शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

विकासासाठी धोरणात्मक निर्णयाची अपेक्षा

By admin | Updated: October 15, 2016 23:23 IST

मच्छीमारांसाठी कार्यशाळा : किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या सामाजिक, आर्थिक बाबींवर चर्चा

रत्नागिरी : रत्नागिरी येथे मच्छीमारांसाठी आयोजित कार्यशाळेत किनारपट्टीवरील मच्छीमारांचा सामाजिक व आर्थिक बाबींवर चर्चा करण्यात आली. या चर्चेचा अहवाल शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याद्वारे किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या विकासाबाबत धोरणात्मक निर्णय अपेक्षित आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था, मुंबई व राष्ट्रीय शाश्वत किनारा व्यवस्थापन केंद्र, चेन्नई यांचे संयुक्त विद्यमाने ‘रत्नागिरी किनारपट्टीवरील पर्यावरण संवेदनशील भागांचा अभ्यास’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयात पार पडली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राघवेंद्र पै होते. केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था, मुंबई यांनी रत्नागिरीच्या किनारपट्टीवरील संवेदनशील भागांचा अभ्यास नुकताच पूर्ण केला आहे. त्या अभ्यासाची सत्यता पडताळणी स्थानिक मच्छीमार बांधवांच्या सहकार्याने करण्यात आली. यावेळी मच्छीमार बांधवांनी अभ्यासात समाविष्ट असलेले मासेमारीसाठीचे नैसर्गिक स्त्रोत, तसेच मच्छीमार बांधवांच्या उपजीविकेत नैैसर्गिक संसाधनांचा उपयोग व किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या सामाजिक व आर्थिक बाबींवर चर्चा केली. या कार्यशाळेचा अंतिम अहवाल राज्य शासनाला सादर केला जाणार असून, त्यानुसार मासेमारीच्या नैसर्गिक स्त्रोतांच्या संवर्धनासाठी व किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांच्या विकासासाठी धोरणात्मक निर्णयांची अपेक्षा मच्छीमारांना आहे. मच्छीमार बांधवांना विश्वासात घेऊन अहवाल तयार करून तो शासनाला सादर करण्याची केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था, मुंबई व मत्स्य महाविद्यालयाची ही अभिनव संकल्पना अभिनंदनीय असून, भविष्यातील संभावित वाद टाळण्यासाठी मार्गदर्शक कृती असल्याची प्रतिक्रिया उपस्थित मच्छीमारांनी व्यक्त केली. या कार्यशाळेसाठी ज्येष्ठ मच्छीमार दादा मयेकर, अमजद बोरकर, निसार बोरकर, विष्णू पोवार यांच्यासह केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था, मुंबईचे डॉ. अनंथन, डॉ. सुब्रमण्यम, राष्ट्रीय शाश्वत किनारा व्यवस्थापन केंद्र चेन्नईचे डॉ. अभिलाष आदी मान्यवरांसह बहुसंख्येने मच्छीमार बांधव उपस्थित होते. मत्स्य महाविद्यालयाचे विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. मंगेश शिरधनकर यांनी कार्यशाळेचे समन्वयक म्हणून काम केले तर प्रा. सुहास वासावे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी प्रा. भरत यादव, प्रा. श्रीकांत शारंगधर, प्रा. मकरंद शारंगधर तसेच मत्स्य विस्तार शिक्षण व मत्स्य अर्थशास्त्र पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. (प्रतिनिधी) रत्नागिरी येथे मच्छीमारासांठी आयोजित केलेल्या कार्यशाळेत त्यांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेचा अहवाल शासनाला पाठविण्यात येणार आहे. केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था, मुंबईतर्फे रत्नागिरीच्या किनारपट्टीवरील संवेदनशील भागांचा अभ्यास पूर्ण करण्यात आला. या अभ्यासातील सर्व मुद्दे यावेळी मांडण्यात आले. या कार्यशाळेचा अहवाल तयार करताना संस्थेतर्फे मच्छीमार बांधवांना विश्वासात घेण्यात आल्याने मच्छीमार बांधवांनी या अभिनव संकल्पनेचे स्वागत केले आहे.