शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
4
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
5
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
6
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
7
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
8
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
11
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
13
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
14
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
15
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
16
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
17
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
18
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
19
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
20
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

जिल्ह्यात बरसला ४६.६ टक्के जादा पाऊस

By admin | Updated: October 2, 2016 01:02 IST

दुष्काळी भागाला दिलासा : तीन वर्षात प्रथमच निसर्गाने आणले शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन

अशोक डोंबाळे ल्ल सांगली जिल्ह्यात आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने धरणे तुडुंब भरली आहेत. मागील तीन वर्षातील पावसाची आकडेवारी पार करून जिल्ह्यात सरासरी ५९५.८ मिलिमीटर पाऊस झाला असून, हे प्रमाण ११६.७ टक्के आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ५४.६ टक्के जादा पाऊस बरसल्याचे हवामान खात्याच्या आकडेवारीवरून दिसत आहे. दुष्काळी भागातही पावसाने हजेरी लावल्यामुळे पशुधनाच्या चाऱ्याची आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली आहे. जिल्ह्यात २०१२ पासून सलग तीन वर्षे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या पदरात खरीप, रब्बी हंगामातील पिके पडली नाहीत. दुष्काळी भागातील पाझर तलावही पावसाळ्यातच कोरडे पडले होते. २०१५ वर्षात जिल्ह्यात जून ते आॅक्टोबर या कालावधित ७० टक्केच पाऊस झाला. कोयना, वारणा धरणातही पाण्याचा अत्यंत कमी साठा होता. शिराळा, वाळवा, पलूस या वारणा, कृष्णा नदीकाठच्या गावांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. काही गावांमध्ये तर टँकरही सुरू करावे लागले होते. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, मिरज पूर्व या तालुक्यात दुष्काळाचे भीषण चित्र होते. पिण्याच्या पाण्यासाठीच्या टँकरची आकडेवारी शंभरहून अधिक झाली होती. चारा छावण्या सुरू कराव्या लागल्या होत्या. यंदा मान्सूनपूर्व पाऊस फारसा बरसला नाही. मान्सूनचे केरळमध्ये वेळेत आगमन झाले. पण, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पोहोचण्यासाठी अनेक अडथळे निर्माण झाल्यामुळे १५ जूनपर्यंत मान्सून दाखल झालाच नव्हता. जुलै संपला तरीही मान्सून पावसाचा जोर नसल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र आॅगस्ट महिन्यात मान्सूनने झोडपून काढले. आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीचे चित्रच बदलले. जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारी चांदोली (वारणा) आणि कोयना धरणे शंभर टक्के भरली. जिल्ह्यातील छोटे-मोठे पाझर तलावही भरले आहेत. जून ते ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत जिल्ह्यात ११६.७ टक्के पाऊस बरसला आहे. दिवाळी गोड पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकेही चांगली असल्यामुळे शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे. पाऊस आणि पाण्याचा साठा मुबलक असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकेही शेतकऱ्यांच्या पदरात पडण्याची शक्यता आहे. पावसाची आकडेवारी चांगला पाऊस दाखवत असली तरी जत, कवठेमहांकाळ, तासगाव, आटपाडी तालुक्यातील अनेक भागात पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे तेथील शेतकरी चिंतेत आहेत. मागील चार वर्षातील उच्चांकी पाऊस सांगली जिल्ह्यात झाला आहे. उपलब्ध पाण्याचा शेतकऱ्यांनी काटकसरीने वापर केल्यास रब्बी हंगामातील पिके चांगली येणार आहेत. पुरेसा पाऊस आणि रब्बी हंगामातील पेरणीसाठीच्या पोषक वातावरणामुळे पिके चांगली येणार आहेत. या सर्व गोष्टीचा विचार करून खते, बियाणांची शासनाकडून मागणी केली आहे. जिल्ह्यात सर्वत्र रब्बी हंगामासाठी गहू, हरभरा, ज्वारीचे बियाणे उपलब्ध आहे. - आर. जे. भोसले, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली. तीन वर्षातील पावसाची टक्केवारी तालुका सरासरी २०१४ २०१५ २०१६ मिरज ४९२ १०७.६ ६३.४ १४४.२ जत ४५७.७ १०५.३ ५६.१ ८७.३ खानापूर ४९४.९ ९८.२ ६४.२ ८१.४ वाळवा ५५६.८ ९० ४०.९ १०९.३ तासगाव ४७६ ८८.२ ४५.०८ ११५.४ शिराळा ८८४.७ १२६.७ ६४.०० १५४.४ आटपाडी ३५५ १०७.५ ८३.३ १०७.२ क.महांकाळ ४५७ १००.६ ४८.६ १२२.३ पलूस ४७६ ९१.६ ५३.५ १०४.३ कडेगाव ४४७ ११९.४ ५४.२ १०६.६ सरासरी ५१०.६ १०३.५२ ५७.१ ११६.७