शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

ताकारीच्या दुसऱ्या आवर्तनाचा मार्ग मोकळा

By admin | Updated: February 2, 2015 00:17 IST

साखर कारखान्यांच्या माध्यमातून वसुली : वीज बिलापोटी ९० लाख वर्ग

प्रताप महाडिक - कडेगाव - ताकारी योजनेचा वीजपुरवठा वीजबिल थकबाकी न भरल्यामुळे वारंवार खंडित होत आहे. परंतु योजनेच्या लाभक्षेत्रातील ऊस गाळप करणाऱ्या सोनहिरा, उदगिरी, केन अ‍ॅग्रो आणि क्रांती या कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून योजनेची पाणीपट्टी वसूल केली आणि तातडीने योजनेकडे ९० लाख रुपयांची रक्कम वर्ग केली. वीजबिल थकबाकी भरल्यावर योजनेचा वीज पुरवठा पूर्ववत होईल व दुसरे आवर्तनही आठवड्यात सुरू होईल.ताकारी योजना व परिसरातील कारखाने परस्परावलंबी आहेत. योजना पूर्ण क्षमतेने चालल्याशिवाय कारखान्यांना गाळपासाठी पुरेसा ऊस मिळत नाही आणि कारखान्यांनी वसुली केल्याशिवाय योजनेला पाणीपट्टी वसूल होत नाही, याचे भान ठेवून दोन्ही बाजूंनी परस्परांना योजनेच्या सुरुवातीपासून सहकार्य केले जाते.ज्या-ज्यावेळी वीजबिल थकबाकीअभावी योजना बंद पडली, त्या-त्यावेळी मोहनराव कदम, पृथ्वीराज देशमुख व अरुण लाड हे तिन्ही कारखानदार पाणीपट्टी वसुली करून योजनेकडे रक्कम वर्ग करतात. यामुळे योजना पुन्हा कार्यान्वित होते.सध्या योजनेची ९० लाख रुपये वीजबिल थकबाकी आहे. महावितरणने योजनेचा वीजपुरवठा खंडित केला आहे. रब्बी पिकांसह ऊस शेतीही धोक्यात आहे. कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होऊन तीन महिने झाले. यामुळे कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून योजनेची पाणीपट्टी वसुली केली आणि योजनेकडे वर्ग केली.यामध्ये सोनहिरा साखर कारखान्याकडून ५० लाख, क्रांती कारखान्याकडून ३० लाख आणि केन अ‍ॅग्रो कारखान्याकडून १० लाख अशी जवळपास एक कोटी रुपयांची पाणीपट्टी वसुली करून योजनेकडे वर्ग केली आहे. आता योजनेकडून कृष्णा खोरे विकास महामंडळही रक्कम महावितरणकडे भरेल आणि वीज पुरवठा पूर्ववत होईल. ६ फेब्रुवारीपर्यंत योजनेचे दुसरे आवर्तनही सुरू होणार आहे. ताकारी उपसा सिंचन योजनेची पाणीपट्टी आकारणी, वसुली ही कामे कार्यक्षमपणे करण्यासाठी स्वतंत्र सिंचन विभागाची गरज आहे. टेंभू योजनेला स्वतंत्र सिंचन विभाग मंजूर झाला आहे. परंतु तिथेही कर्मचारी वर्ग अपुरा आहे. ताकारी योजनेलाही लाभक्षेत्राची पारदर्शक पध्दतीने मोजणी, पाणीपट्टी आकारणी व वसुली होणे गरजेचे आहे. याशिवाय लाभक्षेत्र दडवणाऱ्या बड्या शेतकऱ्यांनीही प्रामाणिक लाभक्षेत्राची पाणीपट्टी भरणे गरजेचे आहे.