शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तरूणाईला गृहीत धरणे राजकीय पक्षांना तोट्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:07 IST

- मनोज मुळ्ये आजचा तरूण इंटरनेटच्या आहारी गेला आहे, सोशल मीडियामध्ये अडकून पडलेला आहे, त्याला सामाजिक भान नाही, अशा ...

- मनोज मुळ्येआजचा तरूण इंटरनेटच्या आहारी गेला आहे, सोशल मीडियामध्ये अडकून पडलेला आहे, त्याला सामाजिक भान नाही, अशा पद्धतीने अनेक आरोप आताच्या तरूणांवर होतात. तसं पाहिलं तर प्रत्येक पिढीला याच पद्धतीच्या आरोपांना तोंड द्यावे लागतेच. पण कधी या तरूणाईच्या जवळ जाऊन पाहिलं तर लक्षात येतं की, इंटरनेटच्या वापरामुळे या तरूण पिढीकडे ज्ञानाचे खूप मोठे भांडार आहे. या पिढीला स्वत:ची अशी ठाम मते आहेत. सोशल मीडियामुळे या तरूणाईची जगाशी ओळख आहे. गरज आहे ती त्यांना दिशा मिळण्याची. वाढत्या स्पर्धेमुळे ही पिढी अस्वस्थ आहे. खूप दबावाखाली आहे. गरज आहे ती आश्वस्त करण्याची. या निवडणुकीत तरूणांचा टक्का चांगल्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे या तरूणांना कायमस्वरूपी आपलेसे करण्यासाठी राजकीय पक्षांना त्यांचा स्वतंत्र विचार करायला लागेल. या तरूणाईला गृहीत धरणे राजकीय पक्षांना महाग पडू शकते. तोट्याचे ठरू शकते.रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या अथक परिश्रमांमुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात नवमतदारांची संख्या जवळपास १ लाखांनी वाढली आहे. हे नवमतदार १८ ते १९ या वयोगटातील आहेत. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नवमतदार नोंदणीवर खूप मोठा भर दिला होता. रत्नागिरी जिल्ह्यात त्यासाठी खूप उपक्रम राबवण्यात आले. प्रत्येक महाविद्यालयात जिल्हाधिकारी चव्हाण यांनी मार्गदर्शन केले आणि मतदार नोंदणीसाठी अर्ज भरण्याचे आवाहन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही थोड्याफार याच पद्धतीने नवमतदारांसाठी मोहीम राबवण्यात आली. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात १ लाखाने नोंदणी वाढली.१८ ते १९ या वयोगटातील हे १ लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. त्यांना अजूनही राजकीय पक्ष, ध्येयधोरणे यांची ओळख झालेली नाही. ते अजूनही शिक्षण घेत आहेत. या मुलांसमोरचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो त्यांना आवश्यक असलेल्या उच्च शिक्षणाचा आणि हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आवश्यक असलेल्या नोकरीचा. रत्नागिरी जिल्ह्यात उच्च शिक्षणाच्या खूपच मर्यादीत सुविधा आहेत. ज्या सुविधा आहेत, त्या खासगी असल्याने तेथील शुल्क परवडणारे नाही. त्यामुळे या नवतरूणांना आपल्या उच्च शिक्षणाची चिंता आहे. त्या सुविधा देण्यासाठी राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.यावेळी एकूण १४ लाख ४0 हजार मतदारांपैकी साधारपणे ४ लाख मतदार १८ ते २५ वयोगटातील आहेत. या तरूण मतदाराला कोणता पक्ष आकृष्ट करणार, यावर निकालाचे गणित अवलंबून राहणार आहे. शिक्षण पूर्ण झालेल्या तरूणांसमोर प्रश्न आहे तो नोकरीचा. व्यवसाय करण्यासाठी पुरेसे भांडवल नाही, असा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. अशा तरूणांना फक्त नोकरी हाच आधार आहे. पण दुर्दैवाने जिल्ह्यात नवे प्रकल्प येत नाहीत. त्यामुळे नोकरीसाठी एकतर बाहेरगावचा रस्ता धरणे नाहीतर जिल्ह्यातच मिळेल ती नोकरी, मिळेल त्या पगारावर करणे, एवढाच पर्याय या तरूणांसमोर आहे. तसं पाहिलं तर सर्वच राजकीय पक्षांनी रोजगाराच्या मुद्द्याला जाहीरनाम्यात महत्त्वाचे स्थान दिले आहे. पण अशी आश्वासने अनेकदा मिळतात. त्यातून पुढे काहीच होत नाही. आम्ही तुमच्यासाठी आहोत, या पद्धतीने या तरूणाईला आश्वस्त करणे आवश्यक आहे. हे धोरण घेऊन जास्तीत जास्त तरूणांपर्यंत पोहोचणे ज्या पक्षाला जमेल त्याच्या पदरात या तरूणाच्या मतांचे माप नक्की पडेल.नवीन पिढी मतदानाबाबत अधिक उत्साही असल्याचे विविध सर्वेक्षणांमधून पुढे आले आहे. ‘लोकमत’ने केलेल्या तरूणाईच्या सर्वेक्षणातही ही पिढी मतदानासाठी उत्सुक असल्याचे प्रकर्षाने पुढे आले आहे. आम्हाला मतदान करायचंय, अशीच भावना असंख्य मुलांच्या मनात होती. त्यात जबाबदारीपेक्षा उत्साहाचे प्रमाण अधिक आहे, हे मान्य. पण पहिल्याच मतदानाला त्यांच्याकडून जबाबदारीची अपेक्षा करणेही चुकीचे ठरेल.या पिढीला शिक्षण आणि रोजगारात अधिक स्वारस्य आहे. ही पिढी बेधडक आहे. इंटरनेटशी जवळीक असल्याने ही पिढी पारंपरिक निकषांवर अवलंबून न राहता स्वत: माहिती घेणारी पिढी आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना या नवमतदारांना गृहीत धरू भागणार नाही. या पिढीला काय हवंय हे ओळखून त्यांच्यापर्यंत पोहोचावे लागेल. त्यांच्या भाषेत त्यांच्याशी संपर्क साधावा लागेल. त्यांच्या मनातला अस्वस्थपणा कमी करावा लागेल. या पिढीला नुसती आश्वासने देऊन चालणार नाही. ही पिढी थेट बोलणारी पिढी आहे. त्यामुळे वेळ पडली तर राजकीय पक्षांना सुनावण्याची जबाबदारीही ते पेलतील. काही क्षणात असंख्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग त्यांना माहिती आहे. त्यामुळे एखाद्या अन्यायाविरोधात ही तरूणाई पटकन एकत्र होऊ शकते, याचे भानही राजकीय पक्षांना बाळगावे लागेल.शिक्षण आणि रोजगार या तरूणाईच्या दोन प्रमुख गरजा आहेत. त्यांना जातीपातीच्या राजकारणात रस नाही. किंबहुना ग्लोबली विचार करणाऱ्या या तरूणाईसमोर जातीपातीच्या आधारावर मांडलेली गणिते खूप त्रासदायक ठरतील. ही खरं तर राजकीय पक्षांना खूप मोठी संधी आहे. प्रामाणिक काम करणाऱ्यांना ते अधिक सोपे होईल. या तरूणाईसमोर आताच चांगला आदर्श उभा करणाºया पक्षाला पुढची अनेक वर्षे मतदार शोधावे लागणार नाहीत.