शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

जत तालुक्यात जनावरे जगवायची कशी?

By admin | Updated: August 18, 2015 22:45 IST

थेट अनुदानाची मागणी : कडबा शेकडा दोन हजारावर, तर ऊस अडीच हजाराला टन

भागवत काटकर - शेगाव   विस्ताराने सर्वात मोठ्या असणाऱ्या जत तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. पावसाअभावी चाऱ्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. पाण्याच्या टंचाईबरोबरच पशुधन जगविण्यासाठी चाऱ्याच्या टंचाईचाही सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. जनावरे जगविण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. जनावरांना चाऱ्यासाठी ज्वारीचा कडबा २००० रुपये प्रति शेकडा, तर उसाचा चारा २५०० ते २८०० रुपये प्रति टन या दराने जनावरांना चारा म्हणून खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी चारा छावण्या दुष्काळी भागात सुरू करण्याची घोषणा केली आहे. चारा छावण्या सुरू होण्याच्या कालावधीचा विचार करता, शेतकऱ्यांना थेट अनुदान देण्याचीही मागणी शेतकऱ्यांतून होऊ लागली आहे.जत तालुक्यात एकूण जनावरांची संख्या २०१२ च्या पशुगणनेनुसार ६ लाख १० हजार ६०५ आहे. मात्र पशुवैद्यकीय जाणकारांच्यामते जनावरांच्या संख्येत दोन वर्षात मोठी वाढ झाली आहे. यामध्ये गाई, बैल, म्हैशी, शेळ्या, मेंढ्या यांचा समावेश आहे. शेतीला जोडव्यवसाय म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध पशुधनाची जोड दिली आहे. या पशुपालनातून शेतकऱ्यांना दूध, बैल, खोंड, बोकड यांच्या विक्रीतून आर्थिक उत्पन्न मिळते. शिवाय शेणखताचा वापर शेतीसाठी शेतकरी करतो. पशुधनातून तालुक्यात दररोज लाखो लिटर दूध संकलन होत आहे. मात्र चाऱ्याचे वाढते दर व पाणीटंचाईमुळे जनावरे जगवायची कशी? या काळजीत शेतकरी आहेत. खरिपाचे एकूण क्षेत्र ६५ हजार ७० हेक्टर आहे. यापैकी केवळ २३ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. मात्र या पेरण्या पावसाअभावी पूर्णत: वाया गेल्या आहेत. आता महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी चारा छावण्या सुरू करण्यात येतील, अशी घोषणा केली आहे. राजारामबापू साखर कारखान्याच्यावतीने बनाळी येथे जिल्हा परिषद सदस्य संजीव सावंत यांच्या संस्थेने छावणी सुरू केली होती. त्या संस्थेची १७ लाख रुपये, शेगाव येथील श्रीकृष्ण पतसंस्थेची नऊ लाख, तर वाळेखिंडी विकास संस्थेची १४ लाख रुपये थकबाकी आहे. छावणी सुरू करताना जाचक अटी व नियमांचे काटेकोर पालन करावे लागते. त्यावेळी छावणी चालकांना तारेवरची कसरत करावी लागते, ही वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत नव्याने चारा छावण्या सुरू होणार का, याबाबत उलटसुलट चर्चा आहे. त्यातूनही काही संस्थांनी जत तहसील विभागाकडे चारा छावणीविषयी विचारणा केली आहे. महसूलमंत्र्यांनी पाण्याची सोय व चारा छावण्या सुरू करण्याची घोषणा केली असली तरी, अद्याप तशी सूचना महसूल यंत्रणेकडे आलेली नाही.यापूर्वीची बिले अद्याप थकितजत तालुक्यातील काही चारा छावणी चालकांची बिले अद्यापही शासनाकडून मिळायची आहेत. तसेच काही संस्थांचे लेखापरीक्षण होणे बाकी आहे. यामुळे ही बिले प्रलंबित आहेत. जत उत्तर भागातील तीन ठिकाणच्या चारा छावण्यांची बिले थकली आहेत. छावणी चालकांना यापूर्वी छावणी चालविताना आलेला अनुभव पाहता, ते चारा छावणी सुरू करतील का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायासाठी जिवापाड जोपासलेल्या जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या पाणी व चाराटंचाई याची मोठी समस्या तालुक्यात निर्माण झाली आहे. तरीही चारा छावण्यांसंदर्भात शासनाने त्वरित निर्णय घेऊन, जाचक अटी व बिलांसंदर्भातील चालढकलीचे धोरण जाहीर करावे. अद्यापही जत उत्तर भागातील सुमारे ६० ते ७५ लाखांची बिले थकित आहेत, तरीही चारा छावण्या सुरू करण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत.- संजीव सावंत, जि. प. सदस्य, बनाळी, ता. जत.दुष्काळी भागातील जनावरे जगली पाहिजेत, ही आमची तळमळ आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी जनावरांची जोपासना केली. पण सध्या दुष्काळाची दाहकता वाढतच आहे. चारा छावण्या सुरू करण्यासंदर्भात निर्णय झाला आहे, मात्र चारा छावणी चालविताना अडचणी निर्माण होतात. शिवाय शंभर टक्के सुुविधा छावणीत मिळत नाहीत. त्यासाठी सरळ थेट अनुदान शेतकऱ्यांना देण्यासाठी शासनाकडे पुढाकार घेऊ.- सदाभाऊ खोत, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना