शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

एस. टी. विभाग तोट्यात

By admin | Updated: February 23, 2016 00:24 IST

परिवहन महामंडळ : वर्षभरात १ कोटी ८७ लाखांचा फटका

 रत्नागिरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाला एप्रिल २०१५ ते जानेवारी २०१६ अखेरीस नऊ महिन्यांमध्ये तब्बल १ अब्ज ९६ कोटी १ लाख ३ हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. गतवर्षी नऊ महिन्यांमध्ये १ अब्ज ९७ कोटी ८८ लाख १२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी रत्नागिरी विभागाला १ कोटी ८७ लाख ९ हजार रुपयांचा तोटा झाला आहे. खासगी वाहतुकीकडे प्रवासी वळत असल्यामुळे महामंडळ ‘प्रवासी वाढवा’ अभियान राबवित आहे. मात्र, कोलमडलेले वेळापत्रक, शिवाय अचानक होणारे बंद, प्रवाशांशी चालक-वाहकांचे उध्दट वर्तन, आदी प्रकारांमुळे एस. टी.चा प्रवासीवर्ग दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. महागाईचा परिणाम तिकीट दरावरही झाला आहे. मात्र, प्रवासी संख्या घटत असल्यामुळे महामंडळाला आर्थिक तोटा सोसावा लागत आहे. वेळेत न सुटणाऱ्या गाड्यांबरोबरच कोणाच्या तरी दबावाखाली व्हाया करण्यात येत असल्याने गाडीचे अंतर वाढत आहे. ज्या ठिकाणी भारमान नाही, त्याठिकाणीही बसेस व्हाया केल्या जातात. त्यामुळे खर्च जास्त आणि त्यामानाने उत्पन्न कमी अशी महामंडळाची अवस्था आहे. जिल्ह््यातील नऊ आगारांपैकी केवळ दापोली व मंडणगड आगारांचे उत्पन्न काही प्रमाणात वाढले असले तरी अन्य सात आगारांमधील उत्पन्न घटले आहे. दिवसेंदिवस राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे घटते उत्पन्न ही महामंडळासाठी चिंतेची बाब बनली आहे. (प्रतिनिधी) दोन वर्षातील एस. टी.चे उत्पन्न (कोटीत) आगार २०१४ २०१५ आगार २०१४ २०१५ दापोली २४.१० २४.६६ रत्नागिरी ४०.२८ ३९.६२ खेड २४.०७ २३.५० लांजा १२.५२ १२.२४ चिपळूण ३२.८१ ३२.३० राजापूर १३.८८ १३.७० गुहागर २०.६३ २०.४१ मंडणगड ०९.८० ०९.८९ देवरूख १९.७५ १९.६६ एकूण १९७.८८ १९६.०१