शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

पलूस तालुक्यातील शेती व्यवसाय अडचणीत...

By admin | Updated: November 23, 2014 23:45 IST

बदलत्या हवामानाचा फटका : द्राक्षबागायतदार उद्ध्वस्त, कृषी विभागाचे दुर्लक्ष1

पलूस : हवामानातील बदल, बिघडलेलं अर्थकारण, कृषी विभागाचे दुर्लक्ष आणि बेपर्वाई यामुळे सधन पलूस तालुक्यातील शेती अडचणीत आली आहे. ही शेती आता विकासाच्या वाटेवर आणणे एक आव्हान ठरणार आहे.अवकाळी पाऊस आणि हवामानातील वारंवार होणाऱ्या बदलांमुळे पलूस तालुक्यातील रब्बी हंगामाला दिलासा मिळाला असला तरी, तालुक्यात सुमारे ८० टक्के द्राक्षबागांचे प्रचंड नुकसान झाल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत.पलूस तालुक्यात जवळपास चार हजार एकर द्राक्षबागांचे क्षेत्र आहे. पैकी २५० ते ३०० एकर क्षेत्रावरील द्राक्षबागा अवकाळी पावसाने आणि लहरी हवामानामुळे उद्ध्वस्त झाल्या आहेत. पलूस तालुका हा कृषीप्रधान असून, कृष्णा खोऱ्यातील या तालुक्यात पाणी योजनांचे जाळे आहे. सकस जमीन आणि मुबलक पाणी यामुळे तालुक्यातील शेतीचा विकास झाला आहे. प्रामुख्याने ऊस, द्राक्ष, केळी, सोयाबीन, पिकांबरोबरच खरीप आणि रब्बी तसेच पालेभाज्या, फळभाज्यांचे मोठे उत्पादन घेतले जाते.मात्र अनुकूल हवामानामुळे येथील शेतकरी द्राक्ष उत्पादनाकडे वळला. द्राक्षासाठी कोरडे हवामान आवश्यक असते. तालुक्यातील हवामान काहीसे आर्द्रतायुक्त असते. तरीही येथील शेतकऱ्यांनी मोठी जोखीम पत्करून द्राक्षाच्या बागा लावल्या. मोठी भांडवली गुंतवणूक, प्रचंड जोखीम, मजूर, खते, औषधे, वीज यांची प्रचंड दरवाढ, उत्पादनातील अनिश्चितता आणि बाजारपेठांसाठी संघर्ष, दलालांकडून होणारी फसवणूक अशाही परिस्थितीत द्राक्षांचे उत्पादन घेतले. द्राक्ष उत्पादनाचा शेतकऱ्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला, तरी शासकीय पातळीवर या शेतकऱ्यांची उपेक्षाच होत राहिली. याशिवाय प्रचंड महागाई, उत्पादन खर्चातील वाढ, उत्पादनातील घट, व्यापाऱ्यांकडून होणारी लूट, फसवणूक आदींमुळे द्राक्षशेती आता उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.साधारणपणे आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोबर व नोव्हेंबरमध्ये द्राक्ष छाटणी घेतली जाते. मात्र काही वर्षांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असल्याचे निदर्शनास येते. यावर्षी तर नोव्हेंबर महिना संपत आला तरी अवेळी झालेला पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे द्राक्ष बागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने जवळपास ८० टक्के बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. अगदी मोजक्या द्राक्षबागायतदारांचा अपवाद वगळता उर्वरित बागायतदार हे कर्जबाजारी आहेत. गेल्या काही वर्षात द्राक्ष उत्पादनात घट होत असल्याचे दिसून येते. यावर्षी तर ८० टक्के बागा उद्ध्वस्त झाल्या असून, उर्वरित २० टक्के क्षेत्रातील उत्पादकही नफ्यात येण्याची शक्यता अजिबात नाही. त्यामुळे द्राक्षशेती बचावासाठी शासनाच्या सहकार्याची अपेक्षा शेतकरी करीत आहेत.ढगाळ हवामान आणि पाऊस यामुळे रब्बी हंगामसुध्दा अडचणीत आला आहे. हवामानातील बदलांमुळे गहू पिकांवर तांबेरा रोग पडण्याची शक्यता आहे, तर हरभऱ्यावर अळींचा प्रादुर्भाव झाला आहे. मात्र शाळू पिकाला हे हवामान अनुकूल आहे. उसासाठीसुध्दा हे हवामान पूरक आहे.तालुक्यात द्राक्षबागांसह रब्बी हंगामातील पिके अडचणीत असली तरी, कृषी विभाग मात्र मूग गिळून गप्प आहे. शासकीय योजनांचा लाभ वर्षानुवर्षे ठराविक शेतकऱ्यांनाच मिळतो आहे. (वार्ताहर)प्रशिक्षणाची गरजकृषी विद्यापीठाच्या सहलीतून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याऐवजी पर्यटनावर जोर असतो. शेतकऱ्यांसाठी येणारी खते, औषधे-बियाणे कोणा कोणाला वाटली जातात, याची खातेनिहाय चौकशी झाली तर गंभीर प्रकार उघडकीस येतील. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी शासनाच्या योजनांपासून वंचित असून, कृषी विभागापासून दूरच आहे.