शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी धोरणात्मक निर्णयाची अपेक्षा

By admin | Updated: October 15, 2016 23:23 IST

मच्छीमारांसाठी कार्यशाळा : किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या सामाजिक, आर्थिक बाबींवर चर्चा

रत्नागिरी : रत्नागिरी येथे मच्छीमारांसाठी आयोजित कार्यशाळेत किनारपट्टीवरील मच्छीमारांचा सामाजिक व आर्थिक बाबींवर चर्चा करण्यात आली. या चर्चेचा अहवाल शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याद्वारे किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या विकासाबाबत धोरणात्मक निर्णय अपेक्षित आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था, मुंबई व राष्ट्रीय शाश्वत किनारा व्यवस्थापन केंद्र, चेन्नई यांचे संयुक्त विद्यमाने ‘रत्नागिरी किनारपट्टीवरील पर्यावरण संवेदनशील भागांचा अभ्यास’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयात पार पडली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राघवेंद्र पै होते. केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था, मुंबई यांनी रत्नागिरीच्या किनारपट्टीवरील संवेदनशील भागांचा अभ्यास नुकताच पूर्ण केला आहे. त्या अभ्यासाची सत्यता पडताळणी स्थानिक मच्छीमार बांधवांच्या सहकार्याने करण्यात आली. यावेळी मच्छीमार बांधवांनी अभ्यासात समाविष्ट असलेले मासेमारीसाठीचे नैसर्गिक स्त्रोत, तसेच मच्छीमार बांधवांच्या उपजीविकेत नैैसर्गिक संसाधनांचा उपयोग व किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या सामाजिक व आर्थिक बाबींवर चर्चा केली. या कार्यशाळेचा अंतिम अहवाल राज्य शासनाला सादर केला जाणार असून, त्यानुसार मासेमारीच्या नैसर्गिक स्त्रोतांच्या संवर्धनासाठी व किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांच्या विकासासाठी धोरणात्मक निर्णयांची अपेक्षा मच्छीमारांना आहे. मच्छीमार बांधवांना विश्वासात घेऊन अहवाल तयार करून तो शासनाला सादर करण्याची केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था, मुंबई व मत्स्य महाविद्यालयाची ही अभिनव संकल्पना अभिनंदनीय असून, भविष्यातील संभावित वाद टाळण्यासाठी मार्गदर्शक कृती असल्याची प्रतिक्रिया उपस्थित मच्छीमारांनी व्यक्त केली. या कार्यशाळेसाठी ज्येष्ठ मच्छीमार दादा मयेकर, अमजद बोरकर, निसार बोरकर, विष्णू पोवार यांच्यासह केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था, मुंबईचे डॉ. अनंथन, डॉ. सुब्रमण्यम, राष्ट्रीय शाश्वत किनारा व्यवस्थापन केंद्र चेन्नईचे डॉ. अभिलाष आदी मान्यवरांसह बहुसंख्येने मच्छीमार बांधव उपस्थित होते. मत्स्य महाविद्यालयाचे विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. मंगेश शिरधनकर यांनी कार्यशाळेचे समन्वयक म्हणून काम केले तर प्रा. सुहास वासावे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी प्रा. भरत यादव, प्रा. श्रीकांत शारंगधर, प्रा. मकरंद शारंगधर तसेच मत्स्य विस्तार शिक्षण व मत्स्य अर्थशास्त्र पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. (प्रतिनिधी) रत्नागिरी येथे मच्छीमारासांठी आयोजित केलेल्या कार्यशाळेत त्यांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेचा अहवाल शासनाला पाठविण्यात येणार आहे. केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था, मुंबईतर्फे रत्नागिरीच्या किनारपट्टीवरील संवेदनशील भागांचा अभ्यास पूर्ण करण्यात आला. या अभ्यासातील सर्व मुद्दे यावेळी मांडण्यात आले. या कार्यशाळेचा अहवाल तयार करताना संस्थेतर्फे मच्छीमार बांधवांना विश्वासात घेण्यात आल्याने मच्छीमार बांधवांनी या अभिनव संकल्पनेचे स्वागत केले आहे.