शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

नुकसान भरपाईसाठी महावितरणला नोटीस

By admin | Updated: February 15, 2015 23:39 IST

कृषी समितीचा निर्णय : वेळीच जोडणी न दिल्याने शेतीपंप नादुरुस्त

रत्नागिरी : मुख्यमंत्री विशेष कृती कार्यक्रमाची महावितरणने ‘एैसी की तैसी’ केली असून, दोन वर्षे उलटली तरी अजूनही विद्युपंपाना कनेक्शन दिलेले नाही. त्यामुळे विद्युतपंप नादुरुस्त झाल्याने नुकसान भरपाई का मागण्यात येऊ नये, अशी नोटीस जिल्हा परिषद कृषी समितीने महावितरणला पाठवण्याच्या निर्णय घेतला आहे. शासनाकडून अनुसूचित जाती, नवबौध्दांसाठी विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. त्यामध्येच यातील गरीब व गरजू शेतकऱ्यांसाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत विद्युत कनेक्शन व विद्युत पंप बसविण्याची योजना मागील पाच वर्षांपासून राबविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर विद्युतपंप देण्यात आले आहेत. या विद्युतपंपाना मुख्यमंत्री विशेष कृती कार्यक्रमांतर्गत वीजपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. रोजगार हमी योजनेतून सन २०१२-१३ जिल्ह्यातील १९३ शेतकऱ्यांना विद्युत पंप वाटप करण्यात आले होते. या विद्युतपंप वीज कनेक्शन जोडणीसाठी मुख्यमंत्री विशेष कृती कार्यक्रमांतर्गत शासनाकडून महावितरणकडे नियमाप्रमाणे पैसेही भरणा करण्यात आले आहेत. ही वीज कनेक्शन जोडण्यासाठी महावितरणकडे १८४ शेतकऱ्यांनी मागणी अर्जही केले आहेत. त्यापैकी ९ शेतकऱ्यांनी अद्यापही अर्ज केलेले नाहीत. वीज कनेक्शनच्या मागणी केलेल्या १८४ शेतकऱ्यांपैकी केवळ ५६ शेतकऱ्यांनाच महावितरणकडून वीज कनेक्शन दिलेली आहेत. उर्वरित शेतकऱ्यांना अद्यापपर्यत जोडण्याच दिलेल्या नाहीत. त्यामुळे हे पंप नादुरुस्त झाले आहेत.यामध्ये रत्नागिरी विभागातील ७८ कनेक्शन, चिपळूण विभागातील २९ कनेक्शन व खेड विभागातील २१ कनेक्शन अशी एकूण १२८ कनेक्शन महावितरणकडून जोडण्यात आलेली नाहीत.सन २०१२-१३ या आर्थिक वर्षात शासनाने संबंधित कनेक्शन जोडणीसाठी महावितरणकडे पैसे भरूनही ती जोडणी केलेली नाही. याबाबत शेतकऱ्यांनी कनेक्शन जोडणीच्या मागणीसाठी महावितरणचे उंबरठे झिजवले. जिल्हा परिषदेच्या कृषी समिती, स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेमध्येही अनेकदा या वीज जोडणीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या सभांमध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकाऱ्यांकडून धारेवर धरण्यात आले होते. तरीही महावितरणकडून त्याकडे गांभीर्याने पाहिलेले नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे महावितरणबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. दोन वर्षे उलटली तरी महावितरणने कनेक्शन दिलेली नसल्याने शेतकऱ्यांना देण्यात आलेले विद्युत पंप पडून आहेत. त्यामुळे ते पंप आता नादुरूस्त झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी चार दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या कृषी समितीत जोरदार चर्चा झाली. या नुकसानीस महावितरणच जबाबदार असल्याचा सूर या सभेत सदस्यांकडून निघाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई का मागण्यात येऊ नये, अशी नोटीस महावितरणला देण्याचा निर्णय कृषी समितीने घेतला आहे. याबाबत लवकरच महावितरणला नोटीस बजावण्यात येणार आहे. (शहर वार्ताहर)सतीश शेवडेंची नाराजीजिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व कृषी समिती सभापती सतीश शेवडे यांनी महावितरणच्या बेजबाबदारपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. महावितरणने शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, अशी मागणी असल्याचे शेवडे यांनी सांगितले. याबाबत होणाऱ्या निर्णयाकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.