शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
7
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
8
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
9
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
10
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
11
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
12
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
13
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
14
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
15
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
16
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
17
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
18
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
19
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
20
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर

एस. टी.च्या २५ गाड्या काढणार भंगारात..

By admin | Updated: February 18, 2015 23:48 IST

राज्य परिवहन महामंडळ : एस. टी.चे आयुर्मान १० वर्षे निर्धारित

मेहरून नाकाडे -रत्नागिरी  ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातील २५ गाड्या निर्लेखित (भंगारात) काढण्यात येणार आहेत. एस. टी.चे आयुर्मान १० वर्षे निर्धारित करण्यात आले आहे. दहा वर्षांपेक्षा अधिक काळ वापरलेल्या एस. टी.च्या १० ते १५ टक्के जुन्या गाड्या बदलण्यात येतात. गतवर्षी एकूण ७४ गाड्यांचा लिलाव करण्यात आला होता. त्यामुळे १ कोटी ४१ रूपये लिलावातून प्राप्त झाले होते. मार्चपर्यंत २५ गाड्यांचा लिलाव होण्याची शक्यता आहे.रत्नागिरी वर्कशॉप १९६० पासून कार्यरत आहे. सुरुवातीला रत्नागिरी व सिंधुदुर्ग विभाग संयुक्त असल्याने एकाच वर्कशॉपमधून कामकाज होत असे. मात्र, १९८०मध्ये दोन्ही विभागांची वर्कशॉप स्वतंत्र झाली व कामकाजही स्वतंत्ररित्या सुरू झाले. गिअर बदलणे, इंजिन दुरूस्ती असो वा बदलणे, रंगकाम, आसन व्यवस्था, गाडीतील विद्युतीकरण, टायर बदलणे आदी सर्व प्रकारची कामे वर्कशॉपमध्ये सुरू असतात.याशिवाय वापरात असलेल्या गाड्यांचे दरवर्षी नूतनीकरण करून आरटीओ पासिंग केले जाते. संबंधित वर्कशॉपमध्ये सर्व प्रकारची दुरूस्ती होत असल्याने वरिष्ठ अधिकारी ते कारागीरपर्यंत २०० कर्मचारी कार्यरत आहेत.रत्नागिरी विभागात एकूण ७५० गाड्यांव्दारे दररोज ९ हजार फेऱ्यांमधून एकूण २ लाख ५० हजार प्रवाशांची वाहतूक होते. दररोज २ लाख ३३ किलोमीटर इतका प्रवास होतो. त्याद्वारे महामंडळाला ६१ लाख ९ हजार रूपये दररोज सरासरी उत्पन्न मिळत आहे. एकूण ७५० गाड्यांपैकी ६० गाड्या ‘टाटा’ कंपनीच्या, तर उर्वरित ६९० गाड्या ‘लेलँड’ कंपनीच्या आहेत. टाटाच्या ६० पैकी ३२ गाड्या मिडी प्रकारच्या, तर २८ गाड्या साध्या आहेत.विभागातर्फे दरवर्षी जुन्या गाड्यांचा अहवाल पाठवण्यात येतो. शिवाय नवीन गाड्यांची मागणी करण्यात येते. त्यानुसार विभागासाठी नवीन गाड्या पुरवण्यात येतात. नागपूर, पुणे, औरंगाबाद येथे नवीन गाड्यांची बांधणी होते. त्यामुळे गाड्यांच्या मागणीनुसार नवीन गाड्या देण्यात येतात. तीन वर्षांच्या वापरानंतर हिरकणी गाड्यांचे साध्या गाडीत रूपांतर करण्यात येते. रंग बदलण्याबरोबरच काही तांत्रिक बदलही करण्यात येतात. टाटा कंपनीच्या गाड्या साडेआठ वर्षे वापरानंतर, तर लेलँड कंपनीच्या गाड्या १० वर्षांनंतर भंगारात काढल्या जातात. गेल्या पाच वर्षांत ३७७ गाड्या भंगारात काढण्यात आल्या असून, त्यांच्या लिलावाद्वारे ३ कोटी ९८ लाख विभागास प्राप्त झाले आहेत.