शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

जिल्ह्यात बरसला ४६.६ टक्के जादा पाऊस

By admin | Updated: October 2, 2016 01:02 IST

दुष्काळी भागाला दिलासा : तीन वर्षात प्रथमच निसर्गाने आणले शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन

अशोक डोंबाळे ल्ल सांगली जिल्ह्यात आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने धरणे तुडुंब भरली आहेत. मागील तीन वर्षातील पावसाची आकडेवारी पार करून जिल्ह्यात सरासरी ५९५.८ मिलिमीटर पाऊस झाला असून, हे प्रमाण ११६.७ टक्के आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ५४.६ टक्के जादा पाऊस बरसल्याचे हवामान खात्याच्या आकडेवारीवरून दिसत आहे. दुष्काळी भागातही पावसाने हजेरी लावल्यामुळे पशुधनाच्या चाऱ्याची आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली आहे. जिल्ह्यात २०१२ पासून सलग तीन वर्षे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या पदरात खरीप, रब्बी हंगामातील पिके पडली नाहीत. दुष्काळी भागातील पाझर तलावही पावसाळ्यातच कोरडे पडले होते. २०१५ वर्षात जिल्ह्यात जून ते आॅक्टोबर या कालावधित ७० टक्केच पाऊस झाला. कोयना, वारणा धरणातही पाण्याचा अत्यंत कमी साठा होता. शिराळा, वाळवा, पलूस या वारणा, कृष्णा नदीकाठच्या गावांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. काही गावांमध्ये तर टँकरही सुरू करावे लागले होते. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, मिरज पूर्व या तालुक्यात दुष्काळाचे भीषण चित्र होते. पिण्याच्या पाण्यासाठीच्या टँकरची आकडेवारी शंभरहून अधिक झाली होती. चारा छावण्या सुरू कराव्या लागल्या होत्या. यंदा मान्सूनपूर्व पाऊस फारसा बरसला नाही. मान्सूनचे केरळमध्ये वेळेत आगमन झाले. पण, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पोहोचण्यासाठी अनेक अडथळे निर्माण झाल्यामुळे १५ जूनपर्यंत मान्सून दाखल झालाच नव्हता. जुलै संपला तरीही मान्सून पावसाचा जोर नसल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र आॅगस्ट महिन्यात मान्सूनने झोडपून काढले. आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीचे चित्रच बदलले. जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारी चांदोली (वारणा) आणि कोयना धरणे शंभर टक्के भरली. जिल्ह्यातील छोटे-मोठे पाझर तलावही भरले आहेत. जून ते ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत जिल्ह्यात ११६.७ टक्के पाऊस बरसला आहे. दिवाळी गोड पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकेही चांगली असल्यामुळे शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे. पाऊस आणि पाण्याचा साठा मुबलक असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकेही शेतकऱ्यांच्या पदरात पडण्याची शक्यता आहे. पावसाची आकडेवारी चांगला पाऊस दाखवत असली तरी जत, कवठेमहांकाळ, तासगाव, आटपाडी तालुक्यातील अनेक भागात पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे तेथील शेतकरी चिंतेत आहेत. मागील चार वर्षातील उच्चांकी पाऊस सांगली जिल्ह्यात झाला आहे. उपलब्ध पाण्याचा शेतकऱ्यांनी काटकसरीने वापर केल्यास रब्बी हंगामातील पिके चांगली येणार आहेत. पुरेसा पाऊस आणि रब्बी हंगामातील पेरणीसाठीच्या पोषक वातावरणामुळे पिके चांगली येणार आहेत. या सर्व गोष्टीचा विचार करून खते, बियाणांची शासनाकडून मागणी केली आहे. जिल्ह्यात सर्वत्र रब्बी हंगामासाठी गहू, हरभरा, ज्वारीचे बियाणे उपलब्ध आहे. - आर. जे. भोसले, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली. तीन वर्षातील पावसाची टक्केवारी तालुका सरासरी २०१४ २०१५ २०१६ मिरज ४९२ १०७.६ ६३.४ १४४.२ जत ४५७.७ १०५.३ ५६.१ ८७.३ खानापूर ४९४.९ ९८.२ ६४.२ ८१.४ वाळवा ५५६.८ ९० ४०.९ १०९.३ तासगाव ४७६ ८८.२ ४५.०८ ११५.४ शिराळा ८८४.७ १२६.७ ६४.०० १५४.४ आटपाडी ३५५ १०७.५ ८३.३ १०७.२ क.महांकाळ ४५७ १००.६ ४८.६ १२२.३ पलूस ४७६ ९१.६ ५३.५ १०४.३ कडेगाव ४४७ ११९.४ ५४.२ १०६.६ सरासरी ५१०.६ १०३.५२ ५७.१ ११६.७