शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
5
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
6
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
7
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
8
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
9
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
10
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
11
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
12
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
13
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
14
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
15
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
16
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
17
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
18
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
19
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
20
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा

जिल्ह्यात बरसला ४६.६ टक्के जादा पाऊस

By admin | Updated: October 2, 2016 01:02 IST

दुष्काळी भागाला दिलासा : तीन वर्षात प्रथमच निसर्गाने आणले शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन

अशोक डोंबाळे ल्ल सांगली जिल्ह्यात आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने धरणे तुडुंब भरली आहेत. मागील तीन वर्षातील पावसाची आकडेवारी पार करून जिल्ह्यात सरासरी ५९५.८ मिलिमीटर पाऊस झाला असून, हे प्रमाण ११६.७ टक्के आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ५४.६ टक्के जादा पाऊस बरसल्याचे हवामान खात्याच्या आकडेवारीवरून दिसत आहे. दुष्काळी भागातही पावसाने हजेरी लावल्यामुळे पशुधनाच्या चाऱ्याची आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली आहे. जिल्ह्यात २०१२ पासून सलग तीन वर्षे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या पदरात खरीप, रब्बी हंगामातील पिके पडली नाहीत. दुष्काळी भागातील पाझर तलावही पावसाळ्यातच कोरडे पडले होते. २०१५ वर्षात जिल्ह्यात जून ते आॅक्टोबर या कालावधित ७० टक्केच पाऊस झाला. कोयना, वारणा धरणातही पाण्याचा अत्यंत कमी साठा होता. शिराळा, वाळवा, पलूस या वारणा, कृष्णा नदीकाठच्या गावांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. काही गावांमध्ये तर टँकरही सुरू करावे लागले होते. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, मिरज पूर्व या तालुक्यात दुष्काळाचे भीषण चित्र होते. पिण्याच्या पाण्यासाठीच्या टँकरची आकडेवारी शंभरहून अधिक झाली होती. चारा छावण्या सुरू कराव्या लागल्या होत्या. यंदा मान्सूनपूर्व पाऊस फारसा बरसला नाही. मान्सूनचे केरळमध्ये वेळेत आगमन झाले. पण, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पोहोचण्यासाठी अनेक अडथळे निर्माण झाल्यामुळे १५ जूनपर्यंत मान्सून दाखल झालाच नव्हता. जुलै संपला तरीही मान्सून पावसाचा जोर नसल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र आॅगस्ट महिन्यात मान्सूनने झोडपून काढले. आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीचे चित्रच बदलले. जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारी चांदोली (वारणा) आणि कोयना धरणे शंभर टक्के भरली. जिल्ह्यातील छोटे-मोठे पाझर तलावही भरले आहेत. जून ते ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत जिल्ह्यात ११६.७ टक्के पाऊस बरसला आहे. दिवाळी गोड पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकेही चांगली असल्यामुळे शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे. पाऊस आणि पाण्याचा साठा मुबलक असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकेही शेतकऱ्यांच्या पदरात पडण्याची शक्यता आहे. पावसाची आकडेवारी चांगला पाऊस दाखवत असली तरी जत, कवठेमहांकाळ, तासगाव, आटपाडी तालुक्यातील अनेक भागात पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे तेथील शेतकरी चिंतेत आहेत. मागील चार वर्षातील उच्चांकी पाऊस सांगली जिल्ह्यात झाला आहे. उपलब्ध पाण्याचा शेतकऱ्यांनी काटकसरीने वापर केल्यास रब्बी हंगामातील पिके चांगली येणार आहेत. पुरेसा पाऊस आणि रब्बी हंगामातील पेरणीसाठीच्या पोषक वातावरणामुळे पिके चांगली येणार आहेत. या सर्व गोष्टीचा विचार करून खते, बियाणांची शासनाकडून मागणी केली आहे. जिल्ह्यात सर्वत्र रब्बी हंगामासाठी गहू, हरभरा, ज्वारीचे बियाणे उपलब्ध आहे. - आर. जे. भोसले, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली. तीन वर्षातील पावसाची टक्केवारी तालुका सरासरी २०१४ २०१५ २०१६ मिरज ४९२ १०७.६ ६३.४ १४४.२ जत ४५७.७ १०५.३ ५६.१ ८७.३ खानापूर ४९४.९ ९८.२ ६४.२ ८१.४ वाळवा ५५६.८ ९० ४०.९ १०९.३ तासगाव ४७६ ८८.२ ४५.०८ ११५.४ शिराळा ८८४.७ १२६.७ ६४.०० १५४.४ आटपाडी ३५५ १०७.५ ८३.३ १०७.२ क.महांकाळ ४५७ १००.६ ४८.६ १२२.३ पलूस ४७६ ९१.६ ५३.५ १०४.३ कडेगाव ४४७ ११९.४ ५४.२ १०६.६ सरासरी ५१०.६ १०३.५२ ५७.१ ११६.७