शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
3
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
4
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
5
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
6
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
7
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
9
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
10
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
11
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
12
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
13
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा
14
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
15
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
16
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
17
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
18
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
19
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
20
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय

रत्नागिरीकरांना मिळणार पाणीसुख!

By admin | Updated: February 18, 2015 00:56 IST

नगर परिषदेचे पाऊल पडते पुढे : पाईपलाईन बदलणार, अंदाजे ५७ कोटी रूपये खर्च

प्रकाश वराडकर,रत्नागिरी :गेल्या सहा वर्षांपासून रत्नागिरीकरांना पाणी पुरवठा योजनेच्या वितरण व्यवस्थेतील महादोषांमुळे जो त्रास सहन करावा लागत आहे तो लवकरच दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र सुजल-निर्मल अभियानअंतर्गत या कामांना निधी मिळणार असून, पाणी वितरण व्यवस्थेशी संबंधित सर्व कामांची अंदाजपत्रके नगरपरिषद या महिन्यात शासनाकडे पाठविणार आहे. या सर्व कामांसाठी ५७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. वर्षभरात ही कामे पूर्ण होणार असल्याने पाण्याचे सुख मिळण्याबाबत रत्नागिरीकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. रत्नागिरी शहराला शीळ, पानवल धरण, नाचणे तलाव तसेच एमआयडीसीकडूनही पाणीपुरवठा केला जातो. यातील सर्वाधिक पाणीपुरवठा हा शीळ धरणातून होतो. गेल्या काही वर्षांपासून शीळ धरणातील ५० टक्के पाणी शहरासाठी वापरले जात होते. मात्र, अलिकडेच या धरणाचे १०० टक्के पाणी वापरण्याबाबत पालिकेने करार केला आहे. शीळ धरणात पाण्याचा मुबलक साठा असूनही गंजलेली जलवाहिनी वारंवार फुटण्याच्या समस्येमुळे पाणी असून, तहानलेले राहण्याची वेळ अनेकदा रत्नागिरीकरांवर येते. त्यामुळेच शीळ धरणाच्या जॅकवेलपासून ते पुढे २ किलोमीटर्सपर्यंत गंजलेली जलवाहिनी संपूर्णत: बदलली जाणार आहे. त्यासाठी सव्वादोन कोटींचा खर्च अपेक्षित आहे. रत्नागिरी शहराला दररोज पानवल धरणातून दीड ते दोन दललक्ष लिटर्स, शीळ धरणातून १२ दशलक्ष लिटर्स तर एमआयडिसीकडून दीड दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होतो. नाचणे तलावातूनही काही प्रमाणात शहराला पाणी पुरवले जाते. पायाशी खचलेल्या पानवल धरणाच्या दुरुस्तीचे काम पाटबंधारे विभागामार्फत केले जाणार आहे. शीळ धरणातून पाणी उपसा करण्यासाठी याआधीचे ३०० अश्वशक्तीचे तीन पंप बदलून २५० अश्वशक्तीचे तीन नवीन पंप बसविण्यात आले आहेत. आधीच्या पंपांची शक्ती अधिक असल्याने त्यांची आवश्यकता नसल्याचे तसेच वीजबीलही अधिक येत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हा बदल करण्यात आला. परिणामी पालिकेच्या वीज बिलातही घट झाल्याचे पालिकेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.