शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
3
आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
4
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
5
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
6
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
8
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
9
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
10
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
11
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
12
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
13
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
15
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
16
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
17
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
18
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
19
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
20
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट

आमदार साळवी यांची हकालपट्टी करण्याचे धाडस दाखवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:20 IST

राजापूर : ज्यांनी रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केले होते, त्यांची यापूर्वीच शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे पक्षातून हाकलून दिलेल्या ...

राजापूर : ज्यांनी रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केले होते, त्यांची यापूर्वीच शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे पक्षातून हाकलून दिलेल्या मंडळींना पक्षात घेऊन भाजप आपली पाठ थोपटून घेत आहे, असे वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेच्या सागवे विभागातील पदाधिकाऱ्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. काबाडकष्ट करून तळागाळात पक्षसंघटना वाढविणाऱ्यांनी रिफायनरीचे समर्थन केले म्हणून हकालपट्टी केली; मग रिफायनरी प्रकल्पाचे जाहीर समर्थन करणाऱ्या शिवसेना आमदार राजन साळवी यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे धाडस शिवसेनेने का दाखविले नाही? असा प्रश्न भाजपचे तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांनी केला आहे. हिंमत असेल तर शिवसेनेने आमदार साळवी यांचा आमदारकीचा राजीनामा घ्यावा आणि पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्हानही गुरव यांनी दिले आहे.

सागवेच नाही तर तालुक्याच्या अनेक भागांतील शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक शिवसेनेच्या विकासविरोधी राजकारणाला कंटाळून भाजपमध्ये येण्यास तयार आहेत. त्यामुळेच शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या पायांखालची जमीन आता सरकू लागल्याचा टोला गुरव यांनी लगावला आहे. राजापूर तालुक्यात भाजपने शिवसेनेला चांगलाच दणका दिला आहे. सागवे विभागातील रिफायनरी प्रकल्पसमर्थक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेला असतानाच शिवसेनेच्या सागवे विभागातील जिल्हा परिषद सदस्या लक्ष्मी शिवलकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करीत शिवसेनेला दणका दिला.

जे भाजपमध्ये गेले त्यांची दोन वर्षांपूर्वी पक्षातून हकालपट्टी केलेली आहे. त्यांना पक्षात घेऊन ढोल बडविणे म्हणजे भाजपचा वैचारिक दळभद्रीपणा असल्याची टीका सागवेतील शिवसेना पदाधिकाऱ्याने केली आहे. याचा समाचार गुरव यांनी घेतला आहे. जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मी शिवलकर यांची पक्षाने हकालपट्टी केली होती, तर त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करून, त्यांचा जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा घेऊन फेरनिवडणूक घेण्याचे धाडस शिवसेनेने का दाखविले नाही? असा प्रश्न गुरव यांनी केला आहे. ज्यांनी निष्ठेने पक्षात काम केले, पदरमोड करून पक्ष वाढविला, तळागाळात संघटना वाढविली, त्यांनी विकासासाठी प्रकल्पाचे समर्थन केले म्हणून त्यांची हकालपट्टी करता आणि मग मुंबईत टीव्ही चॅनेलसमोर रिफायनरी प्रकल्पाचे स्वागत करून जाहीर समर्थन करणाऱ्या आमदार राजन साळवींची का नाही हकालपट्टी केली? असा प्रश्नही गुरव यांनी केला आहे. कार्यकर्त्यांना वेगळा न्याय आणि नेत्यांना वेगळा न्याय असे शिवसेनेने आहे काय? असाही टोला गुरव यांनी लगावला आहे. भविष्यात शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असा गौप्यस्फोटही गुरव यांनी केला आहे.