शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
2
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
3
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
4
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
5
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
6
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
7
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
8
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
9
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
10
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
11
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
12
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
13
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
14
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
15
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
16
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
17
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
18
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
19
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
20
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  

नरवाड-बेडगच्या धडक योजनेला घरघर

By admin | Updated: February 21, 2015 00:16 IST

पाणीपट्टी आवाक्याबाहेर : एकेकाळी शेतीला संजीवनी ठरलेल्या योजना आज ‘कोमात’

दिलीप कुंभार- नरवाड मिरज तालुक्यातील नरवाड आणि बेडगच्या पाणीपुरवठा धडक योजनेला घरघर लागल्याने लाभार्थ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.गेल्या ३० ते ४० वर्षांपूर्वी नरवाड आणि बेडगच्या शेती क्षेत्राला पाणी देण्यासाठी आबासाहेब शिंदे (म्हैसाळकर) यांच्या पुढाकाराने धडक योजना सफल झाली. दुष्काळाने होरपळलेल्या बेडग आणि नरवाडला धडक योजना संजीवनी ठरली. कालांतराने हीच धडक योजना शासनाने वसंतदादा साखर कारखान्याकडे वर्ग केली. धडक योजनेमुळे नरवाड आणि बेडगची शेती सुजलाम् सुफलाम् झाली. साखर कारखान्यावेळी ही योजना नेटाने राबविली, मात्र म्हैसाळ प्रकल्पाच्या वेळोवेळी झालेल्या आवर्तनामुळे धडक योजनेकडील नोंदी वेगाने कमी होत गेल्या. शेतीला पाणी देण्याचे क्षेत्र (नोंदी) कमी होत गेल्याने पाणीपट्टी आवाक्याबाहेर गेली. शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि पाणीपट्टी याचा ताळमेळ बसविताना शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले.परिणामी याचा फटका शेतीस पाणीपुरवठा करणाऱ्या धडक योजनेला पूर्णपणे बसल्याने गेल्या ४० वर्षांपासून म्हैसाळला कृष्णा नदीतून नरवाड ते बेडगपर्यंतच्या सिमेंट पाईप्स जीर्ण होऊन गळतीचे प्रमाण अधिक झाले.सद्यस्थितीत संबंधित धडक योजनेवरील सर्व साहित्य गंजले असून, पाणी बंदमुळे पोटलाईन टाकण्यासाठी वापरण्यात आलेल्या सिमेंट पाईप गायब होत आहेत. धडक योजनाच बंद पडल्याने योजनेवर कारखान्याने कोणतीही सुरक्षिततेची उपाययोजना केली नसल्याने या योजनेचे बारा वाजले आहेत. २० जानेवारी २०१३ ला विद्युत वितरण कंपनीने थकित वीज बिलामुळे धडक योजनेचा वीजपुरवठा तोडला आहे. यामुळे म्हैसाळ प्रकल्पाचे खंडित झालेले आवर्तन आणि बंद पडलेली धडक योजना या दोन्ही कचाट्यात शेतकरी अडकला आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास शेतकऱ्यांची पिके वाळून जाणार आहेत. लाभार्थी संख्या घटलीनरवाड धडक योजनानरवाड धडक योजना १२ जुलै १९८५ ला राज्य सरकारकडून सांगलीच्या वसंतदादा सहकारी साखर कारखान्याकडे वर्ग करण्यात आली. यावेळी १५० शेतकरी या योजनेचे सभासद होते, तर ३८५ एकरहून अधिक क्षेत्र ओलीताखाली आले होते, तर २०१३ अखेर केवळ २० शेतकरी लाभार्थी राहिले असून योजनेकडे केवळ ४० एकर क्षेत्राची नोंद राहिली आहे. बेडग धडक योजनाबेडग धडक योजनेकडे १९८५ मध्ये १४० सभासद होते, तर ४०० एकर क्षेत्र ओलिताखाली आले होते, मात्र २०१३ मध्ये केवळ १५ लाभार्थी उरले असून केवळ ३५ एकर जमिनीची नोंद उरली आहे. ‘म्हैसाळ’ योजनेचे पाणी मिळू लागल्यानंतर जादा पाणीपट्टीमुळे शेतकऱ्यांनी धडक योजनेकडे पाठ फिरवली आहे. परिणामी योजनाच अडचणीत आली आहे.