शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

नरवाड-बेडगच्या धडक योजनेला घरघर

By admin | Updated: February 21, 2015 00:16 IST

पाणीपट्टी आवाक्याबाहेर : एकेकाळी शेतीला संजीवनी ठरलेल्या योजना आज ‘कोमात’

दिलीप कुंभार- नरवाड मिरज तालुक्यातील नरवाड आणि बेडगच्या पाणीपुरवठा धडक योजनेला घरघर लागल्याने लाभार्थ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.गेल्या ३० ते ४० वर्षांपूर्वी नरवाड आणि बेडगच्या शेती क्षेत्राला पाणी देण्यासाठी आबासाहेब शिंदे (म्हैसाळकर) यांच्या पुढाकाराने धडक योजना सफल झाली. दुष्काळाने होरपळलेल्या बेडग आणि नरवाडला धडक योजना संजीवनी ठरली. कालांतराने हीच धडक योजना शासनाने वसंतदादा साखर कारखान्याकडे वर्ग केली. धडक योजनेमुळे नरवाड आणि बेडगची शेती सुजलाम् सुफलाम् झाली. साखर कारखान्यावेळी ही योजना नेटाने राबविली, मात्र म्हैसाळ प्रकल्पाच्या वेळोवेळी झालेल्या आवर्तनामुळे धडक योजनेकडील नोंदी वेगाने कमी होत गेल्या. शेतीला पाणी देण्याचे क्षेत्र (नोंदी) कमी होत गेल्याने पाणीपट्टी आवाक्याबाहेर गेली. शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि पाणीपट्टी याचा ताळमेळ बसविताना शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले.परिणामी याचा फटका शेतीस पाणीपुरवठा करणाऱ्या धडक योजनेला पूर्णपणे बसल्याने गेल्या ४० वर्षांपासून म्हैसाळला कृष्णा नदीतून नरवाड ते बेडगपर्यंतच्या सिमेंट पाईप्स जीर्ण होऊन गळतीचे प्रमाण अधिक झाले.सद्यस्थितीत संबंधित धडक योजनेवरील सर्व साहित्य गंजले असून, पाणी बंदमुळे पोटलाईन टाकण्यासाठी वापरण्यात आलेल्या सिमेंट पाईप गायब होत आहेत. धडक योजनाच बंद पडल्याने योजनेवर कारखान्याने कोणतीही सुरक्षिततेची उपाययोजना केली नसल्याने या योजनेचे बारा वाजले आहेत. २० जानेवारी २०१३ ला विद्युत वितरण कंपनीने थकित वीज बिलामुळे धडक योजनेचा वीजपुरवठा तोडला आहे. यामुळे म्हैसाळ प्रकल्पाचे खंडित झालेले आवर्तन आणि बंद पडलेली धडक योजना या दोन्ही कचाट्यात शेतकरी अडकला आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास शेतकऱ्यांची पिके वाळून जाणार आहेत. लाभार्थी संख्या घटलीनरवाड धडक योजनानरवाड धडक योजना १२ जुलै १९८५ ला राज्य सरकारकडून सांगलीच्या वसंतदादा सहकारी साखर कारखान्याकडे वर्ग करण्यात आली. यावेळी १५० शेतकरी या योजनेचे सभासद होते, तर ३८५ एकरहून अधिक क्षेत्र ओलीताखाली आले होते, तर २०१३ अखेर केवळ २० शेतकरी लाभार्थी राहिले असून योजनेकडे केवळ ४० एकर क्षेत्राची नोंद राहिली आहे. बेडग धडक योजनाबेडग धडक योजनेकडे १९८५ मध्ये १४० सभासद होते, तर ४०० एकर क्षेत्र ओलिताखाली आले होते, मात्र २०१३ मध्ये केवळ १५ लाभार्थी उरले असून केवळ ३५ एकर जमिनीची नोंद उरली आहे. ‘म्हैसाळ’ योजनेचे पाणी मिळू लागल्यानंतर जादा पाणीपट्टीमुळे शेतकऱ्यांनी धडक योजनेकडे पाठ फिरवली आहे. परिणामी योजनाच अडचणीत आली आहे.