शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

‘किसान ॲप’चे वरातीमागून घोडे; वादळ येऊन गेल्यानंतर अलर्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शेतकऱ्यांना हवामानाची माहिती देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने विकसित केलेले ‘किसान ॲप’ म्हणजे असून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शेतकऱ्यांना हवामानाची माहिती देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने विकसित केलेले ‘किसान ॲप’ म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा अशी स्थिती आहे. खुद्द कृषी विभागासह अनेक शेतकऱ्यांच्या वापरातही ते नाही. हवामान अंदाजासाठी शेतकरी विद्यापीठाची माहिती केंद्रे तसेच टाटा व रिलायन्ससारख्या काही संस्थांच्या ॲपवर अवलंबून आहेत.

प्रगत तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा आणि वादळ, वाऱ्यामुळे संभाव्य नुकसान टळावे, या हेतूने विविध ॲप विकसित करण्यात आली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ‘किसान ॲप’ होय. जिल्ह्यात अत्यंत मोजकेच शेतकरी त्याचा वापर करतात. पण हे ॲप म्हणजे ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ अशी अवस्था आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की, या ॲपवरुन वेळेत संदेश मिळत नाहीत. गेल्या पंधरवड्यात तौक्ते वादळाचे संदेश वादळ येऊन गेल्यावर आले. अनेकदा वादळ, पाऊस येऊन गेल्यावर संदेश येतात. वादळी पाऊस येणार असल्याने वैरण, धान्य, जनावरे संरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचना मिळतात, पण तोपर्यंत वादळ येऊन गेलेले असते. त्याने जीवित व वित्तहानी केलेली असते. या ॲपचा फायदा होत नसल्याने अनेक शेतकरी ते डिलीट करत आहेत.

चौकट

किसान ॲपवरुन ही माहिती मिळते

१. किसान ॲपवरुन हवामान, वादळ, अवकाळी पाऊस, पीक पेरणी, विजांचा कडकडाट, आदी माहिती मिळते.

२. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसह पीककर्ज, पीकविम्याच्या अनुषंगाने माहिती मिळते.

३. शेतीविषयक शासनाच्या योजना, अनुदाने, अर्ज करण्याची प्रक्रिया यांचीही माहिती मिळते.

४. जनावरांच्या आजाराच्या साथी, पिकांची मशागत, काढणी, पिकांवर पडणारे रोग व त्यावर औषध योजना यांचीही माहिती दिली जाते.

चौकट

माहिती वेळेत मिळाली तरच ॲपचा फायदा

- किसान ॲपवरुन शेतीविषयक माहिती व सूचना वेळेत मिळाल्या तरच फायदा होतो.

- वादळी पाऊस, विजांचा कडकडाट यांची माहिती किमान काही तास अगोदर मिळाली तरच धान्यसाठे, जनावरांचे संरक्षण करता येते.

- पिकांवरील कीड, जनावरांचे आजार आदींची माहिती योग्यवेळी मिळाली तर औषध योजना करता येते, पिकांचा बचाव करणे शक्य होते.

कोट

किसान ॲप हे स्वतंत्र ॲप आम्ही वापरत नाही. कृषी विभागाने काही स्वतंत्र ॲप उपलब्ध करुन दिली आहेत, त्यावरुन वेळेत मेसेज येतात. काही शेतकरी किसान ॲप वापरत होते, पण त्यावरुन सूचना योग्यवेळी मिळायच्या नाहीत. वादळ, पाऊस येऊन गेल्यावर मेसेज यायचे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हे ॲप डिलीट केले आहे. सध्या कृषी विभागाच्या संदेशांचा फायदा होतो.

- सुभाष पाटील, शेतकरी, वाळवा.

गेल्या पंधरवड्यात जोरदार अवकाळी पावसाचे इशारे मिळाले, पण तोपर्यंत पाऊस सुरु झालेला होता. किसान ॲपऐवजी आम्ही अन्य खासगी कंपन्यांच्या मेसेजचा वापर करतो, त्यांच्याकडून काही तास अगोदर किंवा आदल्या दिवशी पूर्वकल्पना मिळते.

- अनिल खैरावे, शेतकरी, कवठेमहांकाळ

सुरुवातीला काही दिवस ॲपचा वापर केला, पण अनुभव चांगला नव्हता. शिवाय फक्त ॲपवर विसंबून शेती करता येत नाही. सध्या दोन ते तीन ॲपवरुन अंदाज घेत राहतो, त्यामुळे नुकसान टळते. शासनाने शेतकऱ्यांसाठी हमखास भरवशाची माहिती देणारे संकेतस्थळ विकसित करायला हवे.

- अर्जुन शिंगाडे, शेतकरी, लक्ष्मीवाडी

विद्यापीठाचे ॲप भरवशाचे

जिल्ह्यात स्वतंत्र किसान ॲप फारसे वापरात नाही. काही खासगी कंपन्या, विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे यांच्याकडून वेळेत माहिती मिळते. ती अचूकदेखील असते. जिल्ह्यातील अडीच लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे मोबाईल क्रमांक आम्ही शासनाला कळवले होते, त्यावरही नियमित संदेश येतात, त्यांचा शेतकऱ्यांना फायदाही होतो.

- सुरेश मगदूम, कृषी उपसंचालक, सांगली