शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

अंगणवाड्यांसाठी सौरऊर्जेचा वापर प्रश्न सुटणार : वीजबिलाचा भार पेलवेना

By admin | Updated: September 15, 2014 23:14 IST

वीजबिलाचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.

रहिम दलाल -रत्नागिरी-ग्रामपंचायतींना वीजबिल पेलवेनासे झाल्याने अंगणवाड्यांच्या नवीन इमारतींसाठी यापुढे सौरऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन अंगणवाड्यांच्या वीजबिलाचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत जिल्ह्यात ९० पर्यवेक्षिका, २२६२ अंगणवाड्या व ६३३ मिनी अंगणवाड्या मंजूर आहेत़ मात्र, प्रत्यक्षात जिल्ह्यात २२५० अंगणवाड्या व ५६७ मिनी अंगणवाड्या अशा एकूण २८१७ अंगणवाड्या आहेत़ जिल्ह्यातील ८४५ ग्रामपंचायतींना २८१७ अंगणवाड्यांच्या वीजबिलांचा भार पेलवेनासा झाला आहे़जिल्ह्यात एकाच ग्रामपंचायतीच्या हद्दीत दोन ते तीन अंगणवाड्या कार्यरत आहेत़ प्रत्येक महिन्याला महावितरणकडून वीजबिल देण्यात येते़ या अंगणवाड्यांची भरमसाठ वीजबिले येतात़ अंगणवाड्यांना ही बिले भरण्यासाठी स्वतंत्र निधी येत नाही़ त्यामुळे या अंगणवाड्यांचा भार ग्रामपंचायतींवर टाकण्यात आला आहे़ जिल्हा परिषद महिला व बालकल्याण किंवा एकात्मिक बालविकास कार्यालयाकडून या अंगणवाड्यांच्या वीजबिलांवर खर्च करण्यासाठी ग्रामपंचायतींना दमडीही दिली जात नाही़ अनेक ग्रामपंचायतींचे उत्पन्न नसल्याने दोन-तीन अंगणवाड्यांची वीजबिले भरणा करण्यासाठी रक्कम कुठून आणणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ त्यामुळे अंगणवाड्यांची वीजबिले भरण्यास ग्रामपंचायती नकार देत आहेत़जिल्हा परिषदेने अंगणवाड्यांच्या नवीन इमारतींचे बांधकाम केल्यानंतर त्यांना महावितरणकडून वीजपुरवठा न घेता सौरऊर्जेचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. ही इमारत बांधकाम करण्यापूर्वी वीजजोडणीची २५ हजार रुपयांची तरतूद करण्यात येते. हा खर्च वीज जोडणीवर न करता सौरऊर्जेसाठी करण्यात येणार आहे. सौरऊर्जेवर अंगणवाडीला वीज मिळाल्यास त्यांना वीजबिल भरण्याची कटकट कायमची संपणार आहे. त्यामुळे आता वीजबिलाचा प्रश्नही उरणार नाही. अंगणवाड्यांना नवीन इमारतींसाठी सौरऊर्जेचा पर्याय स्विकारला आहे. याद्वारे वीजबिले टळतील. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा भार कमी होणार आहे.