शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

गुळाला दर नसल्यामुळे गुऱ्हाळघरे अडचणीत

By admin | Updated: November 27, 2014 00:18 IST

गळितासाठी शेतकरी धजेनात : आरळा, कणदूरपर्यंत ४५ गुऱ्हाळ ठिय्ये

पुनवत : शिराळा तालुक्यातील वारणा पट्ट्यात आणि विशेषत: कणदूरमध्ये गुऱ्हाळघरे नुकतीच सुरू झाली आहेत. मात्र हंगामाच्या सुरूवातीलाच गुळाला चांगला दर नसल्याने, शेतकरी गुऱ्हाळातील गळिताकडे पाठ फिरवू लागले आहेत. ऊस दराचा निर्णय झाल्यानंतरच गुळाच्या दरात वृध्दी होईल, असे तज्ज्ञांकडून बोलले जात आहे.शिराळा तालुक्यात साधारणत: दिवाळीनंतर गुऱ्हाळांचा गळीत हंगाम सुरू होतो. यावर्षी परवाच्या अवकाळी पावसामुळे गुऱ्हाळघरे उशिरा सुरू झाली आहेत. काही गुऱ्हाळघरे सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. वारणा पट्ट्यात आरळ्यापासून ते कणदूरपर्यंत सुमारे ४० ते ४५ गुऱ्हाळ ठिय्ये आहेत. प्रतिवर्षी एकेका गुऱ्हाळघरात सुमारे २५ ते ३० लोकांना रोजगार मिळतो. गेल्यावर्षी कणदूर येथील शेतकऱ्यांच्या गुळाच्या कलमांना ५ हजार ते ६ हजार ८०० पर्यंत दर मिळाला. गुळमोदकांनाही गतवर्षी ८ हजारपर्यंत दर मिळाला आहे. मात्र व्यापाऱ्यांच्या गुळदराच्या धोरणावर शेतकऱ्यांची नाराजी आहे. व्यापाऱ्यांनी फक्त एखाद्या कलमाला वाढीव दर न देता सरासरी दर वाढवला पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. उसाचा दर निश्चित नसल्याने गुळाचा दरही जेमतेमच आहे. शेतकरी गुळाच्या गळिताकडे सध्या तरी पाठ फिरवू लागले आहेत. (वार्ताहर)आदनाचे गणितएका आदनाला २ टन ऊस लागतो. या गळितातून ८ ते ९ रवे पडतात. एका आदनाचा गुऱ्हाळ खर्च १८०० रुपये असून, त्या गुळाला बाजारपेठेत २५०० ते ३००० पर्यंत दर मिळाला, तर शेतकऱ्यांना अजिबात परवडत नाही. शेतकऱ्यांनी गुळाची विक्री शेरणी रुपात केली, तर त्याला एका आदनापासून ४००० ते ४२०० रुपये मिळतात.