शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

खानापूरच्या ‘अग्रणी पॅटर्न’चा राज्यात डंका

By admin | Updated: September 10, 2015 00:37 IST

मुख्यमंत्री करणार पाहणी : दोन कोटी रुपयांचे नदी पुनरुज्जीवनाचे काम झाले पन्नास लाखात

दिलीप मोहिते ल्ल विटा गेल्या अनेक पिढ्यांपासून दुष्काळाने पाय रोवलेल्या खानापूर तालुक्याच्या पूर्व भागाला आता अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवनामुळे हरितक्रांतीचा टिळा लागण्याचा क्षण अंतिम टप्प्यात आला आहे. जलयुक्त शिवार अभियान, लोकसहभाग व प्रशासनाच्या प्रयत्नातून खानापूर तालुक्यातून उगम पावलेल्या अग्रणी नदीपात्राचे २० कि.मी. अंतरापर्यंत खोलीकरण व रुंदीकरण पूर्ण केल्याने अग्रणी पुनरुज्जीवनाचा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे दुष्काळी खानापूर तालुक्यातील या ‘अग्रणी पॅटर्न’चा संपूर्ण महाराष्ट्रभर गवगवा झाला आहे. परिणामी, लोकसहभाग व प्रशासनाच्या अथक् परिश्रमातून सव्वादोन कोटीचे हे काम अवघ्या पन्नास लाखाच्या निधीत पूर्ण झाल्याने अग्रणी नदीने मोकळा श्वास सोडला आहे. दरम्यान, संपूर्ण राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या या अग्रणी पुनरुज्जीवनाच्या कामाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून ते लवकरच अग्रणी नदीचा पाहणी दौरा करणार आहेत. खानापूर तालुक्यात दुष्काळ पाचवीला पूजलेला आहे. शेतीपाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात असलेल्या या खानापूर तालुक्यात ‘टेंभू’च्या माध्यमातून हरितक्रांती आणण्याचे प्रयत्न शासकीय व राजकीय पातळीवर झाले. परंतु, ‘टेंभू’पासून वंचित राहणाऱ्या खानापूर तालुक्याच्या पूर्व भागाला कायमस्वरूपी पाणी देण्याचा प्रयोग अयशस्वी झाला आहे. त्यामुळेच खानापूर तालुक्यातून उगम पावणाऱ्या अग्रणी नदीपात्राच्या खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाची कल्पना समोर आली. शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानातून हे काम पूर्ण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. परंतु, तालुक्याच्या कार्यक्षेत्रात या नदीचे २० कि.मी. अंतराचे पात्र आहे. हे काम पूर्ण करणे शासनाच्या निधीवर अवलंबून न ठेवता ते लोकसहभागातूनही पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रांताधिकारी सचिन इथापे व तहसीलदार सौ. अंजली मरोड यांनी विविध संस्था व लोकांना आवाहन केले. आ. अनिल बाबर यांनीही प्रयत्न केले. त्यामुळे सहकारी व सेवाभावी संस्थांनी साडेनऊ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला.