शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

वळवाचा तडाखा; तीन ठार, तीन जखमी

By admin | Updated: May 21, 2014 17:37 IST

लांजा, राजापूर, संगमेश्वर तालुक्यांना झोडपले

रत्नागिरी : जिल्ह्यातील लांजा, राजापूर, संगमेश्वर या तालुक्यांना तीन तास वळवाच्या पावसाने झोडपून काढले. या वळवाने तीन बळी घेतले, तर चौघांना जखमी केले आहे. लांजा तालुक्यात रिक्षावर वडाचे झाड कोसळून सुरेखा कुरूप व उज्ज्वला खामकर या दोघी जागीच ठार झाल्या. या अपघातात महिलेसह दोघे जखमी झाले आहेत. राजापूर तालुक्यात अंगावर वीज कोसळून अक्षय गुरव हा युवक ठार झाला. यावेळी एक महिला जखमी झाली आहे. गेले काही दिवस उकाड्याने त्रस्त असलेल्या दक्षिण रत्नागिरीतील जनतेला पावसाने आज, मंगळवारी पहाटे सुखद गारवाही दिला. सुरुवातीला हलक्या स्वरूपाचा वाटणारा पाऊस नंतर आक्रमक झाला. या पावसाने लांजा, राजापूर आणि संगमेश्वर तालुक्यांना झोडपून काढले. संगमेश्वरातील काही भागांतच हा पाऊस कोसळला. मात्र, राजापूर आणि लांजात अनेक ठिकाणी त्याने तडाखा दिला. लांजा तालुक्यातील देवधे येथे मुंबई-गोवा महामार्गावर एका धावत्या रिक्षावर वडाचे झाड कोसळून रिक्षाचा चक्काचूर झाला. या रिक्षात बसलेल्या दोन महिला जागीच ठार झाल्या. सुरेखा राजाराम कुरूप (वय ६0), उज्ज्वला एकनाथ खामकर (५0, दोघीही रा. देवधे) अशी त्यांची नावे आहेत. झाड रिक्षाच्या मागील बाजूस पडल्याने दोघी महिला झाडाखालीच अडकून पडल्या होत्या. या दुर्घटनेत अन्य एक महिला आणि रिक्षाचालक जखमी झाले आहेत. दुसर्‍या एका घटनेत लांजा तालुक्यात वेरवली येथे एकाचा धरणात बुडून मृत्यू होण्याची घटना घडली आहे. राजापूर तालुक्यातही मंगळवारी प्रचंड पाऊस झाला. सोलगाव, पेंडखळे, प्र्रिंदावण, केळवली, ओणी व पाचल पूर्व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. पेंडखळे परिसरात तर जोरदार विजाही चमकत होत्या. पेंडखळे येथील वठारवाडीमधील सुभाष गुरव यांच्या घराच्या बाजूला वीज कोसळून तिचा प्रचंड लोळ घरात शिरला. यामध्ये अक्षय गुरव या युवकाचा जागीच मृत्यू झाला. एक महिला यात जखमी झाली आहे. गोठ्यात बांधलेली गायही या विजेच्या धक्क्याने मरण पावली. वाडीतील अनेकजणांच्या घरांतील विजेची उपकरणे जळून खाक झाली आहे. (प्रतिनिधी)