शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?
3
अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...
4
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
5
"एकनाथ शिंदे पण त्यातलेच!" संजय गायकवाड आणि संजय शिरसाठ यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले!
6
शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?
7
SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?
8
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
9
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
10
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
11
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
12
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
13
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
14
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
15
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
16
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
17
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
18
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
19
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
20
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेश; पाकिस्तानला लागणार मिरची..!

रत्नागिरीकरांना मिळणार पाणीसुख!

By admin | Updated: February 18, 2015 00:56 IST

नगर परिषदेचे पाऊल पडते पुढे : पाईपलाईन बदलणार, अंदाजे ५७ कोटी रूपये खर्च

प्रकाश वराडकर,रत्नागिरी :गेल्या सहा वर्षांपासून रत्नागिरीकरांना पाणी पुरवठा योजनेच्या वितरण व्यवस्थेतील महादोषांमुळे जो त्रास सहन करावा लागत आहे तो लवकरच दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र सुजल-निर्मल अभियानअंतर्गत या कामांना निधी मिळणार असून, पाणी वितरण व्यवस्थेशी संबंधित सर्व कामांची अंदाजपत्रके नगरपरिषद या महिन्यात शासनाकडे पाठविणार आहे. या सर्व कामांसाठी ५७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. वर्षभरात ही कामे पूर्ण होणार असल्याने पाण्याचे सुख मिळण्याबाबत रत्नागिरीकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. रत्नागिरी शहराला शीळ, पानवल धरण, नाचणे तलाव तसेच एमआयडीसीकडूनही पाणीपुरवठा केला जातो. यातील सर्वाधिक पाणीपुरवठा हा शीळ धरणातून होतो. गेल्या काही वर्षांपासून शीळ धरणातील ५० टक्के पाणी शहरासाठी वापरले जात होते. मात्र, अलिकडेच या धरणाचे १०० टक्के पाणी वापरण्याबाबत पालिकेने करार केला आहे. शीळ धरणात पाण्याचा मुबलक साठा असूनही गंजलेली जलवाहिनी वारंवार फुटण्याच्या समस्येमुळे पाणी असून, तहानलेले राहण्याची वेळ अनेकदा रत्नागिरीकरांवर येते. त्यामुळेच शीळ धरणाच्या जॅकवेलपासून ते पुढे २ किलोमीटर्सपर्यंत गंजलेली जलवाहिनी संपूर्णत: बदलली जाणार आहे. त्यासाठी सव्वादोन कोटींचा खर्च अपेक्षित आहे. रत्नागिरी शहराला दररोज पानवल धरणातून दीड ते दोन दललक्ष लिटर्स, शीळ धरणातून १२ दशलक्ष लिटर्स तर एमआयडिसीकडून दीड दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होतो. नाचणे तलावातूनही काही प्रमाणात शहराला पाणी पुरवले जाते. पायाशी खचलेल्या पानवल धरणाच्या दुरुस्तीचे काम पाटबंधारे विभागामार्फत केले जाणार आहे. शीळ धरणातून पाणी उपसा करण्यासाठी याआधीचे ३०० अश्वशक्तीचे तीन पंप बदलून २५० अश्वशक्तीचे तीन नवीन पंप बसविण्यात आले आहेत. आधीच्या पंपांची शक्ती अधिक असल्याने त्यांची आवश्यकता नसल्याचे तसेच वीजबीलही अधिक येत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हा बदल करण्यात आला. परिणामी पालिकेच्या वीज बिलातही घट झाल्याचे पालिकेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.