शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
3
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
4
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
5
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
6
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
7
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
8
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
9
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
10
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
11
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
12
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
13
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
14
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
15
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
16
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
17
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
18
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
19
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
20
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...

झाडे लावण्यात फस्ट; मात्र जगविण्यात फेल

By admin | Updated: January 25, 2015 00:44 IST

सांगली जिल्ह्यातील चित्र : पन्नास टक्के वृक्ष सहा महिन्यात कोमजली

अशोक डोंबाळे, सांगली शतकोटी वृक्ष लागवड योजनेतून जिल्ह्यासाठी ४१ लाख ७५ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. यापैकी ४४ लाख ६० हजारांची वृक्ष लागवड करून राज्यात प्रथम क्रमांक पटकविला. परंतु, लागवडीनंतर वृक्ष जगविण्याच्याबाबतीत मात्र प्रशासनासह ग्रामपंचायत पदाधिकारी ‘फेल’ झाल्याचे दिसत आहे. लागवड केलेल्या वृक्षांपैकी ५० टक्के रोपे सहा महिन्यातच वाळून गेल्याचे पाहणीवरून स्पष्ट झाले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील आणि पुणे विभागाचे तत्कालीन विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी वृक्ष लागवडीसाठी धडक मोहीम हाती घेतली होती. ग्रामविकास विभागाकडून तर पर्यावरण संतुलित ग्राम योजना राज्यात सुरु केली होती. गावामध्ये शंभर टक्के वृक्ष लागवड आणि पाणीपट्टी, घरपट्टीची ७० टक्केहून अधिक वसुली करणाऱ्या गावांना लाखो रूपयांचे अनुदान दिले जात होते. या योजनेतून सांगली जिल्ह्याला वीस कोटीहून अधिक निधी मिळाला. कागदोपत्री ७०४ गावांपैकी ८० टक्के गावांमध्ये पर्यावरण संतुलित ग्राम योजना राबविल्याचे दिसत आहे. अनुदान घेईपर्यंत वृक्ष लागवड करून ती जगविली. परंतु, त्याकडे नंतर ग्रामपंचायतींसह पदाधिकाऱ्यांनीही दुर्लक्ष केल्यामुळे सध्या या वृक्षांनी माना टाकल्या आहेत. या वृक्षांकडे पाहिल्यानंतर शासनाच्या पर्यावरण समृध्द ग्राम योजनेचा फज्जा उडाल्याचे दिसत आहे. दुसरी महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे शतकोटी वृक्षलागवड. प्रभाकर देशमुख यांच्या संकल्पनेतून शतकोटी योजना पुढे आली. त्यानंतर राज्य शासनाने संपूर्ण महाराष्ट्रभर ती राबविली. या योजनेतून सांगली जिल्ह्याला ४१ लाख ७५ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. हे उद्दिष्टही पार केले आहे. चक्क जिल्ह्यात ४४ लाख ६० हजार वृक्षांची लागवड झाली होती. या मोहिमेत इच्छा नसतानाही सर्वच शासकीय कार्यालयांनी सहभाग घेतला होता. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनीही वृक्ष लागवडीसाठी विशेष लक्ष दिले होते. यातूनच जिल्हा वृक्ष लागवडीत राज्यात प्रथम क्रमांकावर पोहोचला होता. परंतु, वृक्ष लागवडीनंतर ती जगविण्याच्यादृष्टीने कुणीही पाऊल उचलत नसल्याचे दिसत आहे. वन विभागाची वृक्ष लागवड कशापध्दतीने होती, हे तर सर्वांनाच माहीत आहे. वर्षानुवर्षे त्याच त्या खड्ड्यात वृक्ष लावल्यामुळेच वीस वर्षानंतरही डोंगरावर वृक्ष दिसत नाहीत. वन विभागाचे दुर्लक्ष सोडून द्या, पण अन्य विभागांनीही वृक्ष लागवडीनंतर फारसे त्याकडे गांभीर्याने पाहिल्याचे दिसत नाही. म्हणून लागवड झालेल्या वृक्षांपैकी ५० टक्के वृक्ष वाळले आहेत. वृक्ष लागवड विभाग वृक्ष लागवड जिल्हा परिषद १८५५००० वन विभाग १६७०००० सामाजिक वन २७८००० अन्य विभाग १६७००० कृषी ४९०००० एकूण ४४६००००