शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सागरी सुरक्षक समस्याग्रस्त

By admin | Updated: September 5, 2014 23:21 IST

अजून बोध नाही : सागरी सुरक्षेकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे

सुभाष कदम - चिपळूण  -मुंबईमध्ये पाकिस्तानच्या लष्कर ए तोयबा संघटनेचे २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवादी घुसले आणि मोठ्या प्रमाणावर नरसंहार झाला. त्यानंतर सागरी सुरक्षा अत्यंत व्यापक प्रमाणावर राबविण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले. मात्र, आजही येथील कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर म्हणजे ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गृह खात्याच्या आदेशानुसार कठोर उपाययोजना करण्याचे कागदोपत्री आदेश दाखल झाले. परंतु, यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा खात्याकडे उपलब्ध नाही. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली. स्पीड बोटींची संख्या वाढली. लाईफ जॅकेट, शस्त्र याचा विचार करता अनेक सुविधांची अद्याप वानवा आहे. या बोटीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला निवाऱ्यासाठी पुरेशी जागा नाही. बोटीवर जाताना १२ तासासाठी पुरेल एवढे पाणी आणि जेवणाचा डबा त्यांना घेऊन जावा लागतो. ज्या ठिकाणी लँडिंग पॉईट आहे, तेथे सावली किंवा निवारा नाही. अनेक वेळा एखादी अडचण निर्माण झाल्यास स्थानिक पोलीस व सागरी सुरक्षा दलाचे कर्मचारी यांच्यात हद्दीवरुन हाणामारी होते. कारवाई नक्की कोणी करायची, यावरुन तू - तू मैं-मैं... अशी स्थिती निर्माण होते. या वादात गुन्हेगाराला सुटका करुन घ्यायला पुरेसा वाव मिळतो. कायद्यातील कच्च्या दुव्यांचा आधार घेत गुन्हेगार मोकाट सुटतात. म्हणूनच स्थानिक पोलीस आणि सागरी सुरक्षा कर्मचारी यांच्यात समन्वय असणे गरजेचा आहे. मुंबईसारख्या ठिकाणी सागरी सुरक्षेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी आहेत. त्यांच्यासाठी लँडिंग पॉर्इंट जेथे आहेत त्या सर्व जागा उन्हात आहेत. अनेक वेळा समुद्रात उतरुन त्यांना किनारा गाठावा लागतो. वैयक्तिक स्वच्छतेसाठी बोटीवर त्यांना स्वच्छतागृह नाही. त्यामुळे उघड्यावरच विधी उरकावे लागतात. अनेकवेळा वाऱ्याशी सामना करावा लागतो. बोटीवर असलेले लाईफ जॅकेट जड असते. शिवाय बोटीवर असलेल्या एके-४७ मधून शत्रूवर हल्ला करायचा तर ती बोट स्थिर असणे गरजेचे आहे. परंतु, सध्या अस्तित्त्वात असलेली बोट स्थिर राहात नाही. लाटांच्या हिंदोळ्यावर ती नाचत असते. शिवाय हत्यारे कमालीची जड आहेत. समोरुन बुलेटप्रूफ आहेत परंतु, एखादा शत्रू मागील बाजूने घुसल्यास बोटीवरील सर्व कर्मचारी शहीद होऊ शकतात. अनेक वेळा वादळामुळे त्यांना मान गुडघ्यात घेऊन बसावे लागते. बोटीवर बसण्यासाठी किरकोळ जागा असते. एकूणच सागरी सुरक्षेसाठी असणाऱ्या बोटीमध्येही अनेक उणिवा आहेत. कर्मचाऱ्यांना अद्ययावत साधनसामुग्री उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. सागरी सुरक्षा ही मच्छिमार बांधव, किनारपट्टी भागात असणारे सुरक्षा दल व खबऱ्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे शासनाने किनारपट्टी भागात काम करणाऱ्या सागरी सुरक्षा दलाच्या जवानांना अनेक सोयी सुविधा उपलब्ध करुन द्यायला हव्यात. कर्मचाऱ्यांना स्वच्छतागृह व पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन द्यायला हवे. अत्याधुनिक बोटी व त्यासाठी प्रशिक्षित चालक असणे गरजेचे आहे.