शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

नुकसान भरपाईसाठी महावितरणला नोटीस

By admin | Updated: February 15, 2015 23:39 IST

कृषी समितीचा निर्णय : वेळीच जोडणी न दिल्याने शेतीपंप नादुरुस्त

रत्नागिरी : मुख्यमंत्री विशेष कृती कार्यक्रमाची महावितरणने ‘एैसी की तैसी’ केली असून, दोन वर्षे उलटली तरी अजूनही विद्युपंपाना कनेक्शन दिलेले नाही. त्यामुळे विद्युतपंप नादुरुस्त झाल्याने नुकसान भरपाई का मागण्यात येऊ नये, अशी नोटीस जिल्हा परिषद कृषी समितीने महावितरणला पाठवण्याच्या निर्णय घेतला आहे. शासनाकडून अनुसूचित जाती, नवबौध्दांसाठी विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. त्यामध्येच यातील गरीब व गरजू शेतकऱ्यांसाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत विद्युत कनेक्शन व विद्युत पंप बसविण्याची योजना मागील पाच वर्षांपासून राबविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर विद्युतपंप देण्यात आले आहेत. या विद्युतपंपाना मुख्यमंत्री विशेष कृती कार्यक्रमांतर्गत वीजपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. रोजगार हमी योजनेतून सन २०१२-१३ जिल्ह्यातील १९३ शेतकऱ्यांना विद्युत पंप वाटप करण्यात आले होते. या विद्युतपंप वीज कनेक्शन जोडणीसाठी मुख्यमंत्री विशेष कृती कार्यक्रमांतर्गत शासनाकडून महावितरणकडे नियमाप्रमाणे पैसेही भरणा करण्यात आले आहेत. ही वीज कनेक्शन जोडण्यासाठी महावितरणकडे १८४ शेतकऱ्यांनी मागणी अर्जही केले आहेत. त्यापैकी ९ शेतकऱ्यांनी अद्यापही अर्ज केलेले नाहीत. वीज कनेक्शनच्या मागणी केलेल्या १८४ शेतकऱ्यांपैकी केवळ ५६ शेतकऱ्यांनाच महावितरणकडून वीज कनेक्शन दिलेली आहेत. उर्वरित शेतकऱ्यांना अद्यापपर्यत जोडण्याच दिलेल्या नाहीत. त्यामुळे हे पंप नादुरुस्त झाले आहेत.यामध्ये रत्नागिरी विभागातील ७८ कनेक्शन, चिपळूण विभागातील २९ कनेक्शन व खेड विभागातील २१ कनेक्शन अशी एकूण १२८ कनेक्शन महावितरणकडून जोडण्यात आलेली नाहीत.सन २०१२-१३ या आर्थिक वर्षात शासनाने संबंधित कनेक्शन जोडणीसाठी महावितरणकडे पैसे भरूनही ती जोडणी केलेली नाही. याबाबत शेतकऱ्यांनी कनेक्शन जोडणीच्या मागणीसाठी महावितरणचे उंबरठे झिजवले. जिल्हा परिषदेच्या कृषी समिती, स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेमध्येही अनेकदा या वीज जोडणीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या सभांमध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकाऱ्यांकडून धारेवर धरण्यात आले होते. तरीही महावितरणकडून त्याकडे गांभीर्याने पाहिलेले नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे महावितरणबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. दोन वर्षे उलटली तरी महावितरणने कनेक्शन दिलेली नसल्याने शेतकऱ्यांना देण्यात आलेले विद्युत पंप पडून आहेत. त्यामुळे ते पंप आता नादुरूस्त झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी चार दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या कृषी समितीत जोरदार चर्चा झाली. या नुकसानीस महावितरणच जबाबदार असल्याचा सूर या सभेत सदस्यांकडून निघाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई का मागण्यात येऊ नये, अशी नोटीस महावितरणला देण्याचा निर्णय कृषी समितीने घेतला आहे. याबाबत लवकरच महावितरणला नोटीस बजावण्यात येणार आहे. (शहर वार्ताहर)सतीश शेवडेंची नाराजीजिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व कृषी समिती सभापती सतीश शेवडे यांनी महावितरणच्या बेजबाबदारपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. महावितरणने शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, अशी मागणी असल्याचे शेवडे यांनी सांगितले. याबाबत होणाऱ्या निर्णयाकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.