शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पलूस तालुक्यातील शेती व्यवसाय अडचणीत...

By admin | Updated: November 23, 2014 23:45 IST

बदलत्या हवामानाचा फटका : द्राक्षबागायतदार उद्ध्वस्त, कृषी विभागाचे दुर्लक्ष1

पलूस : हवामानातील बदल, बिघडलेलं अर्थकारण, कृषी विभागाचे दुर्लक्ष आणि बेपर्वाई यामुळे सधन पलूस तालुक्यातील शेती अडचणीत आली आहे. ही शेती आता विकासाच्या वाटेवर आणणे एक आव्हान ठरणार आहे.अवकाळी पाऊस आणि हवामानातील वारंवार होणाऱ्या बदलांमुळे पलूस तालुक्यातील रब्बी हंगामाला दिलासा मिळाला असला तरी, तालुक्यात सुमारे ८० टक्के द्राक्षबागांचे प्रचंड नुकसान झाल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत.पलूस तालुक्यात जवळपास चार हजार एकर द्राक्षबागांचे क्षेत्र आहे. पैकी २५० ते ३०० एकर क्षेत्रावरील द्राक्षबागा अवकाळी पावसाने आणि लहरी हवामानामुळे उद्ध्वस्त झाल्या आहेत. पलूस तालुका हा कृषीप्रधान असून, कृष्णा खोऱ्यातील या तालुक्यात पाणी योजनांचे जाळे आहे. सकस जमीन आणि मुबलक पाणी यामुळे तालुक्यातील शेतीचा विकास झाला आहे. प्रामुख्याने ऊस, द्राक्ष, केळी, सोयाबीन, पिकांबरोबरच खरीप आणि रब्बी तसेच पालेभाज्या, फळभाज्यांचे मोठे उत्पादन घेतले जाते.मात्र अनुकूल हवामानामुळे येथील शेतकरी द्राक्ष उत्पादनाकडे वळला. द्राक्षासाठी कोरडे हवामान आवश्यक असते. तालुक्यातील हवामान काहीसे आर्द्रतायुक्त असते. तरीही येथील शेतकऱ्यांनी मोठी जोखीम पत्करून द्राक्षाच्या बागा लावल्या. मोठी भांडवली गुंतवणूक, प्रचंड जोखीम, मजूर, खते, औषधे, वीज यांची प्रचंड दरवाढ, उत्पादनातील अनिश्चितता आणि बाजारपेठांसाठी संघर्ष, दलालांकडून होणारी फसवणूक अशाही परिस्थितीत द्राक्षांचे उत्पादन घेतले. द्राक्ष उत्पादनाचा शेतकऱ्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला, तरी शासकीय पातळीवर या शेतकऱ्यांची उपेक्षाच होत राहिली. याशिवाय प्रचंड महागाई, उत्पादन खर्चातील वाढ, उत्पादनातील घट, व्यापाऱ्यांकडून होणारी लूट, फसवणूक आदींमुळे द्राक्षशेती आता उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.साधारणपणे आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोबर व नोव्हेंबरमध्ये द्राक्ष छाटणी घेतली जाते. मात्र काही वर्षांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असल्याचे निदर्शनास येते. यावर्षी तर नोव्हेंबर महिना संपत आला तरी अवेळी झालेला पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे द्राक्ष बागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने जवळपास ८० टक्के बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. अगदी मोजक्या द्राक्षबागायतदारांचा अपवाद वगळता उर्वरित बागायतदार हे कर्जबाजारी आहेत. गेल्या काही वर्षात द्राक्ष उत्पादनात घट होत असल्याचे दिसून येते. यावर्षी तर ८० टक्के बागा उद्ध्वस्त झाल्या असून, उर्वरित २० टक्के क्षेत्रातील उत्पादकही नफ्यात येण्याची शक्यता अजिबात नाही. त्यामुळे द्राक्षशेती बचावासाठी शासनाच्या सहकार्याची अपेक्षा शेतकरी करीत आहेत.ढगाळ हवामान आणि पाऊस यामुळे रब्बी हंगामसुध्दा अडचणीत आला आहे. हवामानातील बदलांमुळे गहू पिकांवर तांबेरा रोग पडण्याची शक्यता आहे, तर हरभऱ्यावर अळींचा प्रादुर्भाव झाला आहे. मात्र शाळू पिकाला हे हवामान अनुकूल आहे. उसासाठीसुध्दा हे हवामान पूरक आहे.तालुक्यात द्राक्षबागांसह रब्बी हंगामातील पिके अडचणीत असली तरी, कृषी विभाग मात्र मूग गिळून गप्प आहे. शासकीय योजनांचा लाभ वर्षानुवर्षे ठराविक शेतकऱ्यांनाच मिळतो आहे. (वार्ताहर)प्रशिक्षणाची गरजकृषी विद्यापीठाच्या सहलीतून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याऐवजी पर्यटनावर जोर असतो. शेतकऱ्यांसाठी येणारी खते, औषधे-बियाणे कोणा कोणाला वाटली जातात, याची खातेनिहाय चौकशी झाली तर गंभीर प्रकार उघडकीस येतील. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी शासनाच्या योजनांपासून वंचित असून, कृषी विभागापासून दूरच आहे.