शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ८६२ दृष्टिहीनांना मिळाली दृष्टी!

By admin | Updated: June 10, 2016 00:19 IST

तीनशेजण प्रतीक्षेत : दोन हजारजणांचे मरणोत्तर नेत्रदान; ‘सिव्हिल’चा पुढाकार

सचिन लाड -- सांगली --जिल्ह्यात नेत्रदानाची संकल्पना चांगल्याप्रकारे रुजत आहे. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील २१६७ जणांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. नेत्रदानाच्या या संकल्पातून ८६२ अंध व्यक्तींना दृष्टी मिळाली आहे. यासाठी सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाचे मोठे योगदान आहे. रुग्णालयाने मरणोत्तर नेत्रदानाविषयी अविनाश शिंदे यांची समुपदेशक म्हणून नियुक्ती केल्यानंतर मरणोत्तर नेत्रदानाचे प्रमाण वाढले आहे. अजूनही जिल्ह्यातील तीनशे अंध व्यक्ती दृष्टीच्या प्रतीक्षेत आहेत.मराठवाड्यातील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या काळात सोयी-सुविधा नसतानाही त्यांनी लाखो नेत्र शस्त्रक्रिया करून अनेक अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त करुन दिली. नेत्रदानाबाबत प्रबोधन केले. राज्य शासनाने डॉ. भालचंद्र यांच्या मरणोत्तर १० जून हा नेत्रदान दिन घोषित केला आहे. माणसाच्या मृत्यूनंतर काही तास त्याचे अवयव जिवंत असतात. या काळात त्यांचे दान करणे गरजेचे असते. दुर्धर व्याधींनी ग्रासलेल्या व कृत्रिमरित्या अंधत्व आलेल्या लोकांना या अवयवांचा मोठा फायदा होतो. ज्या व्यक्तींना कृत्रिमरित्या अंधत्व आलेले असते, त्यांच्यासाठी हे नेत्रपटल अत्यंत उपयुक्त ठरतात. त्यांच्यावर केलेली बुबुळरोपण शस्त्रक्रिया यशस्वी होते. यातून ६० टक्के लोकांना नवी दृष्टी प्राप्त होते. अंध व्यक्तींच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी शासकीय यंत्रणा व सामाजिक संस्था, खासगी नेत्रपेढ्या प्रयत्न करीत आहेत. यासाठी समाजाने पुढाकार घेतला, तर नेत्रदान ही संकल्पना आणखी यशस्वी होऊ शकते.जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात २१६७ लोकांचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे. यामध्ये शासकीय रुग्णालयात मरणोत्तर नेत्रदान झालेल्यांची संख्या मोठी आहे. यातून ८६२ अंध व्यक्तींना दृष्टी मिळाली आहे. मृत व्यक्तीच्या शरीरातील डोळे हा महत्त्वाचा अवयव असतो. त्याचे दान झाले, तर दृष्टिहीनांना जगण्याचे नवे बळ मिळू शकते. जिल्ह्यातील अजूनही तीनशे दृष्टिहीन प्रतीक्षेत आहेत. शासकीय रुग्णालयात दररोज चार ते पाच जणांचा मृत्यू होतो. मृत व्यक्तीचे नेत्रदान करुन घेण्यासाठी शासनाने समुपदेशक म्हणून अविनाश शिंदे यांची नियुक्ती केली आहे. ते मृत नातेवाईकांची भेट घेऊन नेत्रदानाविषयी प्रबोधन करतात. गेल्या सहा वर्षापासून त्यांचे हे काम सुरु आहे. अनेकदा नातेवाईक तयार होत नाहीत. जे नातेवाईक होकार देतात, त्यांच्याकडून संमतीपत्र घेऊन नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली जाते.जिल्ह्यातील अनेक व्यक्ती दृष्टीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना दृष्टी मिळावी, यासाठी रुग्णालयात मरण पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांची भेट घेऊन नेत्रदानासाठी विनंती केली जाते. नेत्रदानाचे महत्त्व समजून दिले जाते. त्यामुळे रुग्णालयात मरणोत्तर नेत्रदानाचे प्रमाण वाढले आहे. भविष्यात ही संकल्पना आणखी चांगल्याप्रकारे राबविण्यासाठी प्रयत्न केले जातील. - अविनाश शिंदे, नेत्रदान समुपदेशक