शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

शिष्यवृत्ती परीक्षेबाबत शासन उदासिन

By admin | Updated: August 31, 2014 23:34 IST

शिक्षकांचे दुर्लक्ष : स्पर्धा परीक्षांचा मुख्य पाया झाला डळमळीत

सुमय्या तांबे - खाडीपट्टा -स्पर्धा परीक्षांचा पाया असणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षांकडे शासनाप्रमाणे शिक्षकांचेही दुर्लक्ष होत आहे. ही बाब दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या निकालावरुन स्पष्ट होत आहे. यावरुन या परीक्षांकडे पाहण्याचे गांभीर्य नसल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील जाणकारांमधून व्यक्त होत आहे.यावर्षी पूर्व माध्यमिक (चौथी) परीक्षेचा जिल्ह्याचा निकाल ५८.०३ टक्के, तर माध्यमिक शिष्यवृत्ती (सातवी) चा निकाल ४९.११ टक्के इतका लागला. चौथीत १७,२८१ विद्यार्थ्यांपैकी १० हजार १२५ विद्यार्थी पात्र झाले. तर सातवीत ११,११५ पैकी ५४५९ विद्यार्थी पात्र झाले. यात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे. काही शाळा व हायस्कूल शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विशेष मेहनत घेतात. यामुळे शासनाने जरी दुर्लक्ष केले असले तरी काही शाळांचे कार्य अविरतपणे सुरु आहे. परंतु जिल्हा परिषदेच्या शाळा व इतर अनुदानित व विनाअनुदानित शाळा यामधून म्हणावे तसे प्रयत्न शिष्यवृत्ती परीक्षांच्या विकासासाठी केले जात नाहीत. हे दरवर्षी लागणाऱ्या निकालावरुन स्पष्ट होत आहे.दरवर्षी जिल्ह्यामध्ये होणाऱ्या नोकर भरतीमध्ये जिल्ह्यातील तरुणांचा टक्का फारच कमी आहे. हे प्रमाण बदलायचे असेल तर शिष्यवृत्तीसारख्या परीक्षांमधून स्पर्धा परीक्षांचा पाया मजबूत करता येईल. यासाठी शिक्षण विभागाने जर का या परीक्षांकडे गांभीर्याने लक्ष दिले तर याचा चांगला परिणाम दिसून येईल. तर दुसऱ्या बाजूने शासन स्तरावरुन शिष्यवृत्ती परीक्षांकडे दुर्लक्ष होत आहे. शिष्यवृत्तीची रक्कम अतिशय तुटपूंजी असून तीदेखील वेळेत मिळत नाही. २००९ साली आॅनलाईन करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला. सन २०१० पासून ही सुविधा सुरु करण्यात आली. पूर्वी या शिष्यवृत्ती परीक्षेकडे सर्व शिक्षक गांभीर्याने पाहात असत.