शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

जिल्ह्यात ८६२ दृष्टिहीनांना मिळाली दृष्टी!

By admin | Updated: June 10, 2016 00:19 IST

तीनशेजण प्रतीक्षेत : दोन हजारजणांचे मरणोत्तर नेत्रदान; ‘सिव्हिल’चा पुढाकार

सचिन लाड -- सांगली --जिल्ह्यात नेत्रदानाची संकल्पना चांगल्याप्रकारे रुजत आहे. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील २१६७ जणांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. नेत्रदानाच्या या संकल्पातून ८६२ अंध व्यक्तींना दृष्टी मिळाली आहे. यासाठी सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाचे मोठे योगदान आहे. रुग्णालयाने मरणोत्तर नेत्रदानाविषयी अविनाश शिंदे यांची समुपदेशक म्हणून नियुक्ती केल्यानंतर मरणोत्तर नेत्रदानाचे प्रमाण वाढले आहे. अजूनही जिल्ह्यातील तीनशे अंध व्यक्ती दृष्टीच्या प्रतीक्षेत आहेत.मराठवाड्यातील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या काळात सोयी-सुविधा नसतानाही त्यांनी लाखो नेत्र शस्त्रक्रिया करून अनेक अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त करुन दिली. नेत्रदानाबाबत प्रबोधन केले. राज्य शासनाने डॉ. भालचंद्र यांच्या मरणोत्तर १० जून हा नेत्रदान दिन घोषित केला आहे. माणसाच्या मृत्यूनंतर काही तास त्याचे अवयव जिवंत असतात. या काळात त्यांचे दान करणे गरजेचे असते. दुर्धर व्याधींनी ग्रासलेल्या व कृत्रिमरित्या अंधत्व आलेल्या लोकांना या अवयवांचा मोठा फायदा होतो. ज्या व्यक्तींना कृत्रिमरित्या अंधत्व आलेले असते, त्यांच्यासाठी हे नेत्रपटल अत्यंत उपयुक्त ठरतात. त्यांच्यावर केलेली बुबुळरोपण शस्त्रक्रिया यशस्वी होते. यातून ६० टक्के लोकांना नवी दृष्टी प्राप्त होते. अंध व्यक्तींच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी शासकीय यंत्रणा व सामाजिक संस्था, खासगी नेत्रपेढ्या प्रयत्न करीत आहेत. यासाठी समाजाने पुढाकार घेतला, तर नेत्रदान ही संकल्पना आणखी यशस्वी होऊ शकते.जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात २१६७ लोकांचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे. यामध्ये शासकीय रुग्णालयात मरणोत्तर नेत्रदान झालेल्यांची संख्या मोठी आहे. यातून ८६२ अंध व्यक्तींना दृष्टी मिळाली आहे. मृत व्यक्तीच्या शरीरातील डोळे हा महत्त्वाचा अवयव असतो. त्याचे दान झाले, तर दृष्टिहीनांना जगण्याचे नवे बळ मिळू शकते. जिल्ह्यातील अजूनही तीनशे दृष्टिहीन प्रतीक्षेत आहेत. शासकीय रुग्णालयात दररोज चार ते पाच जणांचा मृत्यू होतो. मृत व्यक्तीचे नेत्रदान करुन घेण्यासाठी शासनाने समुपदेशक म्हणून अविनाश शिंदे यांची नियुक्ती केली आहे. ते मृत नातेवाईकांची भेट घेऊन नेत्रदानाविषयी प्रबोधन करतात. गेल्या सहा वर्षापासून त्यांचे हे काम सुरु आहे. अनेकदा नातेवाईक तयार होत नाहीत. जे नातेवाईक होकार देतात, त्यांच्याकडून संमतीपत्र घेऊन नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली जाते.जिल्ह्यातील अनेक व्यक्ती दृष्टीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना दृष्टी मिळावी, यासाठी रुग्णालयात मरण पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांची भेट घेऊन नेत्रदानासाठी विनंती केली जाते. नेत्रदानाचे महत्त्व समजून दिले जाते. त्यामुळे रुग्णालयात मरणोत्तर नेत्रदानाचे प्रमाण वाढले आहे. भविष्यात ही संकल्पना आणखी चांगल्याप्रकारे राबविण्यासाठी प्रयत्न केले जातील. - अविनाश शिंदे, नेत्रदान समुपदेशक