शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

कडेगावातील पाणंद रस्ते अतिक्रमणात..

By admin | Updated: October 23, 2014 00:04 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : ऊसतोड हंगामात वाहतुकीची अडचण

कडेगाव : कडेगाव तालुक्यातील सोनहिरा, केनअ‍ॅग्रोसह जवळचे क्रांती, उदगिरी शुगर्स, कृष्णा, सह्याद्री हे साखर कारखाने दिवाळीनंतर सुरू होत आहेत. कारखाने सुरू होताच ऊस गळितासाठी जाणार आहे. परंतु अपवाद वगळता सर्वत्र शेतकऱ्यांनी पाणंद रस्त्यांवर अतिक्रमण केले आहे. कित्येक पाणंद रस्ते नकाशावर आहेत; परंतु शेतकऱ्यांनी रस्त्यावरही मशागत करून बागायती पिके घेतली आहेत. हे रस्ते प्रत्यक्षात गायब आहेत. अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी समन्वयाने रस्ते काढले आहेत. हे रस्ते नकाशावर नोंद नाहीत. प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे. परंतु ऊसतोड हंगामात रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.तालुक्यात ताकारी व टेंभू योजनेमुळे उसाचे क्षेत्र वाढले आहे. पूर्वी सुरू हंगामात ऊस लागण करणारे शेतकरी आता आडसाली ऊस लागण करीत आहेत. यामुळे जून-जुलै २०१३ मध्ये ऊस लावलेले शेतकरी आता कारखाने सुरू होताच १५ ते १६ महिने शेतामध्ये पोसलेला ऊस गळितासाठी पाठविणार आहेत. परंतु गावोगावी बागायती पिके वाढली आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी पाणंद रस्त्यावरही अतिक्रमण केले. गावांना जोडणारे मुख्य रस्ते झाले आहेत; मात्र पाणंद रस्त्यांचा प्रश्न सुटत नाही. अ‍ेनक गावांमध्ये रोजगार हमी योजनेतून अशा रस्त्यांच्या मुरमीकरणाची कामे सुरू झाली, परंतु लगतच्या शेतकऱ्यांच्या भांडणात अशी कामे बंद पडली. अनेक ठिकाणी आता शेतातील पिके तसेच ऊस बाहेर काढताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. रस्त्यांच्या वादातून गावोगावी शेतकऱ्यांमध्ये तंटा सुरू आहे. यामुळे राजकीय नेत्यांसह पोलिसांचीही डोकेदुखी वाढत आहे. शासनाने अतिक्रमण काढून टाकून रस्ते मोकळे करण्याची गरज आहे. अनेक गावातील पाणंद रस्ते दुर्लक्षित असल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. अनेक शेतकऱ्यांना ऊस बाहेर काढताना शेजारील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देऊन ऊस बाहेर काढावा लागतो.तालुक्यातील काही गावांमध्ये साखर कारखान्यांनी रस्ता विकास निधीमधून पाणंद रस्त्यांची कामे केली आहेत. मात्र सर्व कारखान्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शिवारामध्ये रस्त्यांची कामेकरण्यावर भर देणे गरजेचे आहे. काही गावांमध्ये आमदार, खासदार फंडातून रस्त्यांची कामे झाली आहेत. परंतु बहुतांशी पाणंद रस्त्यांवर अतिक्रमण वाढत आहे. (वार्ताहर)वादग्रस्त रस्त्यांची कामे ठप्परस्त्यांची कामे करण्यासाठी आमदार, खासदार फंड किंवा रोजगार हमी योजना तसेच अन्य मार्गाने निधी मिळतो; परंतु गावोगावी शिवारातील वादग्रस्त रस्त्यांची संख्या मोठी आहे. यामुळे अशा रस्त्यांची कामे करण्यासाठी ठेकेदारही पुढे येत नाहीत आणि ग्रामपंचायतीही अशा रस्त्यांची कामे सुरू करण्यासाठी शिफारस करत नाहीत. यामुळे वादग्रस्त रस्त्यांची कामे ठप्प आहेत.