शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

हजारो उमेदवारांना केवळ आठ स्वच्छतागृहे

By admin | Updated: February 15, 2015 23:39 IST

चौकशीची मागणी : ‘महासैन्यभरती’च्या नियोजनातील महाचुका नडल्या

रत्नागिरी : रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये ८ फेब्रुवारीपासन सुरू झालेल्या सैनिक भरतीसाठी राज्याच्या अनेक जिल्ह्यातून दररोज हजारो उमेदवार येत आहेत. त्यांच्या निवासाची सोय नाहीच, परंतु या हजारो उमेदवारांसाठी क्रीडांगणाच्या बाहेरच्या बाजुला केवळ ८ स्वच्छतागृहे असल्याने उमेदवार व सुविधांची संख्या यांचे प्रमाण व्यस्त बनले असून, मारुती मंदिर परिसर कचरा व घाणीमुळे बकाल बनला आहे. या स्थितीला आयोजकांच्या नियोजनातील महाचुुकाच जबाबदार आहेत, असा आरोप आता नागरिकांतून होत आहे. ही सैन्यभरती सैनिक जनरल डयुटी, सैनिक टेक्निकल, सैनिक क्लर्क, स्टोअर किपर, सैनिक नर्सिंग असिस्टंट व सैनिक ट्रेड्समन या ट्रेडकरीता ८ फेब्रुवारी २०१५ पासून सुरू झाली असून १८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. आज सातारा जिल्ह्यातील उमेदवारांची भरती प्रक्रिया झाली. १६ व १७ फेब्रुवारीला उर्वरित महाराष्ट्र, गोवा, गुजरातमधील उमेदवारांची भरती होणार आहे. या दोन्ही दिवशी रत्नागिरीत येणाऱ्या उमेदवारांची संख्या आतापर्यंतच्या संख्येहूनही अधिक असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्यातील तरुणांची गैरसोय राज्याचाच विषय राहू शकते, परंतु गोवा व गुजरातमधून येणाऱ्या तरुणांची गैरसोय, स्वच्छतागृहे नसणे ही बाब रत्नागिरीची राज्याबाहेर नाचक्की करणारी ठरणार असल्याची चर्चाही आता सुरू झाली आहे. त्यामुळे आयोजक आता सुविधांसाठी केवळ पालिकेकडे बोट दाखवत आहेत. पालिकेनेच घोडचूक केल्याचे भासवत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न सुरू आहे. (प्रतिनिधी)पालिकेकडून चार नवीन स्वच्छतागृहांची व्यवस्थाशहरात सैनिक भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची गैरसोय लक्षात घेऊन रत्नागिरी पालिकेने आज तयार पध्दतीची दोन युनिटस्मध्ये असलेली चार स्वच्छतागृह आज (रविवार) सकाळी शिवाजी स्टेडियमच्या बाहेर बसवण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी एम. बी. खोडके यांनी ‘लोकमत’ला दिली. या खास पध्दतीच्या स्वच्छतागृहांसाठी ५ लाखांचा खर्च आला आहे. मारुती मंदिर परिसर व शहरातच भरती प्रक्रिया संपल्यानंतर विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाणार असल्याचेही खोडके यांनी सांगितले. सैन्यभरती झाल्यानंतर पालिकेला शहरात स्वच्छता मोहीम राबवावी लागणार आहे. हजारोंच्या संख्येने आलेल्या उमेदवारांमुळे शहरातील अनेक भागात कचरा साठला असून, त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरली आहे.