शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
4
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
5
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
6
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
7
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
8
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
9
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
10
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
11
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
12
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
13
तुमच्या कराचा पैसा जातोय कुठे? GST मध्ये १५ हजार कोटींचा महाघोटाळा, वाचा काय आहे हे प्रकरण!
14
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
15
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
16
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
17
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
18
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
19
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
20
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा

राजेवाडी एक्स्चेंजमधील ‘डायलटोन’ गप्पच!

By admin | Updated: February 16, 2015 23:11 IST

फोन संख्या घटली : सेवा मोडकळीस, दूरध्वनी केवळ बिलास भार

लक्ष्मण खटके - लिंगीवरे राजेवाडी एक्स्चेंजमधील वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे लिंगीवरे, राजेवाडी येथील सुमारे ९० टक्के लॅँडलाईन फोन ग्राहकांनी बंद केले आहेत. ‘डायलटोन’ वारंवार गप्प होत असल्यामुळे हाताच्या बोटावर मोजण्याइतपत उरलेले दूरध्वनी कनेक्शनही केवळ बिल भरण्यापुरतेच राहिले आहेत.आटपाडी तालुक्यात राजेवाडी एक्स्चेंज जिल्ह्याच्या व तालुक्याच्या शेवटच्या व दुर्गम टोकाला आहे. गेल्या बारा वर्षांपूूर्वीपासून सुरू करण्यात आलेल्या एक्स्चेंजमध्ये बापूराव साठे नामक आॅपरेटर स्वतंत्रपणे नेमण्यात आला होता. त्यावेळी सुमारे १९५ फोनधारक तयार ग्राहक करून ग्राहकसेवा चोखपणे बजावली जात होती. अधूनमधून बिघाड झाल्यास राजेवाडी येथे एक्स्चेंजमध्येच फोन केला की लगेच दुरुस्तीबाबत प्रयत्न करून दूरध्वनीची सेवा सुरळीतपणे सुरू करण्यात येत होती. राजेवाडी एक्स्चेंजला जोडणारी केबल दिघंची येथून जमिनीखालूून आणली आहे. या भागात अलीकडे शेतकऱ्यांनी कालव्यांमधून जमिनीखालून जलवाहिन्या टाकण्याचा मोठा प्रयत्न केला आहे. अनेकदा जमिनीत जलवाहिनी टाकण्यासाठी खुदाई करताना ही केबल तुटली जाते. पुन्हा जोड दिल्यानंतर त्यामध्ये पाणी, चिखलाची राड जाऊन सेवा सुरळीत मिळणे अवघड जाते. बीएसएनएलने कायम सेवेतील आॅपरेटर काढल्यानंतर कंत्राटी स्वरुपात कामगारांना ठेका दिला. परंतु कमी उत्पन्न आणि काम जास्त यामुळे कामगारांची कुचंबणा होऊ लागली. अन्य एक्स्चेंजच्या आॅपरेटरला जादा काम करण्यास लावून कामाचा बोजा वाढला. तसेच वारंवार विस्कळीतपणा येऊन त्यांना काम करणे अवघड झाले. त्यामुळे लॅँडलाईन सेवेतील पूर्ण विश्वास नष्ट होऊन सर्रास ग्राहकांनी केवळ भुर्दंड सहन करण्यापेक्षा फोनसेवा बंद केली व मोबाईल सेवेचा आधार घेतला. वाढत्या मोबाईलमुळे दूरध्वनी फोनला पूर्णविराम मिळाला. आज १६५ पैकी केवळ दोनच फोन सेवा लिंगीवरे येथे नाईलाजाने रेकॉर्डवर सुरू आहेत. प्रत्यक्षात मात्र एकदाही फोन करण्यास व येण्यास याचा फायदा होत नाही. राजेवाडी गावातही अशीच स्थिती झाली आहे. एकूणच या साऱ्या प्रकारांबाबत ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.ग्रामपंचायतमध्ये इंटरनेट कनेक्शनसाठी टेलिफोन सुरू ठेवण्यात आला आहे. परंतु त्याचा कधीही लाभ झाला नाही. ही सेवाही नियमितपणे चाललीच नाही.- आगतराव खांडेकर, सरपंच, लिंगीवरे‘लोकमत’चा पाठपुरावाबंद असलेल्या फोनचे बिल वाढले म्हणून न्यायालयातून ग्राहकांना नोटिसा बजावण्यात आल्या. नाहकपणे ग्राहकांनी व्याजासह पैसे भरल्याशिवाय पर्यायच उरला नाही. या एक्स्चेंजमधील ग्राहकांनी फोन केले नसले तरी, कॉल नोंदी होऊन चार्ज भरावे लागल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यावरही ‘लोकमत’ने आवाज उठविला होता. फोन बंद, बिलिंग सुरूराजेवाडी एक्स्चेंजमधील फोन कायम बंदच आहेत. दुरुस्तीसाठी आटपाडी येथील कार्यालयात फोन केल्यापुरता फक्त एखादा दिवस फोन सुरू असतो. पुन्हा फोन नादुरुस्तच असतो. मात्र बिल हे नियमितपणे येणे सुरूच असते.