शहरं
Join us  
Trending Stories
1
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
2
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
3
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
4
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
5
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
6
Bobby Darling : "माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
7
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
8
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
9
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
10
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
11
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
12
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
13
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
14
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
15
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
16
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
17
Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
18
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
20
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार

ठाकरेंच्या दौऱ्यावेळी शिवसेनेत गटबाजीचा झेंडा

By admin | Updated: May 3, 2016 00:41 IST

दोन स्वतंत्र रॅल्या : डिजिटल फलकांवरही झाली नेत्यांची विभागणी, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

सांगली : गटबाजीचे दीर्घकाळाचे ग्रहण घेऊन चालणाऱ्या सांगली जिल्ह्यातील शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्तही पुन्हा गटबाजी उफाळली. दोन वेगवेगळ््या रॅल्या आणि डिजिटल फलकांवरील नेत्यांच्या विभागणीने येथील गटबाजी अधोरेखित केली आहे. गटबाजीचे निशाण फडकविले जात असतानाच ठाकरेंनी भर सभेत पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेला सातत्याने मिळत असलेल्या अपयशावर बोट ठेवले. अंतर्गत गटबाजीचा शिवसेनेचा सिलसिला जुना आहे. शिवसेनेचे पदाधिकारी बदलले, तरी गटबाजी कायम राहिली. ठाकरेंचा १ मे रोजीचा महाराष्ट्र दिनाचा दौराही या गटबाजीवर उतारा ठरू शकला नाही. दौऱ्याच्या नियोजनासाठी सांगलीच्या सर्किट हाऊसवर झालेल्या बैठकीत तात्पुरते ‘मिले सूर मेरा तुम्हारा’चे गीत गाण्यात आले. जुळलेले हे सूर ठाकरेंच्या आगमनावेळी पुन्हा बिघडले. मारुती चौकातून एक स्वतंत्र रॅली ठाकरेंच्या स्वागतासाठी निघाली. यामध्ये संभाजी पवारांचा गट सहभागी होता. दुसऱ्या गटाने थेट ठाकरेंना घेऊन त्यांची थाटात रॅली काढली. त्यावेळी शिवसेनेचा आणखी एक गट तसेच शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते दिसून आले. ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्त लागलेले फलकही गटबाजीला अधोरेखित करीत होते. वसंतदादा घराण्याला टक्कर देऊन राज्याच्या राजकारणात आपला ठसा उमटविणाऱ्या माजी आमदार संभाजी पवार यांनी विधानसभेवेळी शिवसेनेत प्रवेश केला असला, तरी शिवसेनेच्या जिल्ह्यातील मुख्य प्रवाहापासून त्यांना दूरच रहावे लागले. आजही पवारांच्या गटाचे शिवसेनेतील अस्तित्व स्वतंत्र आहे. भाजपमध्ये असताना राज्यातील अनेक नेत्यांकडून त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त होत होता. शिवसेनेत ज्या अपेक्षेने त्यांचा प्रवेश झाला, त्या अपेक्षांची पूर्तता होताना दिसत नाही. म्हणूनच पवार गटातील कार्यकर्ते सध्या सेनेतील राजकारणामुळे नाराज दिसत आहेत. संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फौज मोठी असली तरी, ती पूर्ण नाही. ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींमधूनही विद्यमान आमदार अनिल बाबर, माजी आमदार संभाजी पवार असे दिग्गज नेते गायब होते. (प्रतिनिधी)गटबाजीची कारणमीमांसा होणार कधी?पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेला सातत्याने मिळत असलेल्या अपयशावर ठाकरे यांनी बोट ठेवले. सांगली जिल्ह्यापुरता विचार केला, तर शिवसेनेच्या अपयशामागे गटबाजी हेसुद्धा एक प्रबळ कारण आहे. याची कारणमीमांसा होताना आणि त्यातून सुधारणा होताना दिसत नाही. त्यामुळेच अपयशाचा सिलसिला कायम आहे.