शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
3
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
4
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
5
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
6
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
7
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
8
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
9
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
10
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
11
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
12
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
13
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
14
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
15
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
16
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
17
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
18
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
19
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
20
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू

वळवाचा तडाखा; तीन ठार, तीन जखमी

By admin | Updated: May 21, 2014 17:37 IST

लांजा, राजापूर, संगमेश्वर तालुक्यांना झोडपले

रत्नागिरी : जिल्ह्यातील लांजा, राजापूर, संगमेश्वर या तालुक्यांना तीन तास वळवाच्या पावसाने झोडपून काढले. या वळवाने तीन बळी घेतले, तर चौघांना जखमी केले आहे. लांजा तालुक्यात रिक्षावर वडाचे झाड कोसळून सुरेखा कुरूप व उज्ज्वला खामकर या दोघी जागीच ठार झाल्या. या अपघातात महिलेसह दोघे जखमी झाले आहेत. राजापूर तालुक्यात अंगावर वीज कोसळून अक्षय गुरव हा युवक ठार झाला. यावेळी एक महिला जखमी झाली आहे. गेले काही दिवस उकाड्याने त्रस्त असलेल्या दक्षिण रत्नागिरीतील जनतेला पावसाने आज, मंगळवारी पहाटे सुखद गारवाही दिला. सुरुवातीला हलक्या स्वरूपाचा वाटणारा पाऊस नंतर आक्रमक झाला. या पावसाने लांजा, राजापूर आणि संगमेश्वर तालुक्यांना झोडपून काढले. संगमेश्वरातील काही भागांतच हा पाऊस कोसळला. मात्र, राजापूर आणि लांजात अनेक ठिकाणी त्याने तडाखा दिला. लांजा तालुक्यातील देवधे येथे मुंबई-गोवा महामार्गावर एका धावत्या रिक्षावर वडाचे झाड कोसळून रिक्षाचा चक्काचूर झाला. या रिक्षात बसलेल्या दोन महिला जागीच ठार झाल्या. सुरेखा राजाराम कुरूप (वय ६0), उज्ज्वला एकनाथ खामकर (५0, दोघीही रा. देवधे) अशी त्यांची नावे आहेत. झाड रिक्षाच्या मागील बाजूस पडल्याने दोघी महिला झाडाखालीच अडकून पडल्या होत्या. या दुर्घटनेत अन्य एक महिला आणि रिक्षाचालक जखमी झाले आहेत. दुसर्‍या एका घटनेत लांजा तालुक्यात वेरवली येथे एकाचा धरणात बुडून मृत्यू होण्याची घटना घडली आहे. राजापूर तालुक्यातही मंगळवारी प्रचंड पाऊस झाला. सोलगाव, पेंडखळे, प्र्रिंदावण, केळवली, ओणी व पाचल पूर्व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. पेंडखळे परिसरात तर जोरदार विजाही चमकत होत्या. पेंडखळे येथील वठारवाडीमधील सुभाष गुरव यांच्या घराच्या बाजूला वीज कोसळून तिचा प्रचंड लोळ घरात शिरला. यामध्ये अक्षय गुरव या युवकाचा जागीच मृत्यू झाला. एक महिला यात जखमी झाली आहे. गोठ्यात बांधलेली गायही या विजेच्या धक्क्याने मरण पावली. वाडीतील अनेकजणांच्या घरांतील विजेची उपकरणे जळून खाक झाली आहे. (प्रतिनिधी)