शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

पाणी कुठं मुरतंय, कोण सांगणार - फेरफटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:29 IST

पाणीटंचाई ही दरवर्षी भेडसावते. मात्र त्याची तीव्रता कमी होत असली तरी, त्यावर खर्च मात्र कोट्यवधी रुपयांच्या घरात जातो. इतका ...

पाणीटंचाई ही दरवर्षी भेडसावते. मात्र त्याची तीव्रता कमी होत असली तरी, त्यावर खर्च मात्र कोट्यवधी रुपयांच्या घरात जातो. इतका खर्च करण्यात येत असला तरी, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना अजूनही झालेली नाही, की होणार नाही, हा मोठा प्रश्न आहे. तो न पचनी पडणारा आहे, असेच म्हणावे लागेल. मात्र, हे पाणी कुठं मुरतंय हे कोणालाही सांगता आलेलं नाही आणि येणारही नाही.

मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही पाणी साठवता येत नसल्याने पाणी झिरपून समुद्राला जाऊन मिळते. जिल्ह्यात जमीन जांभ्या दगडापासून तयार झालेली आहे. त्यामुळे जमिनीवाटे पाणी वाहून जाते. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता नसल्याने येथील विहिरी, नाले, तलाव आदी उन्हाळ्यामध्ये तळ गाठतात. त्यामुळे जिल्ह्यात दरवर्षी भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यात पाणीटंचाई सुरू आहे. टंचाईग्रस्तांना पाणी पुरवठा करताना प्रशासनाला धावपळ करावी लागते.

जिल्ह्यात गेल्या १५ ते २० वर्षांत अनेक नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या. या योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये वाड्या-वस्त्यांमध्ये पाण्याच्या पाईप नेण्यात आल्या. त्यासाठी कोट्यवधी रुपये दरवर्षी खर्च करण्यात आले. तरीही उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई सुरूच आहे. विहिरींची खुदाई, विंधन विहिरींची खुदाई, तळी बांधणे आदींची कामे करण्यात आली. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक वस्त्या, वाड्यांना पाणीटंचाई भेडसावणार नाही, असा समज होता. मात्र, तो फोल ठरला आहे.

डोंगर-दऱ्यात वसलेल्या धनगरवाड्यांतील लोकांना दरवर्षीप्रमाणे यंदाही भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. कारण या वाड्या-वस्त्या डोंगर-दऱ्यामध्ये असल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे येथील विहिरी, विंधन विहिरी, ओढे, झरे आटल्याने रहिवाशांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे़. टंचाईग्रस्तांमधील अनेक वाड्यांमध्ये पाण्याचा टँकर नेताना चालकाला मोठी कसरत करावी लागते.

कोट्यवधी रुपये खर्च करूनही जिल्ह्यात उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीटंचाई उद्भवते. तसेच या योजनांच्या दुरुस्तीवर खर्चही मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. एवढा मोठा खर्च करूनही दरवर्षी पाणीटंचाई भेडसावते. एखादे काम हाती घेताना त्यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक असते. मात्र, जिल्ह्यात नळपाणी पुरवठा योजनांवर वारेमाप खर्च करण्यात आला. पाणीटंचाई दूर करण्यासाठी राबविण्यात आलेल्या योजना फोल ठरणे म्हणजे प्रशासनाची नामुष्की आहे. हा खर्च करण्यापूर्वी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र, योजनांमध्ये पाणी मुरत असल्याने ठोस उपाययोजना कशी करणार, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे कितीही खर्च केला तरी तो पाण्यातच जाणार आहे. कारण ठोसपणे उपाययोजना करण्यात आलेली नसल्यानेच आज जिल्ह्याला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

यंदाही पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सुमारे १६ कोटी रुपयांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला होता. त्याला शासनाकडून मंजुरीही देण्यात आलेली आहे. या टंचाई आराखड्यामध्ये दरवर्षीप्रमाणे पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. गतवर्षीही पाणी योजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. तरीही यंदा नादुरुस्त योजना दुरुस्त करण्यात येणार आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करूनही पाणी पुरवठ्याच्या योजना नादुरुस्तच आहेत. त्यामुळे दरवर्षी टंचाईच्या कालावधित करण्यात येणारा खर्च कुठे जातो, हा प्रश्न दरवर्षीप्रमाणे यंदाही अनुत्तरीतच राहणार, हे निश्चित आहे.