शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती परीक्षेबाबत शासन उदासिन

By admin | Updated: August 31, 2014 23:34 IST

शिक्षकांचे दुर्लक्ष : स्पर्धा परीक्षांचा मुख्य पाया झाला डळमळीत

सुमय्या तांबे - खाडीपट्टा -स्पर्धा परीक्षांचा पाया असणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षांकडे शासनाप्रमाणे शिक्षकांचेही दुर्लक्ष होत आहे. ही बाब दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या निकालावरुन स्पष्ट होत आहे. यावरुन या परीक्षांकडे पाहण्याचे गांभीर्य नसल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील जाणकारांमधून व्यक्त होत आहे.यावर्षी पूर्व माध्यमिक (चौथी) परीक्षेचा जिल्ह्याचा निकाल ५८.०३ टक्के, तर माध्यमिक शिष्यवृत्ती (सातवी) चा निकाल ४९.११ टक्के इतका लागला. चौथीत १७,२८१ विद्यार्थ्यांपैकी १० हजार १२५ विद्यार्थी पात्र झाले. तर सातवीत ११,११५ पैकी ५४५९ विद्यार्थी पात्र झाले. यात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे. काही शाळा व हायस्कूल शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विशेष मेहनत घेतात. यामुळे शासनाने जरी दुर्लक्ष केले असले तरी काही शाळांचे कार्य अविरतपणे सुरु आहे. परंतु जिल्हा परिषदेच्या शाळा व इतर अनुदानित व विनाअनुदानित शाळा यामधून म्हणावे तसे प्रयत्न शिष्यवृत्ती परीक्षांच्या विकासासाठी केले जात नाहीत. हे दरवर्षी लागणाऱ्या निकालावरुन स्पष्ट होत आहे.दरवर्षी जिल्ह्यामध्ये होणाऱ्या नोकर भरतीमध्ये जिल्ह्यातील तरुणांचा टक्का फारच कमी आहे. हे प्रमाण बदलायचे असेल तर शिष्यवृत्तीसारख्या परीक्षांमधून स्पर्धा परीक्षांचा पाया मजबूत करता येईल. यासाठी शिक्षण विभागाने जर का या परीक्षांकडे गांभीर्याने लक्ष दिले तर याचा चांगला परिणाम दिसून येईल. तर दुसऱ्या बाजूने शासन स्तरावरुन शिष्यवृत्ती परीक्षांकडे दुर्लक्ष होत आहे. शिष्यवृत्तीची रक्कम अतिशय तुटपूंजी असून तीदेखील वेळेत मिळत नाही. २००९ साली आॅनलाईन करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला. सन २०१० पासून ही सुविधा सुरु करण्यात आली. पूर्वी या शिष्यवृत्ती परीक्षेकडे सर्व शिक्षक गांभीर्याने पाहात असत.