शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

नुकसान भरपाईसाठी महावितरणला नोटीस

By admin | Updated: February 15, 2015 23:39 IST

कृषी समितीचा निर्णय : वेळीच जोडणी न दिल्याने शेतीपंप नादुरुस्त

रत्नागिरी : मुख्यमंत्री विशेष कृती कार्यक्रमाची महावितरणने ‘एैसी की तैसी’ केली असून, दोन वर्षे उलटली तरी अजूनही विद्युपंपाना कनेक्शन दिलेले नाही. त्यामुळे विद्युतपंप नादुरुस्त झाल्याने नुकसान भरपाई का मागण्यात येऊ नये, अशी नोटीस जिल्हा परिषद कृषी समितीने महावितरणला पाठवण्याच्या निर्णय घेतला आहे. शासनाकडून अनुसूचित जाती, नवबौध्दांसाठी विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. त्यामध्येच यातील गरीब व गरजू शेतकऱ्यांसाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत विद्युत कनेक्शन व विद्युत पंप बसविण्याची योजना मागील पाच वर्षांपासून राबविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर विद्युतपंप देण्यात आले आहेत. या विद्युतपंपाना मुख्यमंत्री विशेष कृती कार्यक्रमांतर्गत वीजपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. रोजगार हमी योजनेतून सन २०१२-१३ जिल्ह्यातील १९३ शेतकऱ्यांना विद्युत पंप वाटप करण्यात आले होते. या विद्युतपंप वीज कनेक्शन जोडणीसाठी मुख्यमंत्री विशेष कृती कार्यक्रमांतर्गत शासनाकडून महावितरणकडे नियमाप्रमाणे पैसेही भरणा करण्यात आले आहेत. ही वीज कनेक्शन जोडण्यासाठी महावितरणकडे १८४ शेतकऱ्यांनी मागणी अर्जही केले आहेत. त्यापैकी ९ शेतकऱ्यांनी अद्यापही अर्ज केलेले नाहीत. वीज कनेक्शनच्या मागणी केलेल्या १८४ शेतकऱ्यांपैकी केवळ ५६ शेतकऱ्यांनाच महावितरणकडून वीज कनेक्शन दिलेली आहेत. उर्वरित शेतकऱ्यांना अद्यापपर्यत जोडण्याच दिलेल्या नाहीत. त्यामुळे हे पंप नादुरुस्त झाले आहेत.यामध्ये रत्नागिरी विभागातील ७८ कनेक्शन, चिपळूण विभागातील २९ कनेक्शन व खेड विभागातील २१ कनेक्शन अशी एकूण १२८ कनेक्शन महावितरणकडून जोडण्यात आलेली नाहीत.सन २०१२-१३ या आर्थिक वर्षात शासनाने संबंधित कनेक्शन जोडणीसाठी महावितरणकडे पैसे भरूनही ती जोडणी केलेली नाही. याबाबत शेतकऱ्यांनी कनेक्शन जोडणीच्या मागणीसाठी महावितरणचे उंबरठे झिजवले. जिल्हा परिषदेच्या कृषी समिती, स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेमध्येही अनेकदा या वीज जोडणीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या सभांमध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकाऱ्यांकडून धारेवर धरण्यात आले होते. तरीही महावितरणकडून त्याकडे गांभीर्याने पाहिलेले नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे महावितरणबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. दोन वर्षे उलटली तरी महावितरणने कनेक्शन दिलेली नसल्याने शेतकऱ्यांना देण्यात आलेले विद्युत पंप पडून आहेत. त्यामुळे ते पंप आता नादुरूस्त झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी चार दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या कृषी समितीत जोरदार चर्चा झाली. या नुकसानीस महावितरणच जबाबदार असल्याचा सूर या सभेत सदस्यांकडून निघाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई का मागण्यात येऊ नये, अशी नोटीस महावितरणला देण्याचा निर्णय कृषी समितीने घेतला आहे. याबाबत लवकरच महावितरणला नोटीस बजावण्यात येणार आहे. (शहर वार्ताहर)सतीश शेवडेंची नाराजीजिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व कृषी समिती सभापती सतीश शेवडे यांनी महावितरणच्या बेजबाबदारपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. महावितरणने शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, अशी मागणी असल्याचे शेवडे यांनी सांगितले. याबाबत होणाऱ्या निर्णयाकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.