शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याची गोष्ट (लाेकमंच)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:27 IST

नदीलगतच्या गावाशीही नदीचे जुने नातेसंबंध होते. नदीत जीव द्यायला आलेल्या पक्याला एकदा नदीनेच तळहातावर झेलत आल्या पावली परत पाठवले ...

नदीलगतच्या गावाशीही नदीचे जुने नातेसंबंध होते. नदीत जीव द्यायला आलेल्या पक्याला एकदा नदीनेच तळहातावर झेलत आल्या पावली परत पाठवले होते. पुढे त्याच पक्याने नदी शेजारी नारळाची बाग फुलवली तेव्हा नदीला अगदी कृतार्थ झाल्यासारखे वाटले होते. सासुरवास भोगणाऱ्या अनेक सासुरवाशिणींची भळभळती दुःखे याच नदीने अनेकवेळा घटाघटा गिळली होती. नदीवर कपडे धुण्यासाठी येणाऱ्या बायांच्या गजाली ऐकता ऐकता कधी कधी नदीला हसूही आवरत नसे. नदीमुळे काठावरची गावे आणि गावांमुळे नदी अगदी सुजलाम सुफलाम होती. गावात राहून कष्टणाऱ्या प्रत्येकाला ती मदतीचा हात देत होती. गावात साजऱ्या होणाऱ्या सर्वच सण समारंभांची नदी साक्षीदार होती. काठावरच्या गावांना नदीचा नि नदीला या गावांचा खूप अभिमान व आपुलकी होती. याच नदीच्या पाण्यावर फुललेले मळे बघून नदी मनातल्या मनात सुखावून जात होती.

काही वर्षांपूर्वी या सुंदर नदीला कोणाची तरी नजर लागली. विकासाच्या नावाखाली माणसाने नदीवर ठिकठिकाणी पूल बांधले. खूप ठिकाणी खळखळत्या नदीचा प्रवाह अडवला गेला. नदीचे चालणे फिरणेच जणू बंद झाले. काठावरच्या गावांत दोन मोठे रासायनिक कारखाने आले. कारखान्यासाठी लागणारे पाणी नदीचे काळीज पिळवटीत जाडजूड नलिकांमधून कारखान्यांत जाऊ लागले. नदीच्या पात्रात ठिकठिकाणी मोठ्या विहिरी खोदून माणसाने नदीच्या हृदयावर घाला घातला. नदीच्या अगदी मनाविरुद्ध नदीचा जीवनरस काठावरच्या घराघरांत पोचला. नदीवर कपडे धुण्यासाठी येणाऱ्या बाया आता नदीकडे फिरकेनाशा झाल्या. गायी गुरांनाही आता गोठ्यातल्या हौदातच पाणी मिळू लागले. काठावरच्या अनेक जमिनी माणसाने विकून टाकल्या. गायी गुरांसाठीची कुरणे तारांच्या वेढ्यांत बंदिस्त झाली. नदीची पोरांशी, गायी गुरांशी, बायांशी ताटातूट झाली. नदी एकटी, एकाकी पडली. नदी आतल्या आत आसवे ढाळीत राहिली. कारखान्यातील विषारी सांडपाणी माणसाने परत नदीत सोडले. काठावरची वस्तीही वाढली.

घराघरातले सांडपाणीही आता परत फिरून नदीपात्रात मिसळू लागले. नदीचे अगदी रंगरुप बदलून गेले. विषारी पाणी सहन न झाल्याने नदीच्या पाण्यात बागडणारी, पोहणारी लेकरे फटाफटा मरून पडली. आपल्याच लेकरांच्या कलेवरांचा खच पाहून नदीला हुंदके आवरणे कठीण झाले. आतापर्यंत खळाळत व बागडत येणारे झरे पुढे पुढे अर्ध्या वाटेतच धारातिर्थी पडले. जिथून झरे यायचे त्या डोंगरांत मोठ्या

प्रमाणात उत्खनन झाले, तिथेही मोठमोठी बांधकामे उभी राहिली, कसले कसले मोठ्ठाले ‘प्रकल्प’ आले. नदीचा जणू उगमच थांबला. नदीचा खळाळत वाहणारा प्रवाह आता मृतवत झाला. नदीचे निर्मळ पाणी दूषित झाले.

नदी आता मनसोक्त वाहत नाही. नदीपात्रात आता पाण्याचा खळखळाट नाही की, माशांचा सुळसुळाट नाही. नदी आता पूर्वीसारखी हसत नाही. नदीकडे आता कोणी पोरे फिरकत नाहीत. कधी एखाद्या वर्षीच्या पावसाळ्यात नदी सगळी बंधने झुगारून सगळ्या बेड्याही तोडण्याचा प्रयत्न करते. पण माणसाने बांधलेल्या शृंखलेपुढे नदीचे काही चालत नाही. बारमाही सूर मारत वाहणाऱ्या नदीचे सध्याचे रूपडे तिला स्वतःलाही बघवत नाही. कधीतरी नदीच्या पाण्याला त्याच्या भावना अनावर होतात. भूतकाळातले सारे वैभव डोळ्यांसमोर येते आणि मग पाणी हरवून जाते.... झिरपून जाते... आठवणींत!

- बाबू घाडीगांवकर, जालगांव, दापोली.