शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पूरमुक्तीचा प्रस्ताव बारगळला

By admin | Updated: July 30, 2015 00:24 IST

चिपळूण शहर : यंत्रणेच्या संवेदना गोठलेल्याच!

खेर्डी : चिपळूण शहर व लगतच्या गावांना दरवर्षी पुराचा फटका बसतो. यात कोट्यवधींची हानी होते, तर अनेकांचे संसार वाहून जातात. या परिस्थितीवर मात करण्यासाठी तज्ज्ञांच्या अभ्यास गटाची मागणी करण्यात आली होती. शासनाने उल्हास नदी पाणलोट क्षेत्र खोऱ्याच्या पूरमुक्त सर्वेक्षणासाठी १ कोटीचा खर्च केला होता. या धर्तीवर हा प्रस्ताव होता. मात्र, तो लालफितीतच अडकला आहे.चिपळूण शहर व परिसरात दरवर्षी पूर येतो. सन २००५च्या महापुराने तर हाहाकार उडवून दिला होता. या पार्श्वभूमीवर एका अहवालानुसार या गंभीर स्थितीकडे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानुसार पुरामुळे हजारो कोटींची मालमत्ता बाधित होते. दरवर्षी ६० हजार लोकांना पुराचा फटका बसतो. या कुटुंबांचे पुनर्वसन करायचे ठरविले तर येणारा खर्च प्रचंड आहे. त्यातून सामाजिक प्रश्न निर्माण होतील. शहरातून वाहणाऱ्या शीव व वाशिष्ठी या दोन नद्यातील गाळ काढून त्यांची पूर्ण जलनिस्सारण क्षमता स्थापित करणे, अतिवृष्टीवेळी नद्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी न येण्यासाठी नदी पात्रातच योग्य ठिकाणी विशिष्ठ प्रकारची धरणे बांधून पाणी तात्पुरते अडवून ठेवणे, पावसाचा जोर कमी झाल्यानंतर ते पाणी जलनिस्सारण क्षमतेच्या प्रमाणात सोडून पुढील अतिवृष्टीसाठी धरणांची जलधारण क्षमता उपलब्ध करुन ठेवणे अशा प्रकारच्या उपाययोजनांमुळे कमी खर्चात व कमी क्षमतेची धरणे बांधून शहरासह आजूबाजूची गावे पूरमुक्त होतील असे प्राथमिक सर्व्हेक्षण नगर परिषदेचे होते. त्यासाठी कोटीचा खर्च येईल. उल्हास नदी ५५० चौरस किलोमीटर पाणलोट क्षेत्र खोऱ्याच्या पूरमुक्ततेसाठी सर्वेक्षणाअंती डॉ. दि. मा. मोरे यांनी अहवाल बनवला होता. या धर्तीवर चिपळूण नगर परिषद त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अहवाल बनविणार होती. या कामासाठी आठ वर्षांपूर्वी ठरावही करण्यात आला होता. एवढेच नव्हे; तर त्यासाठी काही लाख रुपयांचा निधीही नगर परिषदेकडे मागितला आहे. (वार्ताहर)1चिपळुणातील २००५च्या महापुरानंतर उदासीनतेमुळे तोडगाच निघालेला नाही.2लोकप्रतिनिधींपासून ते अगदी प्रशासकीय पातळीपर्यंत सर्वच क्षेत्राबाबत उदासीनता आहे.3गेल्या काही वर्षात चिपळुणात मोठी पूर आपत्ती आलेली नाही, अन्यथा मोठी हानी होऊ शकते.