शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

मिरज ग्रामीणमध्ये भाजपला बाळसे

By admin | Updated: October 23, 2014 00:07 IST

मोदींचा प्रभाव कायम : काँग्रेसला मतदारांनी झिडकारले

प्रवीण जगताप -लिंगनूर -मिरज मतदारसंघावर भाजपने पकड मजबूत केली आहे, हे सुरेश खाडे यांच्या ६४ हजारांच्या मताधिक्यावरून स्पष्ट होत आहे. ग्रामपंचायती व पंचायत समितीवर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची फळी नेतृत्व करीत असूनही नेते व कार्यकर्त्यांना मतदारसंघात ताकद सिद्ध करता आली नाही. मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केल्याने, भाजपने पाळेमुळे घट्ट केली आहेत. ग्रामपंचायत, पंचायत समितीत नगण्य स्थान असतानाही सलग दुसऱ्यांदा वाढीव मताधिक्यासह दुसरी टर्म खाडे यांना मिळाली आहे. त्यामुळे मतदारसंघात व ग्रामीण भागातही भाजपने बाळसे धरले आहे. कॉँग्रेस, बंडखोर व राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या मतांची बेरीजही भाजपच्या आकड्यापर्यंत पोहोचत नसल्याने सर्व भाजपेतर नेत्यांना व कार्यकर्त्यांना या निकालाने चपराक दिली आहे. त्यांना आता अंतर्मुख होऊन नव्याने बांधणी करावी लागणार आहे.राष्ट्रवादीला जयंत पाटील यांची सोबत असूनही १० हजारांच्या आसपासच समाधान मानावे लागले, तर शिवसेनेलाही २० हजारांच्या घरातच थांबावे लागले. अलीकडच्या काही निवडणुकांमध्ये ग्रामपंचायतीला मदन पाटील व विधानसभेला अजितराव घोरपडे यांच्या नेतृत्वालाच विजय मिळत होता. गतवेळच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला घोरपडे गटाची मदत उपयोगी पडली होती. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला घोरपडे गटात असूनही राष्ट्रवादीतून कार्यरत असणाऱ्यांची मदत मिळेल असे वाटत होते. पण पूर्व भागातून ती प्रत्यक्षात मिळाली की नाही, याचीही तपासणी करण्याइतपत राष्ट्रवादीला मतदान मिळाले आहे. त्यामुळे पूर्व भागातील घोरपडे गटाने कमळच हातात घेतले की काय?, अशी कुजबूज सुरू आहे. कॉँग्रेसची तर तिकीट वाटपापासूनच बिकट अवस्था झाली. माजी मंत्री मदन पाटील व प्रतीक पाटील यांनी संमती दिलेल्या उमेदवारास अंतिमक्षणी तिकीटच मिळाले नाही. सिद्धार्थ जाधव यांनी बाजी मारली. पण ती बाजी विजयासाठी पुरेशी ठरली नाही. त्यामुळे बंडखोरी झाली. कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांची शहरी फळी एकासोबत, तर ग्रामीण फळी बंडखोरासोबत, या सर्व परिस्थितीत इतर सर्व पक्षांच्या उमेदवारांना सामान्य मतदारांनी झिडकारले. या निवडणुकीत ग्रामीण भागात मोदी यांची लाट फारशी ओसरली नसल्याचे दिसून आले. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या बळापेक्षा पंतप्रधान मोदी यांच्या प्रभावाखाली मतदान अधिक झाले. त्यामुळे ग्रामीण भागातून प्रभाव नसतानाही खाडेंना मताधिक्य मिळाले. घोरपडे गटाची मदतगतवेळच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला घोरपडे गटाची मदत उपयोगी पडली होती. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला घोरपडे गटात असूनही राष्ट्रवादीतून कार्यरत असणाऱ्यांची मदत मिळेल असे वाटत होते. पण पूर्व भागातून ती प्रत्यक्षात मिळाली की नाही, याचीही तपासणी करण्याइतपत राष्ट्रवादीला मतदान मिळाले आहे. त्यामुळे पूर्व भागातील घोरपडे गटाने कमळच हातात घेतले की काय?, अशी कुजबूज सुरू आहे.