शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
2
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
3
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
4
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
5
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
8
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
9
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
10
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
11
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
12
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
13
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
14
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
15
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
16
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
17
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
18
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
19
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
20
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा

एस. टी.च्या २५ गाड्या काढणार भंगारात..

By admin | Updated: February 18, 2015 23:48 IST

राज्य परिवहन महामंडळ : एस. टी.चे आयुर्मान १० वर्षे निर्धारित

मेहरून नाकाडे -रत्नागिरी  ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातील २५ गाड्या निर्लेखित (भंगारात) काढण्यात येणार आहेत. एस. टी.चे आयुर्मान १० वर्षे निर्धारित करण्यात आले आहे. दहा वर्षांपेक्षा अधिक काळ वापरलेल्या एस. टी.च्या १० ते १५ टक्के जुन्या गाड्या बदलण्यात येतात. गतवर्षी एकूण ७४ गाड्यांचा लिलाव करण्यात आला होता. त्यामुळे १ कोटी ४१ रूपये लिलावातून प्राप्त झाले होते. मार्चपर्यंत २५ गाड्यांचा लिलाव होण्याची शक्यता आहे.रत्नागिरी वर्कशॉप १९६० पासून कार्यरत आहे. सुरुवातीला रत्नागिरी व सिंधुदुर्ग विभाग संयुक्त असल्याने एकाच वर्कशॉपमधून कामकाज होत असे. मात्र, १९८०मध्ये दोन्ही विभागांची वर्कशॉप स्वतंत्र झाली व कामकाजही स्वतंत्ररित्या सुरू झाले. गिअर बदलणे, इंजिन दुरूस्ती असो वा बदलणे, रंगकाम, आसन व्यवस्था, गाडीतील विद्युतीकरण, टायर बदलणे आदी सर्व प्रकारची कामे वर्कशॉपमध्ये सुरू असतात.याशिवाय वापरात असलेल्या गाड्यांचे दरवर्षी नूतनीकरण करून आरटीओ पासिंग केले जाते. संबंधित वर्कशॉपमध्ये सर्व प्रकारची दुरूस्ती होत असल्याने वरिष्ठ अधिकारी ते कारागीरपर्यंत २०० कर्मचारी कार्यरत आहेत.रत्नागिरी विभागात एकूण ७५० गाड्यांव्दारे दररोज ९ हजार फेऱ्यांमधून एकूण २ लाख ५० हजार प्रवाशांची वाहतूक होते. दररोज २ लाख ३३ किलोमीटर इतका प्रवास होतो. त्याद्वारे महामंडळाला ६१ लाख ९ हजार रूपये दररोज सरासरी उत्पन्न मिळत आहे. एकूण ७५० गाड्यांपैकी ६० गाड्या ‘टाटा’ कंपनीच्या, तर उर्वरित ६९० गाड्या ‘लेलँड’ कंपनीच्या आहेत. टाटाच्या ६० पैकी ३२ गाड्या मिडी प्रकारच्या, तर २८ गाड्या साध्या आहेत.विभागातर्फे दरवर्षी जुन्या गाड्यांचा अहवाल पाठवण्यात येतो. शिवाय नवीन गाड्यांची मागणी करण्यात येते. त्यानुसार विभागासाठी नवीन गाड्या पुरवण्यात येतात. नागपूर, पुणे, औरंगाबाद येथे नवीन गाड्यांची बांधणी होते. त्यामुळे गाड्यांच्या मागणीनुसार नवीन गाड्या देण्यात येतात. तीन वर्षांच्या वापरानंतर हिरकणी गाड्यांचे साध्या गाडीत रूपांतर करण्यात येते. रंग बदलण्याबरोबरच काही तांत्रिक बदलही करण्यात येतात. टाटा कंपनीच्या गाड्या साडेआठ वर्षे वापरानंतर, तर लेलँड कंपनीच्या गाड्या १० वर्षांनंतर भंगारात काढल्या जातात. गेल्या पाच वर्षांत ३७७ गाड्या भंगारात काढण्यात आल्या असून, त्यांच्या लिलावाद्वारे ३ कोटी ९८ लाख विभागास प्राप्त झाले आहेत.