शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

मोदी लाटेचा प्रभाव तारणार की संपणार?

By admin | Updated: September 18, 2014 23:22 IST

उदय सामंत - बाळ माने तिसऱ्यांदा आमने - सामने येणार?

प्रकाश वराडकर - रत्नागिरी -गेल्या दोन टर्ममध्ये राष्ट्रवादीला साथ देणाऱ्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात तीन महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीने राजकीय धुरिणांची गणिते सपशेल चुकविली आहेत. मोदी लाटेने महायुतीच्या पारड्यात पडलेले अधिक मतांचे वजन या विधानसभेतही तसेच राहणार की, त्यात बदल होणार, याबाबत जशी राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता आहे, तशीच ती महायुतीच्या गोटातही आहे. त्यामुळेच या मतदारसंघात मोदी लाट थोपवत राष्ट्रवादी हॅट्ट्रिक साधणार की, मोदी लाटेने भाजपाला सुगीचे दिवस येणार? माने पराभवाची हॅट्ट्रिक तोडणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. येथील रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात २००९ मधील विधानसभा निवडणुकांचा असलेला ट्रेंड पूर्णत: बदलला आहे. लोकसभा निवडणुकीत त्याची झलक तीन महिन्यांपूर्वीच पाहायला मिळाली. तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व होते. त्यात आता आणखी वाढ झाली आहे. मतदारसंघातील ९४ ग्रामपंचायतींपैकी ६८ ग्रामपंचायती सेनेच्या ताब्यात आहेत. कुवारबावसारखी महत्त्वाची ग्रामपंचायतही राष्ट्रवादीकडून हिसकावण्यात सेनेने यश मिळविले आहे. रत्नागिरी तालुक्यातील आठ व संगमेश्वर तालुक्यातील १ असे ९ जिल्हा परिषद गट रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात येतात, तर पंचायत समितीचे १७ गण मतदारसंघात आहेत. गेल्या दशकापासून रत्नागिरी पंचायत समितीवरही युतीचा झेंडा आहे. जिल्हा परिषदही युतीच्याच ताब्यात आहे. असे असताना रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात मात्र गेल्या दोन टर्मपासून राष्ट्रवादीचा आमदार आहे. दुसऱ्या टर्ममध्ये राष्ट्रवादीच्या येथील आमदाराला राज्यमंत्रिपद मिळाले. या मतदारसंघाला हे मंत्रिपद तब्बल ५३ वर्षांनंतर मिळाले. मतदारसंघात सेना - भाजपचे प्राबल्य असतानाही आमदार विरोधी पक्षाचा असे चित्र कसे काय, याचाही अभ्यास केल्यानंतर पक्षसंघटनेतील काही प्रवाह विरोधकांना मदत करतात, असे सेना नेत्यांना आढळले. त्यातूनच झाडाझडती घेतल्यानंतर शिस्तीचे इंजेक्शन लोकसभा निवडणुकीत टोचण्यात आले, अन त्याचा जबरदस्त परिणाम दिसून आला. सन २००९मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपाचे बाळ माने हे ८ हजार मतांनी पराभूत झाले होते. तीन महिन्यांपूर्वीचे जिल्हा परिषद गटनिहाय झालेले मतदान चक्रावून टाकणारे आहे. प्रत्येक गटात युतीला मोठे मताधिक्य आहे. नऊ गटातील मताधिक्य मिळून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात महायुतीला ३२ हजारांचे मताधिक्य मिळाले. रत्नागिरी शहरातही मताधिक्य मिळाले. त्यामुळे हेच मताधिक्य विधानसभेतही मिळेल, या शक्यतेमुळे भाजपाचे बाळ माने हे सहज निवडूून येतील, असा महायुतीच्या नेत्यांचा अंदाज आहे. माने तयारी करीत असलेल्या मतदारसंघात त्यांना पक्षातच बाबा परुळेकर व दीपक पटवर्धन हे प्रतिस्पर्धी म्हणून समोर आले आहेत, तर या मतदारसंघात दोनदा पराभव झाल्याने भाजपाने हा मतदारसंघ शिवसेनेला द्यावा, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. मात्र भाजपाचे बाळ माने यांना गेल्या निवडणूकीत तब्बल ६५ हजारांवर मते मिळाली होती हे विसरून चालणार नाही. तसेच यावेळी लोकसभेला असलेली मोदी लाट काही अंशी ओसरल्याचे बोलले जात असले तरी त्या लाटेचा लाभ होईल, असे भाजपला वाटते आहे. ...तर बंड्या साळवी रत्नागिरीतील उमेदवार!राज्यात भाजप व सेनेत जागावाटपाचा तिढा कायम असताना रत्नागिरीतही सेनेच्या उमेदवाराबाबत चाचपणी घेण्यात आली आहे. सेनेचे रत्नागिरी तालुकाप्रमुुख प्रदीप तथा बंड्या साळवी यांचे नाव उमेदवारीसाठी सर्वप्रथम आहे. खासदार विनायक राऊत यांनी गेल्या दोन दिवसात त्यांच्याशी चारवेळा याबाबत संपर्क साधला आहे. तयारीत राहा, काहीही घडू शकते, उमेदवारी मिळू शकते, असे त्यांना सांगण्यात आले आहे. तसेच साळवी हेसुध्दा उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. रत्नागिरी मतदारसंघ सेनेला द्यावा, असा आग्रहही सेनेकडून सुरू आहे.