शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

मोठ्या प्लॉटने बिघडले वाळू उपशाचे गणित

By admin | Updated: February 19, 2015 23:41 IST

उपसा बंदच : ठेक्याचे दोन, दोन कोटी आणायचे कोठून? प्रशासकीय गोंधळाने ठेकेदारांचा पळ

अंजर अथणीकर - सांगली यावर्षी वाळूचा प्लॉट एक ते दोन किलोमीटर रुंदीचा करण्यात आला आहे. त्यासाठी प्लॉटची बोलीही दोन कोटीहून अधिक असल्याने एवढी रक्कम भरायची कोठून, असा प्रश्न ठेकेदारांपुढे निर्माण झाल्याने, लिलाव घेऊनही अद्याप वाळू उपशासाठी परवानगी मिळालेली नाही. विशेष म्हणजे दुसऱ्या बाजूला प्रशासनाकडून दुसऱ्यांच्या काढण्यात आलेल्या फेरलिलावासाठी एकही निविदा आलेली नाही. यामुळे सध्यातरी वाळूचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. सांगली जिल्ह्यासाठी राज्य पर्यावरण समितीने ५० वाळू प्लॉटमधून वाळू उपसा करण्यासाठी परवानगी दिली होती. यासाठी जिल्हा प्रशासनाने निविदा काढली होती. यामध्ये केवळ चारच प्लॉटसाठी तीन किंवा तीनपेक्षा जादा निविदा आल्या. त्यानंतर ९ फेब्रुवारीरोजी आॅनलाईन लिलाव काढण्यात आला. यामध्ये पलूस तालुक्यातील दह्यारी व अंकलखोप त्याचबरोबर शिराळा तालुक्यात शिराळा खुर्द व पुनवत या चार वाळू प्लॉटचे लिलाव झाले. लिलावाची बोली ८ कोटी ६० रुपये झाली आहे. एका प्लॉटचा लिलाव सुमारे दोन कोटी रुपयांहून अधिक आहे.यावर्षी वाळू उपशासाठी एक प्लॉट एक ते दोन किलोमीटरपर्यंतचा करण्यात आला आहे. यासाठी निविदेची रक्कमही कोट्यवधीच्या घरात आहे. निविदा भरताना एकतृतियांश रक्कम भरणे आवश्यक असून, उपशासाठी परवानगी घेताना ठेक्याची पूर्ण रक्कम भरणे सक्तीचे करण्यात आले आहे. इतकी रक्कम एकाचवेळी कोठून आणायची, असा प्रश्न ठेकेदारांपुढे निर्माण झाला आहे. प्लॉटचे रुंदीकरण वाढविण्यात आल्याने प्लॉटची निम्मी जागा वाळू नसलेली आहे, अशी तक्रार ठेकेदारांची आहे. दोन-दोन कोटीचा एक प्लॉट असल्यामुळे तीन ते चार ठेकेदार एकत्रित येऊन त्यांना प्लॉट घ्यावा लागत आहे. वाळू उपशासाठी परवानगी घेण्यासाठी त्यांना आता ठेक्याची पूर्ण रक्कम भरावी लागणार आहे. आॅनलाईन लिलाव ९ फेब्रुवारीरोजी पूर्ण झाले असताना, एकाही ठेकेदाराने अद्याप ठेक्याची रक्कम भरलेली नाही. यामुळे कोणालाही वाळू उपसा करण्यासाठी परवानगी मिळालेली नाही. जिल्ह्यात वाळू उपसा पूर्णपणे बंद असल्यामुळे वाळूचा दर भडकला आहे. सध्या वाळूचा दर सहा हजार रुपये ब्रास झाला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये सोलापूर, कर्नाटकातून वाळूची आवक सुरू झाली आहे. वाळूची कडक तपासणी सुरू असल्यामुळे कर्नाटकातूनही येणाऱ्या वाळूचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायावर गंभीर परिणाम झाला आहे. एकही निविदा नाहीचार प्लॉटचे लिलाव झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून उर्वरित ४६ प्लॉटसाठी फेरलिलाव काढले. या लिलावांमध्ये एकही निविदा आली नाही. त्यामुळे आता पुन्हा ४६ प्लॉटसाठी तिसऱ्यांदा लिलाव काढण्यात येणार आहेत. त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही, तर याबाबत शासनाकडून मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच ठेकेदारांनी वाळूकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे.