शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
3
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
4
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
5
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
6
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
7
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
8
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
9
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
10
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
11
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
12
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
13
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
14
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

रिळ येथील मिलिंद वैद्य यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:28 IST

२ एप्रिल फोल्डरला मिलिंद वैद्य नावे सेव्ह आहे मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शेतीमध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग ...

२ एप्रिल फोल्डरला मिलिंद वैद्य नावे सेव्ह आहे

मेहरून नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : शेतीमध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग करून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या तालुक्यातील रिळ गावातील मिलिंद दिनकर वैद्य यांना महाराष्ट्र शासनाचा २०१८ सालचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झाला आहे. रासायनिक खतांचा मर्यादित वापर करतानाच सेंद्रिय पध्दतीने भातासह, भाजीपाला उत्पादन घेण्याकडे त्यांचा विशेष कल आहे. याशिवाय भरघोस उत्पन्नासह दर्जा राखण्यातही ते यशस्वी ठरले आहेत.

ते १९९० पासून शेतीच्या कामात व्यस्त आहेत. सुवर्णा वाण लावून भरघोस उत्पादन मिळविण्यात यशस्वी ठरले आहेत. प्रतिहेक्टर १९२ क्विंटल भात उत्पादन घेण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. याची शासकीयस्तरावर नोंद घेण्यात आली आहे. कठोर परिश्रम व संशोधन वृत्तीमुळेच ते नवनवीन प्रयोग करीत आहेत. कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन घेत असल्यामुळेच त्यांना रत्नागिरी तालुका तसेच जिल्हास्तरावर आदर्श पुरस्कार यापूर्वी प्राप्त झाला आहे.

पडिक क्षेत्र लागवडीखाली आणण्याचा त्यांचा प्रयत्न असून, बारमाही शेती ते करीत आहेत. आंबा, काजू, जाम, चिकू, नारळ, सुपारी लागवड करून बागायती फुलविली असून, अधिकाधिक उत्पादन मिळवित आहेत. याशिवाय कोथिंबीर, पालेभाज्या, भुईमूग, चवळी, कुळीथ, वाल, सूर्यफुलाची लागवड करीत आहेत. शेणखत, गांडूळखताचा वापर प्राधान्याने करीत असल्याने उत्पादन व दर्जा राखण्यात यशस्वी ठरले आहेत. गावठी भरघोस उत्पन्न देणाऱ्या पारंपरिक उत्पादनावर संशोधन करून नवीन वाण निर्मितीसाठी प्रयत्नशील आहेत.

बियाणे निर्मिती

कृषी संशोधन केंद्र, शिरगांव येथे भाताच्या वाणावर सातत्याने संशोधन सुरू असते. शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी काही शेतकऱ्यांच्या शेतावर लागवड केली जाते. संशोधन केंद्रामार्फत त्यावर देखरेख ठेवली जाते. या प्रयोगामुळे उत्पादित भात संशोधन केंद्र चांगला दर देऊन विकत घेत असल्यामुळे चांगले पैसे मिळतात. वैद्य यांच्या शेतावर नवीन वाणाचे प्रयोग संशोधन केंद्रामार्फत घेण्यात येत आहेत.

‘अमृत पायरी’वर संशोधन

बदलत्या हवामानाचा आंबा पिकावर परिणाम होत आहे. वास्तविक आपल्याकडील आंबा १९ व्या शतकातील असून, पूर्वजांनी लावलेला आहे. त्यामुळे लवकर उत्पादन देणारे, मोठ्या आकाराचे, चांगल्या दर्जाचे फळ देणाऱ्या रायवळच्या झाडावर कलमे बांधण्याचा प्रयोग सुरू आहे. याच पध्दतीने ‘अमृत पायरी’ या जम्बो पायरी नवीन जात विकसित करत असून, त्यांचा प्रयोग पूर्णत्त्वाच्या मार्गावर आहे.

जनावरांची पैदास

शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध उत्पादन देणाऱ्या जनावरांचा सांभाळ केला आहे. शेण व गोमुत्रापासून खत व जीवामृत निर्मिती ते करीत आहेत. मुरा व सहवाल जातीच्या गायींमार्फत कोकणातील वातावरणात नवीन पैदास करीत आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. कानसे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. नवीन पैदासीमुळे दूग्ध उत्पादन अधिकाधिक मिळून जनावरांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होत आहे.

वडाच्या पाल्यापासून खत

वडाच्या पानात अधिक मूलद्रव्ये असल्याने मल्चिंगसाठी फायदेशीर ठरते. शिवाय बाष्पीकरण कमी होत असल्याने झाडांचे संरक्षण होते. कातळावरील झाडांच्या संरक्षणासाठी याचा फायदा अधिक होतो. शिवाय खर्चही वाचतो व बागा उन्हाळ्यातही टवटवीत राहतात. हा त्यांचा प्रयोग यशस्वी झाला असून, गेली चार ते पाच वर्षे वडाचा पाला गोळा करून खत निर्मितीबरोबर मल्चिंगसाठी वापर करीत आहेत.