शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

सर्वाधिक विजेचा वापर महाराष्ट्रात

By admin | Updated: May 29, 2014 00:42 IST

मेहरून नाकाडे / रत्नागिरी उन्हाळ्यात पाण्याची पातळी कमी होते आणि तापमानात वाढ होत असल्यामुळे विजेचा वापर वाढतो.

मेहरून नाकाडे / रत्नागिरी उन्हाळ्यात पाण्याची पातळी कमी होते आणि तापमानात वाढ होत असल्यामुळे विजेचा वापर वाढतो. संपूर्ण देशासाठी एक लाख ४० हजार ९९८ मेगावॅट विजेची मागणी असून, एक लाख ३३ हजार ४४२ मेगावॅट विजेचा वापर होतो. संपूर्ण देशाचा विचार करता सर्वाधिक विजेची मागणी महाराष्ट्र राज्यातून होत असून, ती १९ हजार ७८१ मेगावॅट इतकी आहे. उत्तर क्षेत्रातील चंदीगढमध्ये २३८, दिल्ली ४,४१८, हरियाणा ६,१७३, हिमाचल प्रदेश १,३१६, जम्मू काश्मिर २,०६३, पंजाब ६,१२६, राजस्थान ७,९७७, उत्तरप्रदेश १४,९६६, उत्तराखंड राज्यासाठी १,६४९ मेगावॅट विजेची मागणी होत आहे. एकूण उत्तर क्षेत्रासाठी ४१ हजार २२२ मेगावॅट विजेची मागणी होत असली तरी ३८ हजार १६३ मेगावॅट विजेचा पुरवठा होत आहे. पश्चिम क्षेत्रातील छत्तीसगडमध्ये ३,५०२, गुजरातमध्ये १३,५६७, मध्यप्रदेश ७,०१९, महाराष्ट्र १९,७८१, दीव व दमणमध्ये २९७, दादर व नगरहवेलीमध्ये ६४६, गोवामध्ये ४८९ मेगावॅट विजेची मागणी होत आहे. पश्चिम क्षेत्रातील राज्यांसाठी एकूण ४१ हजार ४५४ मेगावॅट वीज लागते. त्यांना ४० हजार ६०१ मेगावॅट वीज पुरवठा करण्यात आहे. दक्षिण क्षेत्रातील आंध्रप्रदेशमध्ये १३,५७८, कर्नाटक ९,९३२, केरळ ३,७४६, तमिळनाडू १३,४९६, पाँडेचरी ३४९, लक्ष्यव्दीप ८ मिळून एकूण ३९ हजार ७९८ मेगावॅट विजेची मागणी आहे. त्यांना ३६ हजार ५४६ मेगावॅट वीज दिली जात आहे. पूर्व क्षेत्रातील बिहार मध्ये २,५६०, दामोदर घाटीतून २,४७२, झारखंड १,०६०, ओडिसा ३,७९०, पं.बंगाल ७,१२३, सिक्कीम ९०, अंदमान-निकोबार ४० मेगावॅट मिळून एकूण १६ हजार ३२७ मेगावॅट विजेची मागणी होत आहे. या राज्यांना १६ हजार ८७ मेगावॅट वीज उपलब्ध करून दिली जात आहे. उत्तर पूर्व क्षेत्रातील अरूणालप्रदेश मधून १०५, आसाम १,३४३, मणीपुर ११५, मेघालय २८०, मिजोराम ७७, नागालँड १०५, त्रिपुरा २४७ मेगावॅट मिळून केवळ २,१९७ मेगावॅट विजेची मागणी होत आहे. या राज्यांना २,०४५ मेगावॅट विजेचा पुरवठा करण्यात येत आहे. संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रातील विजेचा वापर सर्वाधिक दिसून येत आहे. सर्वाधिक मागणीमध्ये दुसरा क्रमांक उत्तरप्रदेशचा असून, त्या खालोखाल गुजरात व तामिळनाडूकडून मागणी होत आहे. मागणीप्रमाणे विजेचा पुरवठा कमी अधिक स्वरूपात सुरू असला तरी महाराष्ट्रामध्ये फिडरनिहाय भारनियमन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या फिडरवर वीजगळती अधिक व आर्थिक वसुली कमी तेथे भारनियमन करण्यात येत आहे. परिणामी भारनियमनाची झळ सर्वानाच बसत नाही. महाराष्ट्राच्या फिडरनिहाय भारनियमनाचा पॅटर्न लगतच्या राज्यांनीही वापरण्यास सुरू केला आहे. अर्थात तामिळनाडूसारख्या राज्याने मात्र स्वत:च्या योजना वापरून राज्य भारनियमनमुक्त केले आहे.