शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाड्यांसाठी सौरऊर्जेचा वापर प्रश्न सुटणार : वीजबिलाचा भार पेलवेना

By admin | Updated: September 15, 2014 23:14 IST

वीजबिलाचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.

रहिम दलाल -रत्नागिरी-ग्रामपंचायतींना वीजबिल पेलवेनासे झाल्याने अंगणवाड्यांच्या नवीन इमारतींसाठी यापुढे सौरऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन अंगणवाड्यांच्या वीजबिलाचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत जिल्ह्यात ९० पर्यवेक्षिका, २२६२ अंगणवाड्या व ६३३ मिनी अंगणवाड्या मंजूर आहेत़ मात्र, प्रत्यक्षात जिल्ह्यात २२५० अंगणवाड्या व ५६७ मिनी अंगणवाड्या अशा एकूण २८१७ अंगणवाड्या आहेत़ जिल्ह्यातील ८४५ ग्रामपंचायतींना २८१७ अंगणवाड्यांच्या वीजबिलांचा भार पेलवेनासा झाला आहे़जिल्ह्यात एकाच ग्रामपंचायतीच्या हद्दीत दोन ते तीन अंगणवाड्या कार्यरत आहेत़ प्रत्येक महिन्याला महावितरणकडून वीजबिल देण्यात येते़ या अंगणवाड्यांची भरमसाठ वीजबिले येतात़ अंगणवाड्यांना ही बिले भरण्यासाठी स्वतंत्र निधी येत नाही़ त्यामुळे या अंगणवाड्यांचा भार ग्रामपंचायतींवर टाकण्यात आला आहे़ जिल्हा परिषद महिला व बालकल्याण किंवा एकात्मिक बालविकास कार्यालयाकडून या अंगणवाड्यांच्या वीजबिलांवर खर्च करण्यासाठी ग्रामपंचायतींना दमडीही दिली जात नाही़ अनेक ग्रामपंचायतींचे उत्पन्न नसल्याने दोन-तीन अंगणवाड्यांची वीजबिले भरणा करण्यासाठी रक्कम कुठून आणणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ त्यामुळे अंगणवाड्यांची वीजबिले भरण्यास ग्रामपंचायती नकार देत आहेत़जिल्हा परिषदेने अंगणवाड्यांच्या नवीन इमारतींचे बांधकाम केल्यानंतर त्यांना महावितरणकडून वीजपुरवठा न घेता सौरऊर्जेचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. ही इमारत बांधकाम करण्यापूर्वी वीजजोडणीची २५ हजार रुपयांची तरतूद करण्यात येते. हा खर्च वीज जोडणीवर न करता सौरऊर्जेसाठी करण्यात येणार आहे. सौरऊर्जेवर अंगणवाडीला वीज मिळाल्यास त्यांना वीजबिल भरण्याची कटकट कायमची संपणार आहे. त्यामुळे आता वीजबिलाचा प्रश्नही उरणार नाही. अंगणवाड्यांना नवीन इमारतींसाठी सौरऊर्जेचा पर्याय स्विकारला आहे. याद्वारे वीजबिले टळतील. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा भार कमी होणार आहे.