शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाधिक विजेचा वापर महाराष्ट्रात

By admin | Updated: May 29, 2014 00:42 IST

मेहरून नाकाडे / रत्नागिरी उन्हाळ्यात पाण्याची पातळी कमी होते आणि तापमानात वाढ होत असल्यामुळे विजेचा वापर वाढतो.

मेहरून नाकाडे / रत्नागिरी उन्हाळ्यात पाण्याची पातळी कमी होते आणि तापमानात वाढ होत असल्यामुळे विजेचा वापर वाढतो. संपूर्ण देशासाठी एक लाख ४० हजार ९९८ मेगावॅट विजेची मागणी असून, एक लाख ३३ हजार ४४२ मेगावॅट विजेचा वापर होतो. संपूर्ण देशाचा विचार करता सर्वाधिक विजेची मागणी महाराष्ट्र राज्यातून होत असून, ती १९ हजार ७८१ मेगावॅट इतकी आहे. उत्तर क्षेत्रातील चंदीगढमध्ये २३८, दिल्ली ४,४१८, हरियाणा ६,१७३, हिमाचल प्रदेश १,३१६, जम्मू काश्मिर २,०६३, पंजाब ६,१२६, राजस्थान ७,९७७, उत्तरप्रदेश १४,९६६, उत्तराखंड राज्यासाठी १,६४९ मेगावॅट विजेची मागणी होत आहे. एकूण उत्तर क्षेत्रासाठी ४१ हजार २२२ मेगावॅट विजेची मागणी होत असली तरी ३८ हजार १६३ मेगावॅट विजेचा पुरवठा होत आहे. पश्चिम क्षेत्रातील छत्तीसगडमध्ये ३,५०२, गुजरातमध्ये १३,५६७, मध्यप्रदेश ७,०१९, महाराष्ट्र १९,७८१, दीव व दमणमध्ये २९७, दादर व नगरहवेलीमध्ये ६४६, गोवामध्ये ४८९ मेगावॅट विजेची मागणी होत आहे. पश्चिम क्षेत्रातील राज्यांसाठी एकूण ४१ हजार ४५४ मेगावॅट वीज लागते. त्यांना ४० हजार ६०१ मेगावॅट वीज पुरवठा करण्यात आहे. दक्षिण क्षेत्रातील आंध्रप्रदेशमध्ये १३,५७८, कर्नाटक ९,९३२, केरळ ३,७४६, तमिळनाडू १३,४९६, पाँडेचरी ३४९, लक्ष्यव्दीप ८ मिळून एकूण ३९ हजार ७९८ मेगावॅट विजेची मागणी आहे. त्यांना ३६ हजार ५४६ मेगावॅट वीज दिली जात आहे. पूर्व क्षेत्रातील बिहार मध्ये २,५६०, दामोदर घाटीतून २,४७२, झारखंड १,०६०, ओडिसा ३,७९०, पं.बंगाल ७,१२३, सिक्कीम ९०, अंदमान-निकोबार ४० मेगावॅट मिळून एकूण १६ हजार ३२७ मेगावॅट विजेची मागणी होत आहे. या राज्यांना १६ हजार ८७ मेगावॅट वीज उपलब्ध करून दिली जात आहे. उत्तर पूर्व क्षेत्रातील अरूणालप्रदेश मधून १०५, आसाम १,३४३, मणीपुर ११५, मेघालय २८०, मिजोराम ७७, नागालँड १०५, त्रिपुरा २४७ मेगावॅट मिळून केवळ २,१९७ मेगावॅट विजेची मागणी होत आहे. या राज्यांना २,०४५ मेगावॅट विजेचा पुरवठा करण्यात येत आहे. संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रातील विजेचा वापर सर्वाधिक दिसून येत आहे. सर्वाधिक मागणीमध्ये दुसरा क्रमांक उत्तरप्रदेशचा असून, त्या खालोखाल गुजरात व तामिळनाडूकडून मागणी होत आहे. मागणीप्रमाणे विजेचा पुरवठा कमी अधिक स्वरूपात सुरू असला तरी महाराष्ट्रामध्ये फिडरनिहाय भारनियमन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या फिडरवर वीजगळती अधिक व आर्थिक वसुली कमी तेथे भारनियमन करण्यात येत आहे. परिणामी भारनियमनाची झळ सर्वानाच बसत नाही. महाराष्ट्राच्या फिडरनिहाय भारनियमनाचा पॅटर्न लगतच्या राज्यांनीही वापरण्यास सुरू केला आहे. अर्थात तामिळनाडूसारख्या राज्याने मात्र स्वत:च्या योजना वापरून राज्य भारनियमनमुक्त केले आहे.