना देण्यासाठी शासनाकडे पुढाकार घेऊ.- सदाभाऊ खोत, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना