शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

दलालांच्या नफेखोरीमुळे जतमध्ये द्राक्ष उत्पादकांची पिळवणूक

By admin | Updated: May 13, 2015 00:53 IST

व्यापाऱ्यांनी दर पाडले : डिसेंबर छाटणीची द्राक्षे बाजारात; मजुरी, खताचा खर्चही भागत नसल्याच्या तक्रारी

गजानन पाटील - संख -- जत तालुक्यातील तिकोंडी, संख, भिवर्गी परिसरातील १ ते २५ डिसेंबरमध्ये उशिरा छाटणी झालेल्या द्राक्षाची काढणी सुरू झाली आहे. अवकाळी पाऊस, व्यापाऱ्यांची नफेखोरीची वृत्ती, मंदी यामुळे द्राक्षांचा दर कमी करून बागायतदारांची लूट केली जात आहे. सध्या द्राक्षाला वाण व दर्जानुसार ३५ ते ५२ रुपये दर मिळत आहे. बाजारात मालाची कमी आवक असून, द्राक्षाला चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी असमाधानी आहेत. औषधांच्या, रासायनिक खतांच्या वाढत्या किमती, मजुरीच्या दरातील वाढ व मशागतीचा खर्च यामुळे द्राक्ष बागायतदार आधीच मेटाकुटीला आला आहे.प्रतिकूल परिस्थितीत पाण्याचा काटकसरीने वापर करीत ठिंबक सिंचन, मडकी सिंचनाने व शेततलाव काढून फोंड्या माळावर द्राक्षबागा उभारल्या आहेत. कृषी विभागाच्या अनुदानावर व स्वत: शेततळी बांधली आहेत. पाण्याचा नियोजनबध्द वापर करून दर्जेदार द्राक्षांचे उत्पादन घेतले जात आहे. जत तालुक्यामध्ये ४ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. स्वच्छ हवामान, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून दर्जेदार बेदाण्याची निर्मिती केली जात आहे. तालुक्यातील उमदी, संख, भिवर्गी, बिळूर, सिध्दनाथ, जालिहाळ खुर्द, रामपूर, डफळापूर, जालिहाळ बु।।, कोंतेवबोबलाद, मुचंडी, दरिकोणूर, अमृतवाडी परिसरात द्राक्षबागांचे क्षेत्र अधिक आहे. तीन टप्प्यात छाटणी करून उत्पादन घेतात. काही बागायतदार अगाप जुलै महिन्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात, सप्टेंबरचा शेवटचा आठवडा ते आॅक्टोबर, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत छाटणी घेतात. तिसरा टप्पा मागास छाटणी डिसेंबरमध्ये घेतात. यावर्षी डिसेंबर महिन्यापासून अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान, वातावरणातील बदल यासारख्या संकटांचा सामना करीत द्राक्षबागा आणल्या आहेत. थिनिंग, जिब्रॅलिक अ‍ॅसिड (जीए) यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. वाढती मजुरी, महागड्या औषधांनी द्राक्ष बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. उत्पादन चांगले आले आहे. परंतु व्यापाऱ्यांकडून कमी दर देऊन शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जात आहे.द्राक्षाची जात वर्ष २०१४ वर्ष २०१५ शरद सोनाक्का७१ रु. ५२ रु. माणिक चमन६० रु. ४५ रु. सुपर सोनाक्का६८ रु. ५० रु. थॉमसन५२ रु. ३५ रु. व्यापाऱ्यांच्या फसवणुकीमुळे रोखीने व्यवहारजत पूर्व भागात तिकोंडी, भिवर्गी, संख परिसरात द्राक्षबागांची छाटणी डिसेंबरमध्ये केली जाते. ही द्राक्षे मे, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत बाजारात येतात. एकरी १५ ते २० टन कच्चा माल काढला जातो. साखर १०० टक्के भरते. वजन चांगले भरते. बेदाण्यापेक्षा मार्केटिंगची द्राक्षे परवडतात, असे बागायतदारांचे मत आहे. द्राक्ष खरेदीसाठी भागात दलाल दाखल झाले आहेत. द्राक्ष, डाळिंब खरेदी करणाऱ्या दलालांकडून शेतकऱ्यांना लाखो रुपयांना फसविल्याची उदाहरणे घडली आहेत. त्यामुळे सर्वत्र सावध पवित्रा घेऊन रोखीने व्यवहार केले जात आहेत. अवकाळी पावसाने द्राक्षात कमी शुगर तयार झाल्याने गोडी कमी आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत कमी मागणी आहे.