शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
"अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

बंधाऱ्यांच्या पाण्यावर पिकविला भाजीपाला

By admin | Updated: December 28, 2015 00:56 IST

पाणीटंचाईची झळ : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सहकार्य; आतापर्यंत ४५०० बंधारे

रत्नागिरी : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सध्या सर्वत्र वनराई बंधारे उभारण्यात आले. या बंधाऱ्यांचे आता चांगले परिणाम दिसून येत आहेत. मात्र, या बंधाऱ्याच्या पाण्यावर भाजीपाला पिकवण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सहकार्य करण्यात आले.यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये उन्हाळ्यामध्ये लवकरच पाणीटंचाई सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला मोठ्या प्रमाणात पाण्याचे टँकर पुरवावे लागणार होते. मात्र, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी उन्हाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या स्थितीचा विचार करुन वनराई बंधारे, कच्चे बंधारे उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार संपूर्ण जिल्हाभरात लोकसहभागातून आतापर्यंत सुमारे ४,५०० बंधारे उभारण्यात आले आहेत. शासनाची दमडीही खर्च न करता श्रमदानातून उभारण्यात आलेल्या या बंधाऱ्यांमुळे वाहून जाणारे लाखो लीटर्स पाणी अडविण्यात यश आले आहे. गावोगावी या पाण्यावर हिवाळ्यामध्ये भाजीपाला पिकवण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा कृषी विकास अधिकारी पी. एन. देशमुख यांनी सांगितले की, बंधाऱ्यांच्या पाण्यावर भाजीपाला पिकवल्याने शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळत आहे. त्यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)