शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

एक लाख विद्यार्थ्यांच्या आत्मवृत्ताचा दस्तावेज

By admin | Updated: April 10, 2015 23:46 IST

सांगली शिक्षण संस्थेचा उपक्रम : ‘आम्ही’ संकलनास साठ वर्षे पूर्ण; राज्यातील पहिलाच प्रयोग

नरेंद्र रानडे - सांगली -सांगली शिक्षण संस्थेने १९५४ पासून ‘आम्ही’ या विद्यार्थ्यांच्या हस्तलिखित ‘जीवन वृत्तांत’ संग्रहास प्रारंभ केला आहे. साहजिकच संस्थेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रशालेतील भूतकाळात डोकावायची संधी उपलब्ध आहे. आजही हस्तलिखिताची परंपरा अखंडितपणे सुरू आहे. आतापर्यंत संस्थेच्या विविध शाळांतील ग्रंथालयांमध्ये सुमारे एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांच्या आत्मवृत्तांताचा दस्तावेज सांभाळून ठेवला आहे.‘मज आवडते ही मनापासुनी शाळा, लाविते लळा ही जशी माऊली बाळा’ असे शाळेबाबत म्हटले जाते. सध्याच्या धावपळीच्या काळातही विद्यार्थ्यांना लिहिते करण्याचा उपक्रम प्रशालेच्या माध्यमातून जोपासला जात आहे. आजअखेर संस्थेच्या १३ माध्यमिक आणि १९ प्राथमिक शाळा आहेत. यामधील चौथी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी त्यांना प्रशालेत शिकताना आलेले विविध अनुभव ‘आम्ही’मध्ये मांडले आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अत्यंत मनमोकळेपणाने त्यांच्या मनातील भावनांना शब्दरूप दिले आहे. भविष्यात केव्हाही शालेय जीवनातील भूतकाळात डोकावून पाहायचे म्हटले तर, संबंधित प्रशालेत येऊन केवळ विशिष्ट वर्ष ग्रंथपालांना सांगितले की आपल्यासमोर त्या काळचा ‘आम्ही’चा अंक उपलब्ध आहे. सिटी हायस्कूलमधील उपक्रमशील शिक्षक भा. द. सहस्त्रबुध्दे यांना ही संकल्पना १९५४ मध्ये सुचली. तत्कालीन मुख्याध्यापक के. जी. दीक्षित यांनी त्यांना प्रोत्साहन दिले आणि दि. ११ फेब्रुवारी १९५४ रोजी ‘आम्ही’च्या प्रथम अंकाची निर्मिती झाली. पहिल्याच अंकात शिक्षक द्वा. वा. केळकर यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेत, प्रशालेने तुम्हाला दिलेली संस्काराची शिदोरी नीट बांधून घ्या, असा प्रेमाचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला आहे. त्याचप्रमाणे ‘आम्ही’ अंकामागील पार्श्वभूमीही सविस्तरपणे विशद केली आहे. ही संकल्पना पुढील काळातही संस्थेने सातत्याने राबविली आहे. पंधरा वर्षांपूर्वीपासून इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनाही या उपक्रमात सामावून घेण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेले स्वानुभवही वाचण्यासारखे आहेत. हा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम असून, यापासून प्रेरणा घेऊन राज्यातील अन्य काही शाळांतूनही उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात येत आहे. ‘आम्ही’ हा अभिनव उपक्रम संस्थेत १९५४ पासून अव्याहतपणे राबविण्यात येत आहे. माजी विद्यार्थी जेव्हा शाळेत येतात तेव्हा आवर्जून ‘आम्ही’चा अंक पाहतात. त्यातील पानांना स्पर्श करताच त्यांना एक वेगळीच अनुभूती मिळते आणि ते त्यांच्या काळात रममाण होतात. भविष्यात देखील हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.- जनार्दन लिमये उपाध्यक्ष, सांगली शिक्षण संस्था ‘आम्ही’मध्ये आहे काय?शाळेचा निरोप घेताना तत्कालीन विद्यार्थ्यांचे बालपणापासून दहावीपर्यंत आलेले अनुभव त्यांच्या छायाचित्रांसह त्यांच्या हस्ताक्षरात यामध्ये शब्दबध्द करण्यात आलेले आहेत. जीवनातील महत्त्वाच्या घटना तसेच भविष्यात कोण व्हायचे आहे, हे देखील विद्यार्थ्यांनी लिहिलेले आहे. ‘आम्ही’मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरचा पत्ता लिहिलेला आहे. याचा लाभ १९५४ नंतर सुमारे तीस ते पस्तीस वर्षांनी ज्यावेळी माजी विद्यार्थ्यांचे एकत्रिकरणाचा उपक्रम प्रशालेने राबविला, त्यावेळी दिसून आला. अनेकांचे पत्ते लिखित स्वरुपात उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांशी पत्ररूपाने संवाद साधण्यास मदत झाली.