शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

बंधाऱ्यांच्या पाण्यावर पिकविला भाजीपाला

By admin | Updated: December 28, 2015 00:56 IST

पाणीटंचाईची झळ : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सहकार्य; आतापर्यंत ४५०० बंधारे

रत्नागिरी : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सध्या सर्वत्र वनराई बंधारे उभारण्यात आले. या बंधाऱ्यांचे आता चांगले परिणाम दिसून येत आहेत. मात्र, या बंधाऱ्याच्या पाण्यावर भाजीपाला पिकवण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सहकार्य करण्यात आले.यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये उन्हाळ्यामध्ये लवकरच पाणीटंचाई सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला मोठ्या प्रमाणात पाण्याचे टँकर पुरवावे लागणार होते. मात्र, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी उन्हाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या स्थितीचा विचार करुन वनराई बंधारे, कच्चे बंधारे उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार संपूर्ण जिल्हाभरात लोकसहभागातून आतापर्यंत सुमारे ४,५०० बंधारे उभारण्यात आले आहेत. शासनाची दमडीही खर्च न करता श्रमदानातून उभारण्यात आलेल्या या बंधाऱ्यांमुळे वाहून जाणारे लाखो लीटर्स पाणी अडविण्यात यश आले आहे. गावोगावी या पाण्यावर हिवाळ्यामध्ये भाजीपाला पिकवण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा कृषी विकास अधिकारी पी. एन. देशमुख यांनी सांगितले की, बंधाऱ्यांच्या पाण्यावर भाजीपाला पिकवल्याने शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळत आहे. त्यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)