शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
2
मंत्रिमंडळाचे जिल्हा असंतुलन; ५७ टक्के मंत्री ७ जिल्ह्यांतून, १५ जिल्हे मात्र मंत्र्यांविना वंचित
3
हरल्यावरही बक्षीस मिळतं पहिल्यांदाच पाहिलं! पाकच्या लष्कर प्रमुखांची सोशल मीडियावर उडतेय खिल्ली
4
पत्नी आजारी होती, बदली केली नाही; माजी सरन्यायाधीशांचे नाव न घेता न्यायमूर्तींची निरोप समारंभात नाराजी
5
दहशतवादी हल्ल्याचा कट अन् प्रशिक्षणासाठी तरुणांना पाकमध्ये पाठवले; शहजादचे धक्कादायक खुलासे
6
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
7
लग्नाच्या ३४ वर्षांनंतर पतीसोबत घटस्फोट घेणार अर्चना पूरण सिंग? अभिनेत्री म्हणाल्या- "आम्ही भांडतो, पण..."
8
जान्हवी कपूरचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकवरुन नजरच हटेना
9
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
10
१२वी नापास सायबर गुन्हेगार, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान करत होता देशविरोधी काम! एटीएसकडून अटक
11
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
12
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
13
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
14
सरन्यायाधीश आले तर... न्या. गवई यांच्या जाहीर नाराजीनंतर सरकारने काढले आदेश
15
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
16
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
17
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
18
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
19
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले

धक्कादायक पराभव

By admin | Updated: May 17, 2014 00:08 IST

रत्नागिरी : सर्वसामान्य माणसाच्या मनातील नाराजीचा किंबहुना राणेंविरोधी भावनेचा उद्रेक मतदानातून झाला आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग

रत्नागिरी : सर्वसामान्य माणसाच्या मनातील नाराजीचा किंबहुना राणेंविरोधी भावनेचा उद्रेक मतदानातून झाला आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे विद्यमान खासदार आणि महाराष्ट्राचे उद्योगमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नीलेश राणे यांचा तब्बल दीड लाख मतांनी धक्कादायक पराभव झाल्याने मतदारसंघात खळबळ उडाली असून, नारायण राणे यांच्या वर्चस्वाला जबर धक्का बसला आहे. महायुतीचे उमेदवार विनायक राऊत या मतदारसंघाचे सोळावे खासदार म्हणून विजयी झाले आहेत. या विजयाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज दुपारी रत्नागिरीत येऊन रत्नागिरीकरांना अभिवादन करतानाच विजयी उमेदवार विनायक राऊत यांचे अभिनंदन केले. २००९ मध्ये खासदार बनलेले कॉँग्रेसचे नीलेश राणे यांचा यावेळचा पराभव उद्योगमंत्री राणे यांच्या जिव्हारी लागला. त्यांचेच होमपीच असलेल्या सिंंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात नीलेश राणे यांची पीछेहाट झाली. सावंतवाडी व कुडाळ विधानसभा मतदारसंघात विनायक राऊत यांना विक्रमी मताधिक्य मिळाले. कणकवलीत राऊत यांना अल्प मताधिक्यावर समाधान मानावे लागले. सावंतवाडी मतदारसंघात राष्टÑवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी राणे यांच्याविरोधात केलेल्या बंडाचे पडसाद मतदान यंत्रातून प्रकर्षाने दिसून आले. त्या मतदारसंघात सेनेच्या विनायक राऊत यांना तब्बल ४१ हजारांचे मताधिक्य मिळाले, तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात राष्टÑवादीचे पालकमंत्री उदय सामंत यांचे वर्चस्व असतानाही तेथे सेनेच्या राऊत यांना ३७ हजारांचे मताधिक्य मिळाले. राजापूरमध्ये २२ हजार मताधिक्य राऊत यांना मिळाले. केवळ कणकवली मतदारसंघात राऊत यांना १३७७ एवढे अल्प मताधिक्य मिळाले. संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील कॉँग्रेसच्या झालेल्या पीछेहाटीने पक्ष कार्यकर्त्यांनाही धक्का बसला आहे. नीलेश राणे व राज्यातील कॉँग्रेस उमेदवारांच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आपला मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी या विधानसभा मतदार संघांसह कणकवली आणि कुडाळ या नारायण राणे यांच्या प्रभावक्षेत्रातही नीलेश राणे यांची मोठी पीछेहाट झाली आहे. त्यामुळे या पराभवाची कारणमिमांसा आता राणे कुुटुंबियांना व कॉँग्रेसलाही करावी लागणार आहे. रत्नागिरी एमआयडीसीतील फूूड कॉर्पोरेशनच्या इमारतीत सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच सेनेचे विनायक राऊत यांनी घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम होती. मताधिक्याचा ग्राफ उंचावत गेला तो दीड लाखांपर्यंत पोहोचला. प्रत्येक फेरीत राऊत यांना मिळालेले मताधिक्य याप्रमाणे : १-५९१९, २-७७८५, ३-५३९३, ४-५०९३, ५-९७००, ६-९०८४, ७-७४६३, ८-७०३८, ९-३७६७, १०-५४०४, ११-९९५९, १२-७१९४, १३-७८२३, १४-४०४५, १५-८८३८, १६-७१९१, १७-६७५७, १८-५२४१, १९-४४८६, २०-७६७२, २१-५३५६, २२-३७७१, २३-२६९७, २४-१८०२, २५-६२२. पहिल्या चार ते पाच फेर्‍यांतच निवडणूक निकालाचा कल स्पष्ट दिसून येत होता. पाचव्या फेरीत राऊत यांनी ९७०० मताधिक्य मिळविल्यानंतर शिवसैनिकांनी जल्लोष सुरू केला. कारण पुढील सर्वच फेर्‍यात राऊत यांना मताधिक्य मिळत असल्याचे वृत्तही तोपर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचले होते. सकाळी ८.१५ वाजताच्या दरम्यान उमेदवार नीलेश राणे मतमोजणी केंद्रात येऊन काही वेळातच निघून गेले. मात्र, महायुतीचे कार्यकर्ते विजयाचा अंदाज येताच मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी करू लागले. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य राऊतना मिळाले नंतर त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. (प्रतिनिधी)