शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जिल्ह्यात बरसला ४६.६ टक्के जादा पाऊस

By admin | Updated: October 2, 2016 01:02 IST

दुष्काळी भागाला दिलासा : तीन वर्षात प्रथमच निसर्गाने आणले शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन

अशोक डोंबाळे ल्ल सांगली जिल्ह्यात आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने धरणे तुडुंब भरली आहेत. मागील तीन वर्षातील पावसाची आकडेवारी पार करून जिल्ह्यात सरासरी ५९५.८ मिलिमीटर पाऊस झाला असून, हे प्रमाण ११६.७ टक्के आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ५४.६ टक्के जादा पाऊस बरसल्याचे हवामान खात्याच्या आकडेवारीवरून दिसत आहे. दुष्काळी भागातही पावसाने हजेरी लावल्यामुळे पशुधनाच्या चाऱ्याची आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली आहे. जिल्ह्यात २०१२ पासून सलग तीन वर्षे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या पदरात खरीप, रब्बी हंगामातील पिके पडली नाहीत. दुष्काळी भागातील पाझर तलावही पावसाळ्यातच कोरडे पडले होते. २०१५ वर्षात जिल्ह्यात जून ते आॅक्टोबर या कालावधित ७० टक्केच पाऊस झाला. कोयना, वारणा धरणातही पाण्याचा अत्यंत कमी साठा होता. शिराळा, वाळवा, पलूस या वारणा, कृष्णा नदीकाठच्या गावांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. काही गावांमध्ये तर टँकरही सुरू करावे लागले होते. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, मिरज पूर्व या तालुक्यात दुष्काळाचे भीषण चित्र होते. पिण्याच्या पाण्यासाठीच्या टँकरची आकडेवारी शंभरहून अधिक झाली होती. चारा छावण्या सुरू कराव्या लागल्या होत्या. यंदा मान्सूनपूर्व पाऊस फारसा बरसला नाही. मान्सूनचे केरळमध्ये वेळेत आगमन झाले. पण, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पोहोचण्यासाठी अनेक अडथळे निर्माण झाल्यामुळे १५ जूनपर्यंत मान्सून दाखल झालाच नव्हता. जुलै संपला तरीही मान्सून पावसाचा जोर नसल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र आॅगस्ट महिन्यात मान्सूनने झोडपून काढले. आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीचे चित्रच बदलले. जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारी चांदोली (वारणा) आणि कोयना धरणे शंभर टक्के भरली. जिल्ह्यातील छोटे-मोठे पाझर तलावही भरले आहेत. जून ते ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत जिल्ह्यात ११६.७ टक्के पाऊस बरसला आहे. दिवाळी गोड पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकेही चांगली असल्यामुळे शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे. पाऊस आणि पाण्याचा साठा मुबलक असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकेही शेतकऱ्यांच्या पदरात पडण्याची शक्यता आहे. पावसाची आकडेवारी चांगला पाऊस दाखवत असली तरी जत, कवठेमहांकाळ, तासगाव, आटपाडी तालुक्यातील अनेक भागात पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे तेथील शेतकरी चिंतेत आहेत. मागील चार वर्षातील उच्चांकी पाऊस सांगली जिल्ह्यात झाला आहे. उपलब्ध पाण्याचा शेतकऱ्यांनी काटकसरीने वापर केल्यास रब्बी हंगामातील पिके चांगली येणार आहेत. पुरेसा पाऊस आणि रब्बी हंगामातील पेरणीसाठीच्या पोषक वातावरणामुळे पिके चांगली येणार आहेत. या सर्व गोष्टीचा विचार करून खते, बियाणांची शासनाकडून मागणी केली आहे. जिल्ह्यात सर्वत्र रब्बी हंगामासाठी गहू, हरभरा, ज्वारीचे बियाणे उपलब्ध आहे. - आर. जे. भोसले, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली. तीन वर्षातील पावसाची टक्केवारी तालुका सरासरी २०१४ २०१५ २०१६ मिरज ४९२ १०७.६ ६३.४ १४४.२ जत ४५७.७ १०५.३ ५६.१ ८७.३ खानापूर ४९४.९ ९८.२ ६४.२ ८१.४ वाळवा ५५६.८ ९० ४०.९ १०९.३ तासगाव ४७६ ८८.२ ४५.०८ ११५.४ शिराळा ८८४.७ १२६.७ ६४.०० १५४.४ आटपाडी ३५५ १०७.५ ८३.३ १०७.२ क.महांकाळ ४५७ १००.६ ४८.६ १२२.३ पलूस ४७६ ९१.६ ५३.५ १०४.३ कडेगाव ४४७ ११९.४ ५४.२ १०६.६ सरासरी ५१०.६ १०३.५२ ५७.१ ११६.७