शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

आमदार साळवी यांची हकालपट्टी करण्याचे धाडस दाखवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:20 IST

राजापूर : ज्यांनी रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केले होते, त्यांची यापूर्वीच शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे पक्षातून हाकलून दिलेल्या ...

राजापूर : ज्यांनी रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केले होते, त्यांची यापूर्वीच शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे पक्षातून हाकलून दिलेल्या मंडळींना पक्षात घेऊन भाजप आपली पाठ थोपटून घेत आहे, असे वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेच्या सागवे विभागातील पदाधिकाऱ्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. काबाडकष्ट करून तळागाळात पक्षसंघटना वाढविणाऱ्यांनी रिफायनरीचे समर्थन केले म्हणून हकालपट्टी केली; मग रिफायनरी प्रकल्पाचे जाहीर समर्थन करणाऱ्या शिवसेना आमदार राजन साळवी यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे धाडस शिवसेनेने का दाखविले नाही? असा प्रश्न भाजपचे तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांनी केला आहे. हिंमत असेल तर शिवसेनेने आमदार साळवी यांचा आमदारकीचा राजीनामा घ्यावा आणि पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्हानही गुरव यांनी दिले आहे.

सागवेच नाही तर तालुक्याच्या अनेक भागांतील शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक शिवसेनेच्या विकासविरोधी राजकारणाला कंटाळून भाजपमध्ये येण्यास तयार आहेत. त्यामुळेच शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या पायांखालची जमीन आता सरकू लागल्याचा टोला गुरव यांनी लगावला आहे. राजापूर तालुक्यात भाजपने शिवसेनेला चांगलाच दणका दिला आहे. सागवे विभागातील रिफायनरी प्रकल्पसमर्थक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेला असतानाच शिवसेनेच्या सागवे विभागातील जिल्हा परिषद सदस्या लक्ष्मी शिवलकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करीत शिवसेनेला दणका दिला.

जे भाजपमध्ये गेले त्यांची दोन वर्षांपूर्वी पक्षातून हकालपट्टी केलेली आहे. त्यांना पक्षात घेऊन ढोल बडविणे म्हणजे भाजपचा वैचारिक दळभद्रीपणा असल्याची टीका सागवेतील शिवसेना पदाधिकाऱ्याने केली आहे. याचा समाचार गुरव यांनी घेतला आहे. जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मी शिवलकर यांची पक्षाने हकालपट्टी केली होती, तर त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करून, त्यांचा जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा घेऊन फेरनिवडणूक घेण्याचे धाडस शिवसेनेने का दाखविले नाही? असा प्रश्न गुरव यांनी केला आहे. ज्यांनी निष्ठेने पक्षात काम केले, पदरमोड करून पक्ष वाढविला, तळागाळात संघटना वाढविली, त्यांनी विकासासाठी प्रकल्पाचे समर्थन केले म्हणून त्यांची हकालपट्टी करता आणि मग मुंबईत टीव्ही चॅनेलसमोर रिफायनरी प्रकल्पाचे स्वागत करून जाहीर समर्थन करणाऱ्या आमदार राजन साळवींची का नाही हकालपट्टी केली? असा प्रश्नही गुरव यांनी केला आहे. कार्यकर्त्यांना वेगळा न्याय आणि नेत्यांना वेगळा न्याय असे शिवसेनेने आहे काय? असाही टोला गुरव यांनी लगावला आहे. भविष्यात शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असा गौप्यस्फोटही गुरव यांनी केला आहे.