शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

पूरमुक्तीचा प्रस्ताव बारगळला

By admin | Updated: July 30, 2015 00:24 IST

चिपळूण शहर : यंत्रणेच्या संवेदना गोठलेल्याच!

खेर्डी : चिपळूण शहर व लगतच्या गावांना दरवर्षी पुराचा फटका बसतो. यात कोट्यवधींची हानी होते, तर अनेकांचे संसार वाहून जातात. या परिस्थितीवर मात करण्यासाठी तज्ज्ञांच्या अभ्यास गटाची मागणी करण्यात आली होती. शासनाने उल्हास नदी पाणलोट क्षेत्र खोऱ्याच्या पूरमुक्त सर्वेक्षणासाठी १ कोटीचा खर्च केला होता. या धर्तीवर हा प्रस्ताव होता. मात्र, तो लालफितीतच अडकला आहे.चिपळूण शहर व परिसरात दरवर्षी पूर येतो. सन २००५च्या महापुराने तर हाहाकार उडवून दिला होता. या पार्श्वभूमीवर एका अहवालानुसार या गंभीर स्थितीकडे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानुसार पुरामुळे हजारो कोटींची मालमत्ता बाधित होते. दरवर्षी ६० हजार लोकांना पुराचा फटका बसतो. या कुटुंबांचे पुनर्वसन करायचे ठरविले तर येणारा खर्च प्रचंड आहे. त्यातून सामाजिक प्रश्न निर्माण होतील. शहरातून वाहणाऱ्या शीव व वाशिष्ठी या दोन नद्यातील गाळ काढून त्यांची पूर्ण जलनिस्सारण क्षमता स्थापित करणे, अतिवृष्टीवेळी नद्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी न येण्यासाठी नदी पात्रातच योग्य ठिकाणी विशिष्ठ प्रकारची धरणे बांधून पाणी तात्पुरते अडवून ठेवणे, पावसाचा जोर कमी झाल्यानंतर ते पाणी जलनिस्सारण क्षमतेच्या प्रमाणात सोडून पुढील अतिवृष्टीसाठी धरणांची जलधारण क्षमता उपलब्ध करुन ठेवणे अशा प्रकारच्या उपाययोजनांमुळे कमी खर्चात व कमी क्षमतेची धरणे बांधून शहरासह आजूबाजूची गावे पूरमुक्त होतील असे प्राथमिक सर्व्हेक्षण नगर परिषदेचे होते. त्यासाठी कोटीचा खर्च येईल. उल्हास नदी ५५० चौरस किलोमीटर पाणलोट क्षेत्र खोऱ्याच्या पूरमुक्ततेसाठी सर्वेक्षणाअंती डॉ. दि. मा. मोरे यांनी अहवाल बनवला होता. या धर्तीवर चिपळूण नगर परिषद त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अहवाल बनविणार होती. या कामासाठी आठ वर्षांपूर्वी ठरावही करण्यात आला होता. एवढेच नव्हे; तर त्यासाठी काही लाख रुपयांचा निधीही नगर परिषदेकडे मागितला आहे. (वार्ताहर)1चिपळुणातील २००५च्या महापुरानंतर उदासीनतेमुळे तोडगाच निघालेला नाही.2लोकप्रतिनिधींपासून ते अगदी प्रशासकीय पातळीपर्यंत सर्वच क्षेत्राबाबत उदासीनता आहे.3गेल्या काही वर्षात चिपळुणात मोठी पूर आपत्ती आलेली नाही, अन्यथा मोठी हानी होऊ शकते.