शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
3
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
4
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
6
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
7
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
8
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
9
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
10
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
11
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
12
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
13
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
14
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
15
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
16
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
17
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
18
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
19
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
20
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'

सर्वाधिक विजेचा वापर महाराष्ट्रात

By admin | Updated: May 29, 2014 00:42 IST

मेहरून नाकाडे / रत्नागिरी उन्हाळ्यात पाण्याची पातळी कमी होते आणि तापमानात वाढ होत असल्यामुळे विजेचा वापर वाढतो.

मेहरून नाकाडे / रत्नागिरी उन्हाळ्यात पाण्याची पातळी कमी होते आणि तापमानात वाढ होत असल्यामुळे विजेचा वापर वाढतो. संपूर्ण देशासाठी एक लाख ४० हजार ९९८ मेगावॅट विजेची मागणी असून, एक लाख ३३ हजार ४४२ मेगावॅट विजेचा वापर होतो. संपूर्ण देशाचा विचार करता सर्वाधिक विजेची मागणी महाराष्ट्र राज्यातून होत असून, ती १९ हजार ७८१ मेगावॅट इतकी आहे. उत्तर क्षेत्रातील चंदीगढमध्ये २३८, दिल्ली ४,४१८, हरियाणा ६,१७३, हिमाचल प्रदेश १,३१६, जम्मू काश्मिर २,०६३, पंजाब ६,१२६, राजस्थान ७,९७७, उत्तरप्रदेश १४,९६६, उत्तराखंड राज्यासाठी १,६४९ मेगावॅट विजेची मागणी होत आहे. एकूण उत्तर क्षेत्रासाठी ४१ हजार २२२ मेगावॅट विजेची मागणी होत असली तरी ३८ हजार १६३ मेगावॅट विजेचा पुरवठा होत आहे. पश्चिम क्षेत्रातील छत्तीसगडमध्ये ३,५०२, गुजरातमध्ये १३,५६७, मध्यप्रदेश ७,०१९, महाराष्ट्र १९,७८१, दीव व दमणमध्ये २९७, दादर व नगरहवेलीमध्ये ६४६, गोवामध्ये ४८९ मेगावॅट विजेची मागणी होत आहे. पश्चिम क्षेत्रातील राज्यांसाठी एकूण ४१ हजार ४५४ मेगावॅट वीज लागते. त्यांना ४० हजार ६०१ मेगावॅट वीज पुरवठा करण्यात आहे. दक्षिण क्षेत्रातील आंध्रप्रदेशमध्ये १३,५७८, कर्नाटक ९,९३२, केरळ ३,७४६, तमिळनाडू १३,४९६, पाँडेचरी ३४९, लक्ष्यव्दीप ८ मिळून एकूण ३९ हजार ७९८ मेगावॅट विजेची मागणी आहे. त्यांना ३६ हजार ५४६ मेगावॅट वीज दिली जात आहे. पूर्व क्षेत्रातील बिहार मध्ये २,५६०, दामोदर घाटीतून २,४७२, झारखंड १,०६०, ओडिसा ३,७९०, पं.बंगाल ७,१२३, सिक्कीम ९०, अंदमान-निकोबार ४० मेगावॅट मिळून एकूण १६ हजार ३२७ मेगावॅट विजेची मागणी होत आहे. या राज्यांना १६ हजार ८७ मेगावॅट वीज उपलब्ध करून दिली जात आहे. उत्तर पूर्व क्षेत्रातील अरूणालप्रदेश मधून १०५, आसाम १,३४३, मणीपुर ११५, मेघालय २८०, मिजोराम ७७, नागालँड १०५, त्रिपुरा २४७ मेगावॅट मिळून केवळ २,१९७ मेगावॅट विजेची मागणी होत आहे. या राज्यांना २,०४५ मेगावॅट विजेचा पुरवठा करण्यात येत आहे. संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रातील विजेचा वापर सर्वाधिक दिसून येत आहे. सर्वाधिक मागणीमध्ये दुसरा क्रमांक उत्तरप्रदेशचा असून, त्या खालोखाल गुजरात व तामिळनाडूकडून मागणी होत आहे. मागणीप्रमाणे विजेचा पुरवठा कमी अधिक स्वरूपात सुरू असला तरी महाराष्ट्रामध्ये फिडरनिहाय भारनियमन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या फिडरवर वीजगळती अधिक व आर्थिक वसुली कमी तेथे भारनियमन करण्यात येत आहे. परिणामी भारनियमनाची झळ सर्वानाच बसत नाही. महाराष्ट्राच्या फिडरनिहाय भारनियमनाचा पॅटर्न लगतच्या राज्यांनीही वापरण्यास सुरू केला आहे. अर्थात तामिळनाडूसारख्या राज्याने मात्र स्वत:च्या योजना वापरून राज्य भारनियमनमुक्त केले आहे.